Wednesday, January 2, 2019

उज्ज्वला योजनेचे उज्ज्वल यश

उज्वला योजनेचे उज्वल यश
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
 2014  मध्ये 55 टक्के घरी स्वयपाकाचा एलपीजी गॅस होता 2019 च्या आरंभी ही टक्केवारी 90 टक्के इतकी झाली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेपैकी ही उज्ज्वला योजना एक प्रमुख योजना मानली जाते. गरिबांचा जीवनस्तर उंचावण्याच्या दृष्टीने विचार करता ही एक अत्यंत यशस्वी योजना मानली जाते.
   उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच 6 कोटव्या क्रमांकाच्या जोडणीची कागदपत्रे जस्मिना खातून नावाच्या दिल्लीनिवासी गृहिणीच्या स्वाधीन केली व एक महत्त्वाचा टप्पा या योजनेने पार केल्याचे दिसून आले. या योजनेचा शुभारंभ1मे 2016  ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्ये उत्तरप्रदेशातील बालिया या गावापासून  प्रारंभ झाला होता. यानंतर ही योजना एकापाठोपाठ एक टप्पा पार करीत 6 कोटव्या क्रमांक पार करती झाली आहे. या योजनेच्या लाभार्थींपैकी 45 टक्के लाभार्थी अनुसूचित जाती व जमातीमधील व दुर्बल आर्थिक घटकांपैकी आहेत.
  ‘भारतात गेल्या 50 वर्षात एलपीजी गॅस जोडण्या 13 कोटी घरात पुरवण्यात आल्या होत्या. तर गेल्या केवळ 54 महिन्यात सामान्य घटकांना पुरवलेल्या व उज्वला योजने अंतर्गत दुर्बल घटकांना पुरवलेल्या जोडण्यांची संख्याही 13 कोटीच्याच घरात जोते आहे’, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निमित्ताने बोलतांना सागितली.
  ‘लाभार्थींपैकी 80 टक्के लाभार्थी पुरवलेला पहिला गॅस संपल्यानंतर पुन्हा घेत आहेत. या घरांमध्ये सामान्यत: वर्षाला चार सिलेंडर गॅस लागतो आहे. या गतीने 2021 पर्यंत एकूणएक घरी गॅस पुनवठा केला जाईल, यात शंका नाही’,असे प्रधान यांनी पुढे बोलतांना सांगितले.


No comments:

Post a Comment