Sunday, April 27, 2014

Why are you afraid of Hindus?



हिंदूंना का घाबरता?- मारिया वर्थ
वसंत गणेश काणे
बी.एस्सी;एम.ए.(मानसशास्त्र);एम.एड
एल.बी.७;पाण्याच्या टाकीजवळ, लक्ष्मीनगर,
नागपूर-४४० ०२२
९४२२८०४४३० ;Email-kanewasant@gmail.com; Blog –kasa mee?
 
मारिया वर्थ ही  जर्मन विदुषी हॅमबर्ग विद्यापीठातून मानसशास्त्राचा अभ्यास आटोपून भारतात सुट्टी घालवण्यासाठी आली होती. एप्रिल १९८० मध्ये तिने हरिद्वारचा अर्ध कुंभमेल्याला  भेट दिली या काळात तिची आनंदमयी मा आणि देव्रराह बाबा  या दोन विख्यात संतांची भेट झाली. त्यांचा कृपाप्रसाद पावून ती भारतात राहू लागली. भारताच्या आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरांचा तिचा परिचय होत गेला. आपली अनुभूती आपल्या मायदेशीच्या जर्मन वाचकांना ती लेख आणि पुस्तकांच्या साह्याने कळवीत असे. तिला वाटत होते की सर्व भारतीयांना आपल्या गौरवशाली वारशाची  माहिती आहे, जाणीव आहे. पण काही दिवसांनी तिला जाणीव झाली की, आपला वारसा भारताने विसरावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत.तेव्हापासून तिने भारताच्या संपन्न वारशाचा जगाला परिचय करून देण्यास प्रारंभ केला. हे लेख प्रसिद्ध होण्याची शक्यता न दिसल्यामुळे तिने ते आपल्या ब्लागवर टाकण्यास सुरवात केली.
 प्रसारित होत असलेल्या चुकीच्या बातम्या 
जर्मनीमधील न्युरेंबर्गच्या स्थानिक वृत्तपत्रात (जर्मन युद्धकैद्यान्वरचे खटले यात शहरात चालवले गेले होते)जेव्हा जेव्हा भारताबद्दल काही माहिती प्रसिद्ध होई तेव्हा तेव्हा  तिची आई तिला (भारतात वास्तव्याला असलेल्या मारियाला) ही माहिती फोनवर वाचून दाखवीत असे. या बातम्यात भारतासंबंधात अतिशय विकृत चित्रण असे. ‘दिल्लीच्या रस्त्यांवर थंडीने गारठून मरून पडलेल्याची प्रेते ठिकठिकाणी पडलेली असतात’, ‘सतत सामूहिक बलात्कार होत असतात’. अर्थात बातमी देणार्याना   आपल्या देशातील (जर्मनीतील) अशाच सामूहिक बलात्कारांचा सोयीस्कर  विसर पडलेला तिला जाणवत असे. भारताच्या संदर्भात एक नवीन प्रकारचा शब्दप्रयोग तिला आढळून येऊ लागला. ‘हिंदू मूलतत्त्ववादी’(हिंदू फंडामेंटलिस्ट) हा तो शब्दप्रयोग होता. (फंडामेंटलिस्ट म्हणजे धर्मवेडा किंवा धर्मपिसाट) अशा व्यक्तींचा अध्वर्यू म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला जात असे.
मोदी, भाजप आणि संघाबाबतचा अपप्रचार  
‘भारतात हिंदू मूलतत्त्ववादी मोदी विजयी होण्याची शक्यता आहे’,एक दिवस मारियाला जर्मन वृत्तपत्रात छापून आलेली बातमी तिची आई वाचून दाखवीत होती.’ हा माणुस भारताचे विभाजन करणार’. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना नाझींशी करण्यात आली होती. इंग्रजी वृत्तपत्रांचाही सूर असाच होता. यामुळे केवळ भारतालाच नव्हे तर सर्व जगाला धोका आहे, असे म्हणून काही ब्रिटिश वृत्तपत्रे तर एक पाऊल पुढे गेली होती. भारतातील काही वृत्तपत्रे देखील हिंदू मूलतत्त्ववादी आणि जातीयवादी नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास सेक्युलर भारतातील लोकशाहीला धोका निर्माण होईल, असे म्हणत होती.
मारिया वर्थ जेव्हा जर्मनीत परत जाई, तेव्हा तिच्या ओळखीची माणसे तिला विचारीत, ‘हिंदू मूलतत्त्ववादी किती प्रभावी आहेत?’. मारिया त्यांना जीव तोडून सांगत असे ,’हा सगळा बकवास आहे/अपप्रचार आहे. हिंदुत्वाच्या मूलतत्त्वामुळेच मी भारतात आहे.
उदार(?) बुद्धिमन्तांचा कांगावा आणि दांभिकपणा  
मारियाला माहित आहे की, भारतातीलच नव्हे तर जगातील तथाकथित ‘उदार बुद्धिमंत’ (लिबरल इनटलेक्च्यूअल्स) तिच्यावर तुटून पडतील.भारतात  टीव्हीवरील चर्चेत इतका आरडाओरडा होत असतो की, मूळ  विषयापासून चर्चा भरकटत जायची आणि साधे प्रश्नसुद्धा विचारणे अशक्य होत असे. हिंदू आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांना न्याय मिळावा या दृष्टीने  या अपप्रचाराचा समाचार घेणे मारिया वर्थला आवश्यक वाटले.
नरेंद्र मोदी हिंदू मूलतत्त्ववादी कसे काय ठरतात्त? ते स्वत:ला हिंदू म्हणवतात म्हणून? २००२ च्या दंगली थोपवण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही, असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो त्यावरून? या निमित्ताने जगात आजवर कोणाचीही झाली नसेल अशी आणि इतकी चौकशी नरेंद्र मोदी यांची झाली. ही एक अभूतपूर्व घटनाच म्हणावी लागेल. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. आपण क्षणभर असे गृहीत धरु की, या प्रकरणी ते दोषी आहेत. रेल्वे बोगी जळीतकांडानंतर जी दंगल उसळली ती मोदी यांना आवरणे शक्य झाले नाही किंवा त्यासाठी त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. (‘मी  याबाबत दोषी ठरलो तर मला माफ करू नका, अत्यंत कडक शिक्षा करा, फासावर लटकवा’, असे श्री नरेंद्र मोदी स्वत: म्हणत आहेत). असे असेल तर त्यांना कठोर शिक्षा व्हावी पण यामुळे ते हिंदू मूलतत्त्ववादी कसेकाय ठरतात?
‘हिंदूंना ओळखा’- मारिया वर्थ
मारिया या निमित्ताने हिंदुत्त्वाचे तत्त्वज्ञान किंवा सनातन धर्म या नावाने जो ओळखला जातो त्याचे स्वरूप स्पष्ट क्ररू इच्छिते. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वकाही ही ईश्वराची निर्मिती आहे. या प्रत्येकात एकच दैवी त्तत्व  वास करीत असते. ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माप्रमाणे मानवांचे ‘ईश्वराचे आवडते आणि नावडते’, असे वर्गीकरण असे हिंदू धर्म मानत नाही. जगाच्या पाठीवर हिंदू धर्म हा असा धर्म आहे की जो सर्व मानव एकमेकांचे बांधव आहेत,असे मानतो. असे मानणारे इतर कुणी फारसे सापडणार नाहीत. प्राणीमात्रावर प्रेम करा आणि विनाकारण कुणाही जीवमात्राला मारू नका, अशी या धर्माची शिकवण आहे. इतर धर्मियांना कमी प्रतीचे समजू नका. या उलट असे धर्म आहेत की जे असे सांगतात की, ‘सत्य’ धर्माचे पालन न करणारे ईश्वराला आवडत नाहीत. हिंदू स्वभावत: जीवमात्राबाबत दयाळू भूमिका घेणारे असतात. जगातील शाकाहारी माणसांमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदू कधीही ‘जिहाद’(धर्मयुद्ध) लढले नाहीत. तलवारीच्या आधारावर त्यांनी आपला धर्म इतरांवर लादला नाही. याउलट गेली हजार वर्षे त्यांच्यावरच आक्रमणे होत आली आहेत. हजारो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले आहे. हिंदू आहात म्हणून मारले गेलेल्यांची संख्या लाखात मोजावी लागेल.
हिंदू आणि अन्य धर्मीय यातील फरक
‘मी हिंदू आहे’, असे मोदी म्हणतात एवढ्याने ते मूलतत्त्ववादी ठरत नाहीत. उलट भारताचा विकास व्हावा आणि सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे , असा ध्यास त्यांनी घेतला आहे, असे दिसते आहे.
‘आपलाच धर्म श्रेष्ठ आहे’, असे मानणारे ख्रिश्चन किंवा मुस्लीम कोणत्याही मार्गाने इतर धर्म मानणाऱ्या लोकांचे कोणत्याही मार्गाने धर्मांतर करणे आपले कर्तव्य समजतात. जे याला नकार देतील, त्यांचा द्वेष करतात, त्यांना मारण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. जगाच्या इतिहासात या रक्तरंजित प्रकारची उदाहरणे जागोजागी सापडतात. त्यामुळे एखादा युरोपियन किंवा अमेरिकन राजकारणी जेव्हा स्वत:ला ख्रिश्चन म्हणवतो तेव्हा तो ‘ख्रिश्चन मूलतत्ववादी’ ठरत नाही. असेच मुस्लीम राजकारणी पुरुषांचे बाबतीतही म्हटले जाते. मग ते अगदी ‘ख्रिश्चन किंवा मुस्लीम राष्ट्र’ का असेना.
‘हिंदुत्व’ आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा करीत नाही. अमुक एकच सत्य आहे, बाकी अन्य असत्य आहे, अशी हिंदुत्वाची शिकवण नाही. इथे पारखण्याचे स्वातंत्र्य आहे.हिंदुत्वाची मूलतत्वे सुदृढ पायावर उभी असून ती चारित्र्य निर्मितीसाठी पोषक आहेत.उलट या मुल्त्त्वांचे पालन करण्यातच विश्वाचे कल्याण आहे.

नरेंद्र मोदी यांची ग्वाही
‘हा देव आणि तो देव’, असा फरक आम्ही करत नाही. हा देश असे मानत नाही. ईश्वर एक असून ईश्वरप्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत(असू शकतात), असे आम्ही मानतो. या आशयाचे विचार नरेंद्र मोदी यांनी ‘आपकी अदालत’, या टीव्हीवरील कार्यक्रमात बोलतांना काढले होते.’तुमच्या राज्यात ख्रिश्चन जनता आणि त्यांची चर्चेस सुरक्षित राहतील का?’,असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.भारतीय राज्य घटनेनुसार सर्व पंथ सामादराची   भूमिका त्यांच्या पक्षाची राहील. जातीय उद्रेकाला भारताच्या प्रगतीच्या आड येऊ दिले जाणार नाही.
सहा कोटी लोकसंख्येच्या गुजराथ राज्यात गेल्या बारा वर्षात जातीय दंगल झालेली नाही. या काळात गुजराथ राज्याचा विकास झाल्याचे प्रमाणपत्र तटस्थ माध्यमांनी दिले आहे. इतर राज्यांना या गोष्टीचा हेवा वाटतो आहे. आपण भ्रष्टाचारी नाही तसेच अत्यंत सक्षम आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
जगणे धसका घेतला असेल पण कशाचा?
असे असतांना मोदी हिंदू मूलतत्त्ववादी आहेत अशी ओरड जगातील प्रसार माध्यमे का करीत आहेत? त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न का करीत आहेत? आर्थिक दृष्ट्या शक्तिशाली भारताची धसकी तर पाश्चात्य राष्ट्रांनी घेतली नाहीना? म्हणूनच तर मोदींना हिंदू मूलतत्त्ववादी ठरवून त्याचा हत्यारासारखा उपयोग तर ते करीत नाहीत ना? भारतावर मत करण्याचे हे एक षड्यंत्र तर नाही ना?
असे प्रश्न उपस्थित करून मारिया वर्थ म्हणतात की, हिंदुत्वाची मुलतत्वे जगाला समजावून सांगण्याची वेळ आली आहे. बहुदा जग ही मुलतत्वे समजून घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येईलही.                                                    

Wednesday, April 23, 2014

Miss America and American School World tb 23.04.2014

विशेष

तारीख: 23 Apr 2014 00:12:39

मिस अमेरिका आणि अमेरिकन शालेय जगत

अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क नावाच्या शहरात ‘सेंट्रल यॉर्क मिडल स्कूल’ या नावाची तिथल्या शैक्षणिक जिल्ह्यातील (स्कूल डिस्ट्रिक्ट) एक परिसर शाळा (नेबरहुड स्कूल) आहे. अमेरिकेतील माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण तिथल्या जिल्हा परिषदेच्या परिसर शाळांमधून (काऊंटी नेबरहुड स्कूल) मधून दिले जाते. ही या भागातील एक प्रथितयश आणि प्रतिष्ठाप्राप्त शाळा मानली जाते. गेली आठ वर्षे ही शाळा वार्षिक विविधता महोत्सव (डायव्हर्सिटी सेलिब्रेशन) साजरा करीत असते. अमेरिकन समाज हा जगातील विविध देशांतून स्थलांतरित होऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा मिळून बनलेला आहे. या प्रत्येक घटकाचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक वारसा वेगवेगळा असतो. अशाप्रकारे तिथल्या बहुतेक भागात अशी संमिश्र प्रजा वसत आहे.
दरवर्षी साजर्‍या होणार्‍या महोत्सवात आपापल्या मूळ संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम त्या त्या संस्कृतीचा वारसा बाळगून असणारे लोक आणि विद्यार्थी सादर करीत असतात. यात खाद्य पदार्थ, वेषभूषा, सण, प्रथा, परंपरा यांचा परिचय एकमेकांना व्हावा, असा प्रमुख उद्देश असतो. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून भविष्यात एकजिनसी अमेरिकन समाज उदयाला येईल, अशी भूमिका असते. यावेळी बक्षिसे/पारितोषिके सुद्धा दिली जातात. आपल्या येथील शालेय स्नेहसंमेलनासारखे या कार्यक्रमाचे स्वरूप असते, असे म्हणता येईल.

काळी सौंदर्यवती

यावर्षी अमेरिकेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक विशेष घटना घडली. मूळच्या भारतीय वंशाची- एका कृष्णवर्णीय वंशाची- सौंदर्यवती- नीना दवुलुरी- ही इथल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. अमेरिकेतही ‘गोरा-काळा वाद’ अधूनमधून डोके वर काढीत असतोच. तसेच याही वेळी झाले. नीना दवुलुरी नावाच्या एका ‘काळ्या’ मुलीने ‘मिस अमेरिका स्पर्धा’ जिंकावी, हे तिथल्या ‘गोर्‍या लोकांच्या’ पचनी सहजासहजी पडेना. पण ‘निकाल’ लागल्यानंतर हात चोळीत बसण्याव्यतिरिक्त कुणालाही फारसे काही करता येईना. थोडीफार आरडाओरड, आदळआपट, पत्रकबाजी झाली आणि हे प्रकरण निवळले.

निमंत्रण स्वीकारण्यामागची भूमिका

सेंट्रल यॉर्क मिडल स्कूलने या सौंदर्यवतीला- नीना दवुलुरीला- या वर्षीच्या कार्यक्रमात ‘प्रमुख पाहुणी’ म्हणून पाचारण केले. सामान्यत: ‘मिस अमेरिका’ म्हणून निवड झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षभर या तरुणींवर विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचे बंधन करार करून टाकलेले असते. नीना दवुलुरीने हे निमंत्रण स्वीकारले.
‘माझ्या मायदेशाच्या संस्कृतीबद्दल अमेरिकन जनमानसात काही ठोकळेबाज ठरावीक (स्टिरिओटाईप) अपसमजुती (मिसकन्सेप्शन्स) आहेत, हा अनुभव घेतघेतच मी लहानाची मोठी झाली आहे. ‘आपण कसे आहोत,’ हे दाखवण्याची ही एक नामी संधी आहे, अशा भूमिकेतून मी हे निमंत्रण स्वीकारले. भाषणातून आणि प्रश्‍नोत्तरातून या समजुतींबाबत बोलत येईल, असे मला वाटत होते. समाजप्रबोधनाची ही संधी आपण साधलीच पाहिजे, असे मला वाटले.

‘आती क्या खंडाला?

या शाळेत बाराव्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी (वय वर्षे अठरा) पॅट्रिक फाव याने या कार्यक्र्रमात नीनाला एक फूल भेट दिले आणि नृत्यासाठी (प्रॉम- ‘आती क्या खंडाला?’ टाईप) पाचारण करण्याचे ठरविले. मित्रामित्रात याबाबत पैज लागली होती, असे म्हणतात. पॅट्रिकची ही वृत्ती त्याच्या मित्रमंडळीप्रमाणेच शाळेतही सर्वांच्या चांगलीच परिचयाची होती. त्याच्या ‘या’ बेताची कुणकुण शालेय प्रशासनालाही लागली. प्रशासनाने कार्यक्रम चालू असताना पॅट्रिकने असे काही करू नये, असे त्याला बजावले. हा कार्यक्रम परस्परांच्या सांस्कृतिक परिचयाच्या दृष्टीने आयोजित असल्यामुळे यावेळी असे करणे योग्य नाही, अशी प्रशासनाची भूमिका होती. एरवी असे प्रकार अमेरिकेत आणि तेही ‘मिस अमेरिके’च्या संबंधात होणे, हे स्वाभाविकच मानले जाते. प्रशासनाचेही असेच मत होते. ‘पण ही ती वेळ नव्हती.’
नीनाला कार्यक्रम सुरू असतानाच पॅट्रिकने फूल भेट दिले आणि नृत्यासाठी निमंत्रित (प्रॉमपोजल) केले. नीनाने फूल स्वीकारीत ही बाब हसण्यावारी नेली. पण प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत पॅट्रिकला तीन दिवसांसाठीची निलंबनाची शिक्षा केली.

बिच्चारा पॅट्रिक!

पॅट्रिकच्या समर्थनार्थ अमेरिकन जनता, सोशल व प्रिंट मीडिया निरनिराळी टीव्ही चॅनेल्स उभी झाली. या प्रश्‍नाला अमेरिकेतच नव्हे, तर जगभर प्रसिद्धी मिळाली. सगळे जण पॅट्रिकच्या बाजूने उभे झाले.
स्वत: नीनाला जेव्हा हे वृत्त कळले, तेव्हा तिनेही प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे सुचविले. देशभरातील विद्यार्थ्यांत मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, हा ‘मिस अमेरिका’ या नात्याने माझ्यासाठी महत्त्वाचा आणि सन्मानाचा विषय आहे, असे ती म्हणाली. शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार करावीत, मेधावी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांचा परिचय त्यांच्या भेटीतून मला होत असतो आणि यातून मलाही प्रेरणा मिळत असते. पण माझे कार्यक्रम अगोदरच ठरलेले असल्यामुळे पॅट्रिकच्या निमंत्रणाचा स्वीकार मला करता येत नाही.
पॅट्रिकचे म्हणणे असे आहे की, मी स्वत:ला आवरू शकलो नाही. त्याच्या दुसर्‍या साथीदाराने या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण केले आहे. नीनाने सुहास्यवदनाने माझी फुलाची भेट स्वीकारली. ‘बघू या पुढे कधी’, असे भाव मला तिच्या चेहर्‍यावर दिसले.
अमेरिकेतील जनमानस, एकजिनसी अमेरिकन समाज निर्माण होण्याच्या दिशेने केले जाणारे प्रयत्न, शालेय कार्यक्रमांचे स्वरूप, सैल स्त्री-पुरुष संबंध, शालेय प्रशासनाची विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची आग्रही भूमिका, देशोदेशीच्या प्रथा, परंपरा, नैतिकतेच्या कल्पना यांचा परिचय होण्याचे आणि आपल्यालाही अंतर्मुख करण्याचे दृष्टीने हा ‘कथाभाग’ उपयोगी पडेल, असे वाटते.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०


Tuesday, April 22, 2014

Sooryanelli's Letter

आक्रोश

तारीख: 20 Apr 2014 23:55:10

सूर्यानेल्लीचे निर्भयाला दुसरे पत्र

निर्भये, माझे हे तुला दुसरे पत्र. गेल्या वेळेला पाठविलेल्या पत्रात तुला माझी अगतिकताच जाणवली असणार. त्या पत्रानंतर तू गेलीस आणि सुटलीस खरी पण मी मात्र कोर्टकचेरीत बलात्कारित स्त्रीच्या वाट्याला काय काय आणि कोणकोणते भोग येतात याचेच रडगाणे गायल्याचे तुला आठवत असेल. शरीराच्या आणि मनाच्या विव्हल अवस्थेत मी पार खचून गेले होते हे खरे, पण मी स्वत:ला सावरले आणि हिमतीने लढण्याचा निश्‍चय केला. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विसंबून मी बळेच खंबीरपणा धारण केला केला. मी टाकलेला विश्‍वास फलद्रूप झाला. कनिष्ठ न्यायालयांनी न्याय नाकारल्यामुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. तेव्हा कुठे मला न्याय मिळाला. या न्यायालयाच्या निर्देशानुसार केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. टी. शंकरन आणि एम. एल. जोसेफ यांनी मुख्य आरोपी राजू याला- माझ्या एकेकाळच्या प्रियकराला- मला चाळीस नराधमांपुढे पैशाच्या मोबदल्यात लचके तोडण्यासाठी फेकणार्‍या दानवाला १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मला खरेदी करणार्‍या उषालाही १० वर्षांची सक्तमजुरी झाली. यातील एक आरोपी वकील धर्मराजन याला मात्र जन्मठेप सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायासनापुढे ३१ आरोपी होते. यापैकी पाच जण खटला सुरू असतानाच मरण पावले होते. देवाने त्यांचा न्यायनिवाडा स्वत:च केला होता. त्यांच्यापैकी कसे कुणास ठावूक पण सात आरोपी करूनसवरूनही निर्दोष सुटले. ७ जणांना १० वर्षे तर १५ जणांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. याशिवाय त्या त्या प्रमाणात दंडाची शिक्षासुद्धा ठोठावण्यात आली.
केरळ प्रांतातील इडुक्की गावातली सूर्यानेल्ली नावाची मी एक शाळकरी मुलगी. एका बस सफाई करणार्‍याच्या प्रेमात पडले. तेव्हा माझे वय होते अवघे १४. आमच्या प्रेमाच्या आणाभाका झाल्या, लग्नानंतर तुला दागिन्यांनी मढवीन असे वचन त्याने मला दिले होते. प्रेम आंधळे असते पण हा तर आंधळेपणाचा कळसच होता, असे आता मला वाटते. १६ जानेवारी १९९६ हाच तो माझ्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस. याच दिवशी माझे अपहरण झाले. माझी पहिली खरेदीदार उषा नावाची एक महिलाच असावी, याबद्दल काय म्हणावे? माझा दुसरा खरेदीदार होता एक कायद्याचा रक्षक म्हणजे कायदा जाणणारा वकील. सतत चाळीस दिवस माझी केरळ आणि तामिळनाडू प्रांतात हजारो किलोमीटरची फरफट झाली. या काळात एकूण ४२ नराधमांनी माझे लचके तोडले आणि नंतर माझी तब्येत खूपच खालावल्यामुळे मला काही पैसे देऊन अक्षरश: रस्त्याच्या कडेला २५ फेब्रुवारीला फेकून दिले. मी कशीबशी घरी पोहोचली. ही ससेहोलपट मी अनेक वेळा कोर्टात सांगितली म्हणून माझ्या लक्षात राहिली असे नाही. हे दुष्ट स्वप्न मला प्रतिक्षणी भेडसावत असे.
‘सूर्यानेल्ली ही बहकलेली मुलगी नव्हती. ती बालवेश्या तर मुळीच नव्हती. ती बालवयात राजूवर प्रेम करीत होती, हे खरे. ती दागिन्यांना भुलली होती, हे देखील खरे, तसेच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, हेही खरे, पण म्हणून ती चाळीस दिवस अत्याचार सहन करीत राहिली, असा याचा अर्थ नाही. या सर्व प्रकाराला तिची संमती होती, असे मानता येणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद करून बचावपक्षाचा युक्तिवाद सपशेल फेटाळला. अनेकांना कारावासाची शिक्षा ठोठावली.
१९९९ साली सत्र न्यायालयाने ४० पैकी ४ आरोपींना सोडले होते. राजू आणि मला खरेदी करणारी पहिली महिला उषा या दोघांना १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. ऍड. धर्मराजन याला मात्र जन्मठेपच सुनावली होती. अन्य आरोपींना विविध गुन्ह्यांखाली कारावासाची शिक्षा दिली होती. अपिलानंतर उच्च न्यायालयाने राजूची १३ वर्षांची शिक्षा रद्द करून त्याला फक्त पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा दिली होती. अन्य सर्वांना सोडून दिले होते. पण या निर्णयाविरुद्ध शासन सर्वोच्च न्यायालयात अपिलात गेले. निर्भया, तुला आठवत असेल तुझ्यावर झालेल्या निर्घृण अत्याचारानंतर सरकारची झोप उघडली. नवे कायदे आले आणि तुला तर काही दिवसांतच न्याय मिळाला. मला मात्र आठ वर्षे लागली. आठ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एक उच्च न्यायालयाचे खास पीठ स्थापन करण्याचे आदेश दिले. मधल्या काळात राजू फरार झाला होता. पण एका बेसावध क्षणी तो एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देण्यास तयार झाला. त्याला अटक करण्याचे आदेश मिळताच त्याला जेेरबंद करण्यात आले आणि नुकतीच त्याला शिक्षा सुनावण्यात आली. अशा प्रकारे मला १८ वर्षांनंतर न्याय मिळाला. निर्भये, अशी आहे माझी कर्मकहाणी! आज मला न्याय मिळाल्याचे समाधान आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, माझे हे दुर्दैवाचे दशावतार ऐकून, पाहून माझ्यासारख्या माझ्या बहिणींनी वेळीच सावध व्हावे, स्वप्नरंजनात बुडून जाऊ नये, खोट्यानाट्या भूलथापांना बळी पडू नये, असा माझा त्यांना सावधानतेचा आणि कळकळीचा इशारा आहे.
- वसंत गणेश काणे, पुणे

Thursday, April 17, 2014

Whom to Vote and Why

मतदान, पवित्र कर्तव्य
पण मतदान कुणाला आणि का?  
            वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
नगरसेवक –गटारे,ड्रेनेज,स्थानिक स्वच्छता , शुद्ध पाणी पुरवठा सार्वजिनक आरोग्य यासारख्या  पायाभूत सुखसुविधा चांगल्या मिळाव्यात म्हणून
आमदार – राज्य पातळीवरचे उद्योग, शिक्षण,कृषी, रोजगार, कर निश्चीति,य बाबतीतले धोरण ठरविणे, स्थानिक विकास कामे
खासदार – राष्ट्रीय सुरक्षा,आंतरराष्ट्रीय व्यापार, मागास वर्गाचा विकास, भ्रष्टाचार, महागाईला आळा, उद्योग, शिक्षण, कृषी, याबाबतीतले राजकीय धोरण ठरवण्यासाठी, स्थानिक विकास कार्याला केंद्राकडून मिळणारा निधी उपलब्ध करून देणे
स्थानिक, राज्य पातळीवरचे आणि राष्ट्र पातळीवरचे प्रश्न यात गल्लत नको. (निवडणूक आयोगानेही मार्गदर्शन करावे.)
Part XI of the Indian constitution defines the power distribution between the federal government (the Centre) and the States in India. This part is divided between legislative, administrative and executive powers. The legislative section is divided into three lists: Union list, States list and Concurrent list. Unlike the federal governments of the United States, Switzerland or Australia, residual powers remain with the Centre, as with the Canadian federal government.

Federalism in India has a strong bias towards the Union Government. Some unique features of federalism in India are:[1]

There is no equality of state representation. Representation in the Parliament can vary widely from one state to another depending on a number of factors including demography and total land area.
No double citizenship, i.e. no separate citizenship for country and state.
The consent of a state is not required by the Parliament to alter its boundaries.
No state, except Jammu and Kashmir, can draw its own Constitution.
No state has the right to secede.
No division of public services.[citation ne
Legislative powers[edit]
The power of the states and the Centre are defined by the constitution and the legislative powers are divided into three lists. i.e.[2]

Union List[edit]
Main article: Union List
Union list consists of 100 items (previously 97 items) on which the parliament has exclusive power to legislate with including: defence, armed forces, arms and ammunition, atomic energy, foreign affairs, war and peace, citizenship, extradition, railways, shipping and navigation, airways, posts and telegraphs, telephones, wireless and broadcasting, currency, foreign trade, inter-state trade and commerce, banking, insurance, control of industries, regulation and development of mines, mineral and oil resources, elections, audit of Government accounts, constitution and organisation of the Supreme Court, High Courts and union public service commission, income tax, custom duties and export duties, duties of excise, corporation tax, taxes on capital value of assets, estate duty, terminal taxes.[3]

State List[edit]
Main article: State List
State list consists of 61 items (previously 66 items). Uniformity is desirable but not essential on items in this list: maintaining law and order, police forces, healthcare, transport, land policies, electricity in state, village administration, etc.The state legislature has exclusive power to make laws on these subjects. But in certain circumstances,the parliament can also make laws on subjects mentioned in the State list.Then the parliament has to pass a resolution with 2/3rd majority that it is expedient to legislate on this state list in the national interest.

Though states have exclusive powers to legislate with regards to items on the State list, articles 249, 250, 252, and 253 state situations in which the federal government can legislate on these items.[3]

Concurrent List[edit]
Main article: Concurrent List
Concurrent list consists of 52 items (previously 47 items). Uniformity is desirable but not essential on items in this list: Marriage and divorce, transfer of property other than agricultural land, education, contracts, bankruptcy and insolvency, trustees and trusts, civil procedure, contempt of court, adulteration of foodstuffs, drugs and poisons, economic and social planning, trade unions, labour welfare, electricity, newspapers, books and printing press, stamp duties.[3]

Administrative powers[edit]
The Union and states have independent executive staffs fully controlled by their respective governments and executive power of the states and the Centre are extended on issues they are empowered to legislate.[3]

Union control over states[edit]
See also: Article 356
According to the Article 356 of the Constitution of India, states must exercise their executive power in compliance with the laws made by the Central government. Article 357 calls upon every state not to impede on the executive power of the Union within the states. Articles 352 to 360 contain provisions which empower the Centre to take over the executive of the states on issues of national security or on the breakdown of constitutional machinery. Governors are appointed by the Central government to oversee states. The president can dissolve the state assembly under the recommendation of the council of ministers by invoking Article 356 if and when states fail to comply with directives given by the Centre.[3]

The Constitution provides that, except in a few cases, union law trumps state law. If any provision of a law made by the Legislature of a State is repugnant to any provision of a law made by Parliament which Parliament is competent to enact, or to any provision of an existing law with respect to one of the matters enumerated in the Concurrent List, then, the law made by Parliament, whether passed before or after the law made by the Legislature of such State, or, as the case may be, the existing law, shall prevail and the law made by the Legislature of the State shall, to the extent of the repugnancy, be void. There is an exception to this in cases "where a law made by the Legislature of a State with respect to one of the matters enumerated in the Concurrent List contains any provision repugnant to the provisions of an earlier law made by Parliament or an existing law with respect to that matter, then, the law so made by the Legislature of such State shall, if it has been reserved for the consideration of the President and has received his assent, prevail in that State. Provided that nothing in this clause shall prevent Parliament from enacting at any time any law with respect to the same matter including a law adding to, amending, varying or repealing the law so made by the Legislature of the State."[4]
Suggested municipal functions[edit]
The suggested functions to municipal corporations, municipalities and nagar panchayats are listed in the table below.[3]

Essentially Municipal Functions     Municipal Corporation         Municipal Council   nagar panchayat
Urban planning including town planning       Yes   Yes   Yes
Regulation of land-use and construction of buildings   Yes         Yes   Yes
Planning for economic and social development    Yes   Yes         Yes
Roads and bridges  Yes   Yes   Yes
Water supply domestic, Industrial and commercial purposes         Yes   Yes   Yes
Public health, sanitation, conservancy and solid waste management   Yes   Yes   Yes
Fire services    Yes   Yes   No
Urban forestry Yes   Yes   Yes
Preventive Health Care   Yes   Yes   Yes
Provision of urban amenities and facilities such as parks, gardens, playgrounds     Yes   Yes   Yes
Burials and burial grounds, cremations, cremation ghats/grounds and electric crematoria  Yes   Yes   Yes
Cattle pounds, prevention of cruelty to animals   Yes   Yes         Yes
Vital statistics including registration of births and deaths         Yes   Yes   Yes
Street lighting Yes   Yes   Yes
Parking lots, bus stops and public conveniences  Yes   Yes         Yes
Regulation of slaughter houses and tanneries       Yes   Yes         Yes
Slum improvement and up gradation    Yes   Yes   Yes
Agency Functions
Protection of the environment and promotion of ecological aspects    Yes   Yes   Yes
Safeguarding the interests of weaker sections of society, including the handicapped and the mentally retarded Yes         Yes   Yes
Urban poverty alleviation       Yes   Yes   Yes
Promotion of cultural, education and aesthetic aspects         Yes   Yes   Yes
Primary Education  Yes   Yes   yes
Primary Health Care        Yes   Yes
yes
Mahanagar Nigam (Municipal Corporation)[edit]
Main article: Municipal Corporation of India
Mahanagar Nigam a.k.a. (Municipal Corporation) in India are state government formed departments that works for the development of a Metropolitan city, which has a population of more than 1 Million. The growing population and urbanisation in various cities of India were in need of a local governing body that can work for providing necessary community services like health centres, educational institutes and housing and property tax.

They are formed under the Corporations Act of 1835 of panchayati raj system which mainly deals in providing essential services in every small town as well as village of a district/city. Their elections are held once in five year and the people choose the candidates. The largest corporations are in the four metropolitan cities of India, namely Delhi, Mumbai, Kolkata and Chennai. These cities not only have a large population, but are also the administrative as well as commercial centres of the country.

Nagar Palika (Municipality)[edit]
Main article: Nagar Palika (Municipality)
In India, a Nagar Palika or Municipality or Nagar Nigam is an urban local body that administers a city of population 100,000 or more. However, there are exceptions to that, as previously nagar palikas were constituted in urban centers with population over 20,000 so all the urban bodies which were previously classified as Nagar palika were reclassified as Nagar palika even if their population was under 100,000. Under the Panchayati Raj system, it interacts directly with the state government, though it is administratively part of the district it is located in. Generally smaller district cities and bigger towns have a Nagar palika. Nagar palikas are also a form of local self-government, entrusted with some duties and responsibilities, as enshrined and guided upon by the Constitutional (74th Amendment)Act,1992.

The members of the Nagar palika are elected representatives for a term of five years. The town is divided into wards according to its population, and representatives are elected from each ward. The members elect a president among themselves to preside over and conduct meetings. A chief officer, along with officers like an engineer, sanitary inspector, health officer and education officer who come from the state public service are appointed by the state government to control the administrative affairs of the Nagar Palika.

Nagar Panchayat (Notified Area Council)[edit]
Main article: Nagar Panchayat (Notified Area Council)
A Nagar Panchayat or Notified Area Council or City Council is a form of an urban political unit in India comparable to a municipality. An urban centre with more than 11,000 and less than 25,000 inhabitants is classified as a "Nagar Panchayat".

Each Nagar Panchayat has a committee consisting of a chairman with ward members. Membership consists of a minimum of ten elected ward members and three nominated members. The N.A.C. members of the Nagar Panchayat are elected from the several wards of the Nagar Panchayat on the basis of adult franchise for a term of five years. There are seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, backward classes and women. The Councillors or Ward Members chosen by direct election from electoral wards in the Nagar Panchayat.

See also[edit]

   

Tuesday, April 15, 2014

Charlie Chaplin 16.04.2014

दिन विशेष

तारीख: 15 Apr 2014 23:56:35

विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन

$img_titleआज १६ एप्रिल रोजी जगविख्यात विनोदी अभिनेता, पहिल्या श्रेणीचा लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ता (प्रोड्यूसर), संगीतरचनाकार, कमालीच्या परिपूर्णतेचा पुरस्कर्ता आणि तरीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी... अशा अनेकविध गुणांचा एकाच व्यक्तिमत्त्वात समुच्चय असलेला करुणेचा कैवारी चार्ली चॅप्लिन यांची आज जयंती आहे. रंगभूमी म्हटली की शेक्सपिअर हा मापदंड मानला जातो. त्याचप्रमाणे सिनेमा म्हटला की, चार्ली चॅप्लिन असे समीकरण आहे. जेम्स बॉंड या पात्रानेही अफाट लोकप्रियता मिळविली. पण म्हणजे कुणालाही संपवण्याचा परवाना (लायसन्स टू किल) असलेल्या या पात्राची जातकुळी वेगळीच आहे. लॉरेल आणि हार्डी ही जोडगोळीही त्याकाळी खूप गाजली. एक जाड्या तर दुसरा रड्या, पण संपूर्ण कथानकात निखळ विनोद आणि हलकीफुलकी गंमत यांची रेलचेल म्हणजे लॉरेल आणि हार्डी यांचे चित्रपट. एक लठ्ठ आणि बराचसा बावळट, तर दुसरा काटकुळ्या शरीरयष्टीचा पण चतुर आणि समयसूचकता असलेला.
चार्ली चॅप्लिनचे असे नव्हते. त्याची स्वत:ची अशी स्वतंत्र शैली होती. ती काळ आणि संस्कृती यांचे बंधन तोडून स्वछंदपणे संचार करीत राहिली. त्याची कलाकृती अभिजात स्वरूपाची होती. अशा कलाकृतीची नक्कल करणे कठीण असते. तसेच तिला स्थळकाळाचे बंधन नसते. त्यामुळेच चार्ली चॅप्लिनचे त्याकाळचे बोलपटच नव्हेत, तर मूकपटही आजसुद्धा रसिकांच्या आवडीचे झाले आहेत.
चार्ली चॅप्लिनचे मूकपट गाजले ते त्यांच्या शब्दाशिवाय संवाद साधण्याच्या वैशिष्ट्यामुळे! कॅमेरा आणि स्वत:चे शरीर यांचा त्याने मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने उपयोग करून घेतलेला आढळतो. त्याचा मुद्राभिनय लाजबाब होता.
चार्ली चॅप्लिनच्या वाट्याला ८८ वर्षांचे दीर्घायुष्य आले होते. कलाकार म्हणून त्याची कारकीर्द सुमारे ६० वर्षांची होती. त्याने आपल्या दीर्घायुष्याचे सोने केले, असेच म्हटले पाहिजे. आपल्या कार्यकाळात त्याने अनेक चित्रपट निर्माण केले. विनोद, वक्रोक्ती, विडंबन यांचा आधार घेऊन सामाजिक अपप्रवृत्ती, राजकीय अरेरावी आणि हुकूमशाही, यांत्रिकतेने मानव्याची केलेली घुसमट, बळवंत आणि धनवंतांनी जनसामान्यांची केलेली ससेहोलपट, असा कोणता न कोणता अंत:प्रवाह त्याच्या वरवर विनोदी वाटणार्‍या सर्वच कलाकृतींचा स्थायीभाव राहत आला आहे. याचा एक परिणाम असा झाला की, त्याची गणना केवळ प्रस्थापितांचा विरोध करणारा अशी झाली नाही, तर तो साम्यवादाची भलावण करतो, असे लोक म्हणू लागले. अमेरिकेने त्याला साम्यवादाचा समर्थक ठरविले आणि त्याला देश सोडण्यास भाग पाडले.
चार्लीचे बालपण लंडन येथे गेले. अपार दारिद्र्य आणि विपन्नावस्था यांचा सामना त्याने काबाडकष्ट करून केला. त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची आई वेडी झाल्यामुळे (सायकॉसिस) तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्याची प्रत्येक कलाकृती विनोद आणि कारुण्याची किनार घेऊन येते, याचे कारण आईचे हे वेडेपण तर नसेल ना? काबाडकष्ट करूनही दोन वेळी पोटाची खळगी भरणे कठीण व्हावे हा अनुभव, त्याला कष्टकरी लोकांबाबत वाटणार्‍या अनुकंपेच्या मुळाशी तर नसेल ना? तरुणपणीच त्याला दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्याच्या लोकप्रियतेची कमान यानंतर उंचावतच गेली आणि तो जागतिक कीर्ती संपादन करता झाला.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चार्ली अमेरिकेत गेला. एका प्रतिष्ठाप्राप्त सिनेकंपनीशी त्याचे करारमदार झाले. १९१४ साली त्याचा मूक चित्रपट- ‘मेकिंग अ लिव्हिंग’ रसिकमान्य झाला. १९१९ साली त्याने युनायटेड आर्टिस्ट नावाची स्वतंत्र सिनेकंपनी काढली. आता त्याच्यावर कोणतेच बंधन उरले नाही. आपल्या कलाकृतीवर त्याला संपूर्ण नियंत्रण ठेवता येऊ लागले. १९२१ साली त्याने ‘द किड’ (एका अनाथ मुलाचे अनिच्छेने पालकत्व स्वीकारलेल्या मुलाची कथा), १९२३ मध्ये ‘वूमन इन पॅरीस’ (अपघाताने ताटातूट झालेल्या प्रेमिकांची कथा), १९२८ मध्ये ‘दी सर्कस’ (जगाला हसवणार्‍या विदुषकाची कथा) अशा एकाहून एक सरस कलाकृतींची भेट त्याने रसिकांना दिली. १९२९ साली त्याच्या अभिनयासाठी त्याला ऍकेडेमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
आता बोलपटांचा जमाना येऊ लागला होता, पण चार्ली मूकपटच काढत राहिला. १९४० साली त्याने ‘द ग्रेट डिक्टेेटर’ (ज्यू लोकांच्या छळाची कथा) हा चित्रपट काढला. यात केवळ हुकूमशहांची टिंगलटवाळी नाही, तर हुकूमशाहीवर कोरडे ओढले आहेत. असे म्हणतात की, हुकूमशहांचे विनोदाशी वावडे असते. ते प्रत्यक्ष शत्रूला जेवढे घाबरतात त्यापेक्षा विनोद, उपहास आणि विडंबन यांचा त्यांनी जास्त धसका घेतलेला असतो. कारण, प्रस्थापितांचा बुरखा फाडण्याचे या प्रकाराचे महत्त्व वादातीत आहे. यानंतरची अनेक वर्षे मात्र चार्लीने वादग्रस्ततेत घालविली. त्याच्या कीर्तीला ओहोटी लागली.
अमेरिकेचे गुप्तहेर खाते हात धुऊन चार्लीच्या मागे लागले. ‘द ग्रेट डिक्टेटर’मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीच्या अनेक लोकांना आपलीच प्रतिमा दिसू लागली. हे आरशाला दोष देण्यासारखे होते. शेवटी चार्लीने अमेरिका सोडली आणि तो स्वित्झर्लंडमध्ये येऊन स्थायिक झाला. नंतर त्याने मूकपटामधली आपली भटक्याची (ट्रॅम्प) भूमिका करणे सोडून दिले. यानंतर चित्रविचित्र हालचाली व स्वत:विषयी दया उत्पन्न करणार्‍या भावना यांचा सुंदर मेळ त्याच्या भूमिकांमधून प्रकट होऊ लागला. प्रतिकूलतेवर मात, सामाजिक आशयप्रधान कथानक, राजकीय वैचारिक भूमिका त्याच्या चित्रपटातून दिसू लागल्या.
१९७१ साली कलाविष्काराचा एक प्रकार म्हणून चित्रपटाला मान्यता मिळवून देणारा शतकातला एकमेव चित्रकर्मी, असा त्याचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि डरहॅम विद्यापीठाने चार्ली चॅप्लिनला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पदवीने सन्मानित केले. १९७२ साली त्याला व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन लॉयन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ साली न्यू इयर ऑनर्स अंतर्गत चार्लीला ‘नाईट कमांडर ऑफ मोस्ट एक्सलन्स ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ आणि फ्रांस सरकारने ‘कमांडर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजियन ऑफ ऑनर’ने गौरवान्वित करण्यात आले. चार्लीच्या आणखी दोन चित्रपटांना ऍकेडेमी अवॉर्ड मिळाले. चार्लीवर नंतर तर पुरस्कारांचा अक्षरश: पाऊसच पडला! त्याच्या मूकपटातील संगीताचा महिमा म्हणजे अनेक भारतीय संगीतकारांनी त्याच्या चित्रपटातील संगीतावरून गाण्याच्या चाली रचल्या. अखेरपर्यंत तो युरोपातच वास्तव्य करून होता. खोटे आरोप, अपप्रचार, पीत पत्रकारिता (यलो प्रेस) यांचे शुक्लकाष्ठ त्याची पाठ सोडत नव्हते. तो स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेत असे. अशा माणसाला अमेरिकेत राहणे अशक्य व्हावे, याचे त्याला सखेद आश्‍चर्य वाटत असे. वयाच्या ८८ व्या वर्षी २५ डिसेंबर १९७७ ला या लोकविलक्षण अवलिया कलाकाराने जगातून एग्झिट घेतली ती मात्र कायमचीच. पण, येथेही नियतीने वेगळाच डाव खेळला. काही समाजकंटकांनी चार्लीचे शव उकरून त्याचे अपहरण केले व त्याच्या पत्नीकडे खंडणी मागितली. नंतर पोलिसांनी ते प्रेत महत्प्रयासाने हस्तगत केले व नंतरही सन्मानाने दफन केले. चित्रपटाच्या इतिहासात चार्ली चॅप्लिन आपले नाव अजरामर करून गेला.
वसंत गणेश काणे , पुणे

Benjamin Franklin 15.04.2014


आधुनिक अमेरिकेचा पाया रचणारा बेन्जामिन फ्रँकलीन
(१७ जानेवारी १७०६ -१७ एप्रिल १७९०)
            वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
अमेरिकेचा खरा इतिहास हा तसा २५० वर्षांचाच म्हटला पाहिजे. इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी, स्पेन, इटली या सारख्या देशातून छळाला, दारिद्र्याला कंटाळून नशीब आजमावण्यासाठी किंवा अनेकदा परागंदा झालेले लोक अमेरिकेत आले आणि स्थायिक झाले.या खंडप्राय देशाचा आकार भारताच्या चौपट आणि लीक्संख्या मात्र एक चतुर्थांश एवढीच आहे. सागराची बरोबरी करू पाहणारी जगातली पाच मोठी सरोवरे म्हणजे सुपीरियर (३१,७०० चौरस मैल क्षेत्रफळ), मिशिगन(२२,३०० चौ मैल), ह्युरॉन( २३,००० चौ मैल), इरी(९,९०० चौ मैल) आणि आँटोरियो (७,३४० चौ मैल) अमेरिकेच्या वाट्याला आली असून जगातला शुध्द पाण्याचा एक चतुर्थांश साठा या सरोवरात आहे, असे म्हणतात. अमेरिकन लोकांना सर्व गोष्टींची तपशीलवार नोंद करून ठेवण्याची सवय आहे. १६०० साल पासूनचा इतिहास विल्य्म्सबर्ग येथे जपून ठेवला आहे.एका जर्मन मुख्याध्यापिकेने आपले पूर्वज कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला, कोणत्या बोटीने, कोणत्या समुद्रकिनारी येऊन पोचले होते, याची तपशीलवार माहिती सांगितली होती.
अमेरिकेचे हवामान अत्यंत लहरी आणि बेभरवशाचे आणि उष्णतामानात टोकाचे बदल होणारे आहे. पावसाचे थैमान, कडाक्याची थंडी, हिम वादळे, अनेक फुटी बर्फाचे थर, घनदाट जंगले, खोल दऱ्या, रणरणते उन असलेली वाळवंटे असे निसर्गनिर्मित संभाव्य सर्व प्रकार अमेरिकेत सापडतात. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर अमेरिकेने मात केली आहे. ती तक्रार करीत बसली नाही. या कामी कुणा एका व्यक्तीचे विशेष योगदान असेल तर ते बेन्जामिन फ्रँक्लीन या महापुरुषाचे!
अमेरिकेची वैशिष्ट्ये
देशाचा विस्तार खूप मोठा आहे का? मग मखमली, गुळगुळीत, मैलोगणती वळणे नसलेले सहा ते आठ पदरी रस्ते बांधले. तरीही वेळ लागतो आहे का? तशी ७० मैल किमान वेगाने वाहन चालविण्याचे बंधन घातले. हवामान लहरी आहे का? घरे, गाड्याच नव्हेत तर, अख्ख्या शाळा, इमारती  वातानुकुलीत केल्या. दूर अंतरामुळे संपर्क साधने कठीण होते आहे का? उत्तम दूरध्वनी व्यवस्थापन निर्माण केले. ‘ यू आर ओन्ली अ फोन कॉल अवे’ हा तिथला परवलीचा शब्दप्रयोग झाला आहे. अमेरिकेतील दिवस उन्हाळ्यात सकाळी ५ ते रात्री ९ असतो तर थंडीत सकाळी ८ ते दुपारी ४ असा आहे ना? मग थंडीत ऑक्टोबरमध्ये शेवटच्या शनिवारी घड्याळे एक तास मागे करा तर एप्रिलच्या पहिल्या शनिवारी पूर्ववत करा. अशाप्रकारे उजेडाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.
प्रगतीमागचे रहस्य
केवळ अडीचशे वर्षात अमेरिकेने ही प्रगती कशी काय साध्य केली? ह्याची उत्तर  दोनच आहेत. अपार कष्ट आणि सतत नवनवीन शोध! अमेरिका म्हटली की लोकांना आठवते ती चैन, गुन्हेगारी, जुगार, घटस्फोट, सैल स्त्रीपुरुष संबंध आठवतात पण अमेरिकन लोकजीवनाचा  हा अर्धाच भाग आहे. तोच सर्वपरिचीत आहे. पण उरलेला अर्धा भाग महत्वाचा आणि अनुकरणीय आहे. जीवन सुखकर व्हावे यासाठी अमेरिकेने ध्यास घेतला असून नित्य नवे शोध लावावेत, नवनवीन कल्पना पुढे याव्यात, यासाठी अमेरिकेत प्रोत्साहन दिले जाते. कम्पन्या शोध विकत घेतात, लगेच त्यावर आधारलेले उत्पादन बाजारात  आणतात. संशोधक आणि कंपन्या या दोघांचे ही भाग्य फळफळते शिवाय,जनतेचीही सोय होते ते वेगळेच.
फ्रँकलीनची पत्रकारिता
प्रारंभी फ्रँकलीनने उमेदवारी केली.भावाच्या वृत्तपत्रात (न्यू इंग्लंड करंट)मध्ये तो सायलेन्स डॉगुड असे एका विधवेचे टोपणनाव घेऊन तो महिलांच्या बाबतीतल्या अन्यायकारक वागणुकीबाबत पत्रे पाठवीत असे. ही पत्रे खूप गाजली. १६व्या पत्रानंतर तो प्रकट झाला. भावाला त्याचा हेवा वाटे. पुढे त्याने छापखाना विकत घेऊन तो मुद्रक बरोबर संपादकही झाला. तो टोपणनावाने व्यंगचित्र काढत असे. राजकीय व्यंगचित्रकारितेचा तो  जनक मानला जातो. तो नंतर त्याने कॅलेंडरही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यात हवामान, पाककृती, भविष्य आणि चिंतनपर लिखाण असे. जणू आपले ‘कालनिर्णय’ यावरूनच बेतले असावे असे वाटते. अमेरिकेतील पहिले पोस्ट ऑफिसही त्याने फिलाडेल्फिया येथे सुरु केले.
असाही  होता फ्रँकलीन
या सर्व नवीन आणि सुधारित तत्त्वप्रणालीचा उद्गाता, पुरस्कर्ता आणि प्रतिपादक म्हणून बेन्जामिन फ्रँकलीन  ओळखला जातो. एडिसन आणि टेलिफोनचा जनक अलेक्झांडर बेल त्याला गुरुस्थानी मानीत. बेन्जामिन फ्रँकलीन हा शास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी, तत्त्वज्ञानी, उद्योजक, संगीतज्ञ होता. आपल्याला सगळ्यांना त्याची एक कथा प्रमुखपणे  माहित आहे. पतंगीच्या दोऱ्याला त्याने लोखंडाची किल्ली बांधून आकाशात पाठविली आणि ढगातील वीज जमिनीवर आणली, अशी काहीशी ती कथा आहे. पण बॅटरी, कंडक्टर, धन व ऋण विद्युत हे त्यानेच बारसे केलेले शब्द आहेत. वीजवाहक (लाईटनिंग कंडक्टर) चा शोध त्यानेच लावला. आकाशातून विजेचा लोळ कोसळून इमारतीचे नुकसान होऊ नये म्हणून वीजवाहकाच्या तारेचे एक टोक इमारतीच्या वर ठेवायचे आणि दुसरे टोक खाली जमिनीत प्रायचे अशी ही व्यवस्था असते. यामुळे ढगातील वीज हळूहळू निष्क्रिय होते किंवा वीज पडलीच तर ती या तारेतून इमारतीला नुकसान न करता निघून जाते. घोड्यावर आरूढ होऊन त्याने वादळाचा पाठलाग करून त्याचा वेग मोजण्याचे तंत्र विकसित केले. अमेरिकेतील हवामान खात्याचा तो जनक मानला जातो. इंग्लंड बरोबर बोलणी करण्यासाठी तो अनेकदा बोटीने इंग्लंडला जाऊन आला. पण जाता जाता त्याने गल्फ स्ट्रीमचे मापन करून आखणीही केली. अटलांटिक महासागरातील उष्ण पाण्याचा हा वेगवान जबरदस्त प्रवाह फ्लोरीडापाशी उगम पावतो, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला उब देऊन पुढे द्विभाजित होतो व त्याची एक शाखा उत्तर युरोपकडे तर दुसरी शाखा पश्चिम आफ्रिकेच्या दिशेने जाते. आपली दृष्टी अधू झाली, दूरचे पाहण्यासाठी एक चष्मा तर जवळचे पाहण्यासाठी दुसरा चष्मा अशी अवस्था टाळण्यासाठी त्याने बायफोकल रचना शोधून योजली. त्याची बायको झुलत्या खुर्चीवर बसून विणकाम करीत असे. याने खुर्चीला दोरी बांधून ती रवी भोवती गुंडाळली. आता झुलणे, विणकाम आणि ताक घुसळणे एकाचवेळी होऊ लागले. या तीन कामांना लागणारा वेळ तिपटीने कमी झाला.
स्थापन केलेल्या संस्था
आगीचा विमा काढण्याची कल्पना त्याचीच. फिलाडेल्फियामधील अग्निशामक दल त्यानेच उभारले. रात्री गस्त घालण्याची प्रथा सुरु करून नागरिकांना सुखाची झोप घेता येईल, अशी तजवीज केली. त्या काळी पुस्तके महाग होती. त्यांचा तुटवडा असे. यावर उपाय म्हणून त्याने फिरते वाचनालय सुरु केले. युपेनची (युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया) स्थापना त्यानेच केली या युनिव्हर्सिटीची गणना आजही जगातल्या पहिल्या दहा उत्तम विद्यापीठात होते. पेन्सिल्वेनिया हॉस्पिटल त्याने स्थापन केले फिलॉसॉफिकल सोसायटीसुद्धा त्यानेच स्थापन केली. १८ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास स्थापन झालेल्या या संस्था आजही उत्तमपणे कार्यरत आहेत. घर ऊबदार रहावे म्हणून त्याने फ्रँकलीन स्टोव्हची रचना केली पण या शोधाचे पेटंट घेतले नाही.
इंग्लंड आणि अमेरिका
१७५७ ते १७७५ या काळात त्याने वसाहतींच्या हक्कासाठी इंग्लंडशी लढे दिले. या काळात एक गव्हर्नर वरकरणी वसाहतीवाल्यांची बाजू घेई पण आतून इंग्लंडला गुप्त खलिते पाठवी फ्रँकलीनने हे गुप्त खलिते फोडले. या ‘स्टिंग ऑपरेशन’साठी त्या व्हाईट हॉल (इंग्लंडचे शासकीय कार्यालय ) येथे बोलवून त्याला जाहीर तंबी देण्यात आली. त्याचा मुलगा विल्यम हा ब्रिटिशधार्जिणा होता. पितापुत्रात अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावरून झालेले मतभेद शेवटपर्यंत कायम राहिले. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जेफरसनने तयार केला पण या कामी फ्रँकलीनचेही महत्त्वाचे योदन होते. १७७६ मध्ये फ्रँकलीनने या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. फ्रान्समध्ये तो अमेरिकेचा वकील म्हणून गेला आणि त्याने फ्रेन्चांची मने जिंकली. १७८३ मध्ये त्याने केला करार ‘पॅरिस करार’ म्हणून प्रसिद्ध आहे. १७ एप्रिल १७९० मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या अंत्ययात्रेला २० हजार लोक उपस्थित होते.
         फ्रँकलीनची बोधवचने
फ्रँकलीनची डझनावारी बोधवाक्य आहेत. आपण फ्रँकलीनचे शब्दप्रयोग वापरीत आहोत, हे अनेकदा काळतही नाही. उदाहरणार्थ:-
१.‘अर्ली टू बेड  अँड अर्ली टू राईज, मेक्स अ मॅन हेल्दी,    वेल्दी  अँड वाईज’
२. ‘ गॉड हेल्प्स दोज, हू हेल्प देम्सेल्व्ज’  
३. ‘डोअर्स ऑफ विस्डम आर नेव्हर शट’
४. ‘लिव्ह दि प्लॅनेट बेटर, दॅन यू फाऊनड इट’