Friday, March 31, 2023

 कर्नाटकाचे वेगळेपण आणि विधानसभेच्या निवडणुका 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

राजकारणात भारताचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन भाग मानून विचार केला जातो. आंध्र, तेलंगणा, तमिलनाडू, कर्नाटक आणि केरळ ही राज्ये आणि पुडुचेरी यांचा समावेश दक्षिण भारतात  केला जातो. यापैकी कर्नाटक राज्य एक वेगळीच राजकीय विशेषता बाळगून आहे. फार मागे न जाता 30 वर्षे मागे जाऊन विचार करू या. या राज्यात सतत त्रिकोणी राजकीय संघर्ष होत आलेला आहे. ऊच्चवर्गीय जाती आणि लिंगायत या जाती भाजपकडे वळलेल्या दिसतात. वोक्कलिंगांचा कल जनता दल सेक्युलरकडे आहे. दलित, मुस्लीम आणि ओबीसींचा एक गट काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. 

    कर्नाटकातील जनतेची धर्मनिहाय विभागणी अशी आहे. हिंदू -84%, मुस्लीम- 13%, ख्रिश्चन-0.8%, जैन- 0.2 %, अन्य - 2%.कर्नाटकात बऱ्याच जनजाती आहे, त्या अशा, नायक, सोलिगा, येरावा. कर्नाटकात एक भले मोठे कुटुंब आहे. नरसिंगानवर्स हे एकत्र कुटुंब धारवाडमध्ये राहते. ते जगातले सर्वात मोठे एकत्र कुटुंब आहे.

जातीनिहाय विभाजन असे आहे. ओबीसी - 54%, दलित - 17.%, जनजाती(एसटी) - 7%, अन्य सामान्य -8%, अन्य -1% मुस्लीम 13% 

उप जातीगट - देवेगौडांचा व्होकलिंग गट 8%, सिद्धरामय्यांचा कुरुबा गट -5%, नाईकडा - 4%, आदि कर्नाटका 5%, येदियुरप्पांचा लिंगायत गट - 5%, ब्राह्मण -4%, मराठा - 3% , बिदर - 3%, गंगाकुला 2%,बंजारा - 2%,  उरलेल्या 15 उपजाती प्रत्येकी 1% आहेत. याचा अर्थ असा होतो की, इतर राज्यांपेक्षा कर्नाटकात सोशल इंजिनिअरिंगला कर्नाटकात भरपूर वाव आहे.

   कर्नाटकमध्ये राज्य सरकारने अनुसूचित जातींसाठी जाहीर केलेल्या अंतर्गत आरक्षणाच्या विरोधात बंजारा समुदायाच्या सदस्यांनी आंदोलन केले. 

  2013 मध्ये काँग्रेसला कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाले होते. हा अपवाद वगळला तर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत किंवा पुन्हा बहुमत मिळालेले नाही.

येदियुरप्पा हे लिंगायत, किंवा देवेगौडा हे वोक्कलिंग हे कर्नाटकातील दोन्ही प्रभावी नेते आता वयोवृद्ध झाले आहेत. आता 2023 च्या राज्यस्तरीय निवडणुकीत नवीन जातीय समीकरणे आकाराला येऊ शकतील का हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. प्रयत्न तर तिन्ही पक्ष करणार पण यश कुणाला मिळणार हे सांगणे कठीण आहे. आपल्या आजच्या जातीय आधाराला बाधा पोचू न देता प्रतिपक्षाच्या दावणीत असलेल्या जातींना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल, तो कर्नाटकात यशस्वी होईल, असे दिसते. वोकलिंग, दलित, जनजाती आणि ओबीसी यांच्यावर तिन्ही राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित असणार आहे. मोदींना मानणारे सर्व जातीच थोड्याफार प्रमाणात आहेत. पण राज्याच्या निवडणुकीत स्थानिक आणि राज्यस्तरीय मुद्द्यांना अनुसरून मतदार मतदान करतांना आढळतात. म्हणूनही बहुदा मोदी राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदारांचे लक्ष केंद्रित करीत असतात.

   कर्नाटक शासनाने शिक्षण संस्थात आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जातींचा कोटा 15 वरून 17 पर्यंत आणि अनुसूचित जमातीचा कोटा 3 वरून 7 पर्यंत वाढविणारा आरक्षणविषयक  ठराव पारित केला. हा ठराव अध्यादेशाची जागा घेणार आहे. यामुळे आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलंडली जात असली तरी कर्नाटक शासनाने हे पाऊल  आता 2023 मध्ये येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन  उचलले असल्याचा आरोप टीकाकार करीत आहेत. सद्ध्या असलेली 15 आणि 3 टक्यांची तरतूद जुन्या म्हैसूर राज्यातील आहे. 1948 साली म्हैसूर राज्य भारतात सामील झाल्यानंतर आणखी काही जाती व जमातींचा समावेश अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत केल्यामुळे कोटा वाढविणे आवश्यक झाल्याचे शासनाचे म्हणणे आहे. घटनेच्या  341 and 342 कलमांन्वये हा निर्णय शासनाने घेतला आहे. घटनेत नववी अनुसूची अशी आहे की, त्यात समाविष्ट केलेल्या राज्याच्या व केंद्राच्या कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. आजमितीला असे 284 कायदे या यादीत आहेत.  नववी अनुसूची 1951 पासून अस्तित्वात आहे. यामुळे वोकलिंग जमातीच्या नागरिकांना फायदा होणार आहे.

  गुजराथमधला पटेल जातीचा पाठिंबा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून  भाजपला आहे. लिंगायतांचे तसे नाही. लिंगायतांचा पाठिंबा येदियुरेप्पा या प्रभावी नेत्यामुळे आहे. येदियुरेप्पा जेव्हा भाजप सोडून बाहेर पडले होते तेव्हा भाजपची मते निम्म्याने कमी झाली होती. याची जाणीव असल्यामुळेच भाजप येदियुरेप्पांबाबत सांभाळून पावले टाकतांना दिसतो. त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. येदियरेप्पाना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला करताना भाजपने त्यांच्या मर्जीतले उमेदवार बोमई यांना मुख्यमंत्री केले आहे. मंत्रिमंडळातही 5%  लिंगायतांना 9 तर 8 % वोकलिंगांना 7 जागा दिल्या आहेत. अशा परिस्थितीत ही तारेवरची कसरत होती. जरा कुठे खुट्ट झाले की समतोल बिघडायला वेळ लागत नाही/ लागणार नाही. 

  कर्नाटकात सर्वच पक्षांना सूक्ष्म सामाजिक व्यवस्थापन (मायक्रो सोशल मॅनेजमेंट) अतिशय काळजीपूर्वक करावे लागणार आहे.

अशावेळी विचारधाराविषयक मुद्दे मागे पडतात आणि जातीय मुद्दे प्रभावी ठरतात. म्हणूनच म्हटले जाते की, ‘इंडियन्स डोन्ट कास्ट देअर व्होट्स, बट व्होट देअर कास्ट’! पक्षनिष्ठेपेक्षा जातिनिष्ठा प्रभावी ठरते. प्रत्येक पक्षात जातीनिहाय गट तयार होतात. आघाडी धर्म आणि आघाडीने स्विकारलेला किमान किमान सर्वमान्य कार्यक्रम यांना अर्थ उरत नाही. असे नसेल तर एका रात्रीतून ओबीसीमधील कुरुबा सदस्य सिद्धरामय्या या नेत्यासह जनता दल सेक्युलरला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसला जाऊन मिळतात याचा अर्थ कसा लावायचा?. एक आघाडी सोडायची आणि अगदी विरुद्ध पक्ष  किंवा आघाडीत सामील व्हायचं, यामागे कोणती तात्त्विक भूमिका शोधायची?

  कर्नाटकाचे वेगळेपण 

  20 व्या शतकात एक प्रभावी मुख्यमंत्री आणि त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र होण्याची मनोवृत्ती बंगाल, ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तिसगड, आंध्र, उत्तर प्रदेश या सारख्या राज्यात दिसून आली. कर्नाटक मात्र याला अपवाद ठरला आहे. गेल्या 30 वर्षात कर्नाटकात16 मुख्यमंत्री झालेले आपण पाहतो, ते या अपवादामुळेच! गटातटांच्या राजकारणांमुळे ही अस्थिरता कर्नाटकाच्या वाट्याला आली आहे. तरी बरे की, लढत भाजप, काँग्रेस आणि जदसेक्युलर अशी मुख्यत: त्रिकोणी होत असते.राजकीय पक्षांची सगळी कसरत जातीय हितसंबंध जपण्यात आणि एकाला खूश करतांना दुसरा नाराज होणार नाही हे पाहण्यात खर्च होत असते. कुणाचा पापड केव्हा आणि कशाने मोडेल ते सांगता येत नाही, अशी स्थिती असते. जातीय हितसंबंधाचे पारडे विचारधारेवरील निष्ठेपेक्षा नेहमीच जड असते, हा अनुभव कर्नाटक गेली 30 वर्षे घेत आहे. 

  काँग्रेसने एक मजबूत आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने यासाठी कुरबा समाजाच्या सिद्धरामय्या यांची निवड केली. दलित, अनुसूचित जमाती, मुस्लीम आणि ओबीसी यांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला या सर्वांची एकूण संख्या एकूण मतदारांच्या २/३ इतकी होते. हे समीकरण देवराज अर्स यांनी 1970 मध्ये उभे केले होते. याला 2013 या वर्षी चांगले यश मिळालेही. 1989 पर्यंत कर्नाटकात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले नव्हते. ही बाब 2013 मध्ये साध्य झाली होती. एक मजबूत आघाडी अशी या आघाडीची नोंद होत होती. दलित, मुस्लीम, जनजाती आणि कुरुबा हेच 45% होतात. पण पुढच्याच निवडणुकीत कुरुबा वगळून अन्य ओबीसी एकत्र आले आणि ते भाजपसोबत उभे राहिले. लिंगायत अगोदरच भाजपच्या साथीला होते. वोकलिंग जदसेकडे वळले होते.

   सद्ध्यातरी काँग्रेस आणि कुरुबा गटाचे  सिद्धरामय्या एकत्र आहेत. विचारधारेच्या दृष्टीनेही हे जवळ आहेत. त्यामुळे हा भाजपनिर्मित आगाडीसमोर एक मजबूत पर्याय म्हणून उभा राहू शकतो.

  काँग्रेसमधीलल वोकलिंग जातीच्या डी के शिवकुमार गट यांनी उरल्यासुरल्या गटांची मोट बांधली तरीही चालण्यासारखे आहे. देवेगौडाडाही. याच समाजाचे आहेत. कारण सत्तारूढ भाजपबाबत  नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी)  आहेच. तिचाही फायदा हा गट तयार झाला तर घेऊ शकेल.

  भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोमई(लिंगायत) यांना राज्यस्तरावर एक प्रभावी पर्याय काँग्रेस किंवा जनता दल सेक्युलर देऊ शकले तरी चांगली लढत देणे शक्य आहे. पण जेव्हा एक आघाडी योजनापूर्वक तयार केली जाते, तेव्हा अन्य गट जागे होऊन पर्यायी आघाडी आपोआप तयार होण्याची भीती असते, हे विसरून चालणार नाही.

  कुरुबा सिद्धरामय्या हा काँग्रेसचा मुख्य सामाजिक आधार असणार आहे. मध्य आणि उत्तर कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे विशेष प्रभुत्व आहे. तर वोकलिंग गटाचे शिवकुमार दक्षिण कर्नाटकात आपल्या गटावर पकड ठेवून आहेत.  वोकलिंग गट आज काँग्रेस आणि भाजप यात समप्रमाणात विभागला गेला आहे. भाजप नेत्या  शोभा करंडलाजे व्होक्कलिंग समाजाच्या आहेत. जनता दल सेक्युलर या पक्षाचे मात्र या विभाजनात नुकसान झाले आहे. त्याच्यासमोर तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 2019 या वर्षी 60% वोकलिंगांनी भाजपला मते दिली होती. पण असेच मतदान राज्याच्या निवडणुकीतही होईल, याचा काय भरवसा? इतर गटांशी नवीन सोयरीक करावी तर दलित असो वा मुस्लीम गट मुख्यमंत्रिपद मागणार. ही मागणी मान्य करायची तर निवडणूक लढवायचीच कशाला?

  कर्नाटकातील भाजप नेता, सतत 4दा आमदार असलेल्या  व विधान परिषद शिक्षक आमदार पुत्तन्ना यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप  आमदारकीची चार वर्षे शिल्लक असतांना आमदारकीचाही राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना जदएस मधून पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून काढून टाकल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची पक्षत्यागाची भाजपला किती किंमत चुकवावी लागेल ते लगेच सांगता येणार नाही. तेलंगणाचे आजचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा रक्षा समितीचे सर्वेसर्वा आता भारत रक्षा समितीचे प्रमुख झाले आहेत. अखिल भारतीय स्तरावरील राजकारणात पुढे यायचे आणि पुढे पंतप्रधान व्हायचे तर तेलंगणा रक्षा समितीचे रुपांतर भारत रक्षा समिती करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. या पक्षासोबत जनता दल सेक्युलर युती करण्याच्या विचारात आहे. ही युती होण्याची शक्यता भरपूर आहे कारण हैद्राबाद कर्नाटक सीमा भागात वोकलिंग जातीच्या मतदारांची संख्या मोठ्या संख्येत आहेत. 

भाजप,काँग्रेस   आणि जद सेक्युलर तिन्ही राजकीय पक्षांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. विरोधकांना हल्ले करायचे आहेत. खरे खोटे आरोप करून थांबले तरी चालणार आहे. भाजपला किल्ला लढवायचा आहे. प्रत्येक हल्ला परतवून लावायचा आहे. विरोधक रेवडीवाटप करण्यास मोकळे आहेत. भाजपला कोणतेही आश्वासन देतांना दहादा विचार करावा लागणार आहे. कारण त्याला पूर्ण करण्याची तयारी त्याला करावी लागणार आहे. जे निवडून येत नाहीत किंवा ज्यांना आपण निवडून येणार नाही, याची खात्री असते, ते कोणतेही आश्वासन देण्यासाठी स्वतंत्र असतात. राजकारणात केव्हा काय होईल, याचे भविष्य वर्तवणे कठीण आहे. पण कर्नाटकात अटीतटीची लढाई होईल, हे नक्की. विभागशहा तयार झालेले गट, जातीनिहाय आघाड्या आपापल्या भूमिकेवर अडून बसतील. या सर्वांवर मात करू शकेल अशी राज्यव्यापी लाट निर्माण करता आली तरच हे सर्व भूईसपाट होतील. असे घडेल का? यासाठी 13 मे ची वाट पहावी लागेल. 

Monday, March 27, 2023

 


जी20 आणि युक्रेनप्रकरणी चीनचा शांतताप्रस्ताव 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २८/०३/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

जी20 आणि युक्रेनप्रकरणी चीनचा शांतताप्रस्ताव 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    स्लाव्हिक भाषा हे अनेक भाषांचे कूळ आहे, असे भाषाशास्त्र मानते. या कुळात रशियन, युक्रेनियन, पोलिश, झेक अशा स्लाव्ह वंशीयात बोलल्या जाणाऱ्या भाषा येतात. व्होलोदिमिर हे युक्रेनमधील युक्रेनियन भाषेतले एक व्यक्तीसाठीचे नाव आहे. हेच नाव रशियन भाषेत व्लादिमीर असे उच्चारले जाते. थोडक्यात काय तर  युक्रेनमधला व्होलोदिमिर रशियात व्लादिमिर होतो. म्हणजे युक्रेनमधला व्होलोदिमिर (झेलेन्स्की)  म्हणजेच रशियातला व्लादिमीर (पुतिन) आहे की. म्हणजे आज एकाच नावाच्या या दोन व्यक्ती एकमेकींशी प्राणपणाने लढता आहेत. एक व्होलोदिमिर (झेलेन्स्की)  युक्रेनचे नेतृत्व करीत आहे तर दुसरा  व्लादिमीर (पुतिन) रशियाचे. असे चित्र कल्पनेत सुद्धा कुणा प्रतिभावंतानेही रंगवले नसेल. पण व्यवहारात ते राजकीय पटलावर प्रगट झाले आहे. 

   2023 मध्ये भारतभर संमेलने 

  जी20 जगातील 19 देश आणि युरोपीयन युनीयन यांची संघटना आहे. युरोपीयन युनीयन हा एक देश नाही, देशांचा समूह आहे.  असे हे एकूण 20 सदस्य आहेत. यात रशिया, चीन, अमेरिका यांच्यासह एकूण 20 देश सदस्य म्हणून उपस्थित असतात. युक्रेन मात्र जी20 चा सदस्य नाही. 

    युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात  सद्ध्या कोंडी  निर्माण झाली आहे. या युद्धात चीनने युक्रेनबाबतची आजवरची आपली वरवरची तटस्थ भूमिका सोडून  अधिक कडक भूमिका उघडपणे स्वीकारली आहे. भारताचे रशियाशी जसे स्नेहाचे संबंध आहेत, तसे ते चीनशी नाहीत, हे सांगण्याची गरज नाही. सप्टेंबरमधल्या जी20 शिखर संमेलनात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन उपस्थित असणार आहेत. थोडक्यात असे की, शिखर परिषदेचा अध्यक्ष या नात्याने सप्टेंबरमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) कस लागणार आहे.

    आज जी20 च्या विद्यमाने सदस्य देशांच्या प्रत्येक विषयागणिक एक अशा अनेक शिखर परिषदा भारतात सद्ध्या निरनिराळ्या राज्यातील शहरांमध्ये संपन्न होत आहेत. अशा परिषदांचे सूप वाजते तेव्हा  एक संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध आणि प्रसारित करण्याची ओपचारिकता पाळली जाते. पण आज तसे होत नाही याचे कारण असे आहे की, मुख्यत: युक्रेनप्रश्नाचा उल्लेख कसा करायचा याबाबत सर्व सदस्यात सहमती होत नसते. यजमान देश म्हणून सदस्य देशांमधील मतभेदांचा फटका कुणा दुसऱ्या देशाला/देशांना बसणार नाही आणि त्याचा/त्यांचा पापड मोडणार नाही, यादृष्टीने प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे. परिषदेत सहभागी प्रतिनिधींचा एकत्र फोटो काढण्याचा कार्यक्रमही (फोटो सेशन) कधीकधी होऊ शकत नाही. कारण अनेकदा हे प्रतिनिधी एकमेकांच्या शेजारी उभे रहायलाही तयार नसतात. 

   या देशांचे राष्ट्रप्रमुख सप्टेंबरमध्ये जी20 च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येणे अपेक्षित आहे. यावेळी बैठकीची अध्यक्षता पंतप्रधान मोदी यांना करायची आहे. हे म्हणजे निरनिराळ्या प्राण्यांना हाताळणाऱ्या सर्कसीतल्या रिंग मास्टरच्या कामासारखे झाले. रिंग मास्टरच्या हाती निदान चाबुक तरी असतो पण इथे तर कोणाचाही पापड मोडणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी यजमान देश म्हणून भारतावर येऊन पडली आहे. युक्रेनप्रकरणी मध्यंतरी वाटाघाटींचा दरवाजा किंचितसा किलकिला होईल, असे वाटत होते. आतातर ती शक्यताही दिसत नाही. यावरून  ही जबाबदारी किती अवघड आहे, याची कल्पना येऊ शकेल.

   2022 मधल्या परिषदात काय झाले?

   2022 च्या सप्टेंबरमध्ये उझ्बेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोॲापरेशन ॲार्गनायझेशनची शिखर परिषद संपन्न झाली होती. या परिषदेत मोदी आणि शी जिनपिंग हे दोघेही उपस्थित होते. रशियाने अण्वस्त्रे वापरण्याचा असंयमी उल्लेख करू नये, अमेरिकादी राष्ट्रांना डिवचू नये अशी भूमिका भारत आणि चीनने घेतली आणि तसे रशियाच्या गळी उतरवले. नंतर इंडोनेशियात 2022 मध्येच बाली येथे जी20 ची शिखर परिषद झाली. यावेळीही मोदींच्या खास प्रयत्नांना यश येऊन रशिया संयुक्त पत्रकावर स्वाक्षरी करण्यास राजी  झाला होता. 

   आता सप्टेंबर 2023 मध्ये व्लादिमीर पुतिन, शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन अशी अनेक बडी मंडळी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. दरम्यानच्या काळात चीनने युक्रेबाबतची आपली भूमिका अधिक कडक केली असून तो देश युक्रेनप्रकरणी रशियाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार हे आता स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे आता यावेळी परिषदेचे सूप वाजल्यानंतर संयुक्त पत्रक निघणार का, अशी पृच्छा केली जात आहे. कारण युक्रेनचा उल्लेख संयुक्त पत्रकात असावा यावर पाश्चात्य राष्ट्रे ठाम भूमिका घेणार तर तसा तो नसावा यावर रशिया आणि चीनही तेवढेच ठाम असणार, हे स्पष्ट आहे. अशा वेळी सर्व उपस्थितांचे फोटो सेशन किंवा संयुक्त पत्रक यांचे काय होणार हा एक अवघड प्रश्न भारतासमोर यजमान देश म्हणून उभा राहण्याची शक्यता भरपूर आहे.

   24 आणि 25 फेब्रुवारी 2023 ला बंगलुरू येथे जी20च्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली. यानंतर एक संयुक्त परिपत्रक प्रसारित झाले खरे. ते पुष्कळसे बाली येथील पत्रकासारखेच आहे, हेही खरे आहे. पण यात युक्रेनबाबतचा जो परिच्छेद उधृत केला आहे त्यात याबाबत सदस्यांमध्ये सहमती नव्हती असे नमूद केले आहे. असहमत असलेल्या देशांची नावे मात्र देण्याचे टाळले आहे. 

  चीनने युक्रेनबाबतची पूर्वीची काहीशी सौम्य भूमिका का बदलली याबाबत निरीक्षकांचे तर्कवितर्क समोर येत आहेत. त्यांचे मत असे आहे की, युक्रेनबाबत काय होईल किंवा व्हावे, याबाबत चीनला किंचितही स्वारस्य नाही. रशियाने जसा युक्रेन अंशत: किंवा पूर्णत: बळकवण्याचा प्रयत्न चालविला आहे, तशीच चाल आपल्याला (चीनला)) तैवानबाबत उद्या खेळायची झाली तर आज रशियाने युक्रेनबाबत जे धोरण अवलंबिले आहे, त्याला आतापासूनच पाठिंबा देणे चीनसाठी आवश्यक झाले आहे. म्हणून युक्रेनबाबत सबुरीने घ्या हा आग्रह चीनने बाजूला सारला असून रशियाच्या युक्रेनबाबतच्या धोरणाला आता पाठिंबा दिला आहे. 

   युक्रेन युद्धात रशियाच्या भूमिकेत बदल होताना का दिसतो आहे, हेही समजून घ्यायला हवे आहे.  सुपरसॅानिक मिसाईलचा वापर करून डागलेलेली संहारक अस्त्रेही रडारवर दिसतात. पण तोपर्यंत प्रचंड वेगामुळे ती लक्ष्याच्या जवळ पोचलेली असतात. त्यामुळे युक्रेनला ती हवेतल्या हवेत नष्ट करता येत नाहीत. त्यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान होते आहे. जीवित हानी, वित्तहानी बरोबरच इमारतीही कोसळतात. या अगोदर युक्रेनच्या फौजांनी  रशियन फौजांना मागे रेटले होते. खेरसन शहर परत मिळविले होते. काळ्या समुद्राला लागून असलेल्या किनाऱ्यावरही दबाव वाढवला होता. पुतिन वाटाघाटींसाठी तयार होणार अशा वार्ताही कानावर येऊ लागल्या होत्या. पण सुपरसॅानिक मिसाईलमुळे युद्धाचे पारडे रशियाच्या बाजूने झुकतांना दिसू लागले. बखमुत शहरातील संघर्षानंतर तर रशियाला विजय समोर दिसू लागला आणि पुतिनने ताठर भूमिका घेतली, असे मानले जाते. याचवेळी खनिज तेलाला आणि इंधन वायूला युरोपऐवजी पर्यायी गिऱ्हाईक मिळू शकते, असा अनुभव भारत आणि चीन या नवीन गिऱ्हाईकांच्या भरभक्कम खरेदीमुळे रशियाला आला आहे. त्यामुळे युरोपचे गिऱ्हाईक हातून कायमचे गेले तरी बिघडणार नाही, असा भरवसा रशियाला वाटू लागला आहे. याच काळात चीन पाश्चात्यांपासून व्यापाराचे बाबतीत दिवसेदिवस दूर जात असल्यामुळे चीनलाही खनिज तेल आणि इंधन वायूबाबत रशियाच इतरांच्या तुलनेत बरा वाटू लागला आहे.

   किलोमीटरमध्ये अंतर मोजले तर युक्रेन आणि तैवान एकमेकांपासून खूपच दूर आहेत. पण राजकीय आणि सामरिक दृष्टीने विचार करता या दोन देशात आता फारसा फरक उरलेला नाही. रशिया युक्रेनबाबत जे करतो आहे, तेच चीन तैवानबाबत करू इच्छितो आहे. जर युक्रेवरचे आक्रमण पचत असेल तर तैवानवरचे चीनचे आक्रमण का पचू नये, असा आता चीनचा कयास  आहे. पण राजकारणात जाहीरपणे असं बोलायचं नसतं. म्हणूनच की काय चीनने एका शांतीदूताचा आव आणीत युक्रेनप्रकरणी एक 12 कलमी शांतताप्रस्ताव  समोर ठेवला आहे. यातील एकूण एक कलम रशियाच्या युद्धखोर कृतीचा पुरस्कार करणारे आणि युक्रेनने शरणागती स्वीकारावी असे सुचविणारे आहे. अमेरिकन वकील क्रेग यांनी हा प्रस्ताव उद्या जर चीनने तैवानवर आक्रमण केले तर कसा सोयीचा ठरेल ते साधार सूचित केले आहे. चीनने नाव फक्त तैवानऐवजी युक्रेनचे वापरले आहे, एवढेच. ‘कहींपे निगाहें, कहींपे निशाना’ या गीतपंक्तीचे हे एक मूर्तिमंत उदाहरण ठरावे. 

  भारतासमोरचा प्रश्न 

   अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत यजमान देश म्हणून भारताने कोणती भूमिका स्वीकारावी असा प्रश्न काही राजकीय पंडित विचारत असून तेच त्या प्रश्नाचे उत्तरही पुरवीत आहेत. हाही एक मनोवेधक आणि मनोरंजक प्रकार या स्वरुपात समोर आला आहे. काय आहे हा प्रकार? त्यात त्रिसूत्री  पर्याय सुचविला आहे. 

  पहिले असे की, रशियाशी संरक्षण, उर्जा पुरवठा आणि राजकीय संबंधात बाधा येणार नाही, अशी भूमिका भारताने  घ्यावी. अशी भूमिका घेतल्याने उर्जा आणि खतांचा पुरवठा रशियाकडून सुरूच राहील. यापूर्वीच रशियाने चीन आणि भारत यातील बिघडलेल्या संबंधांचे बाबतीत  नाराजी  व्यक्त करून यासाठी अप्रत्यक्षपणे चीनला जबाबदार धरले आहे, हे विसरू नये.

   दुसरे असे की सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी20 च्या शिखर संमेलनात सर्व चर्चा हवामानबदलासारख्या निरुपद्रवी विषयाभोवतीच घोटाळत राहील हे परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पहावे. सप्टेंबरपर्यंत युक्रेनप्रकरणी काय काय घडेल ते आज सांगता यायचे नसले तरी परिस्थिती जैसे थे राहील असे गृहीत धरून हा पर्याय सुचविलेला दिसतो. 

  तिसरे असे की, युक्रेनप्रकरणी सर्व पर्याय खुले राहतील अशी भूमिका घ्यावी. काहीही झाले तरी भारत चीनच्या रशियाची कड घेणाऱ्या 12 कलमी प्रस्तावासोबत आहे, असे कुणालाही वाटावयास नको. ही सर्व तारेवरची कसरत आहे, हे खरे आहे. पण ‘मोदी है, तो मुमकिन है’, हा भारतीयांचा अनुभव आहे.




Saturday, March 25, 2023

 खलिस्तानी खलांचे खलत्व खालसा?


तरूण भारत, मुंबई .   रविवार, दिनांक २६/०३/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

    खलिस्तानी खलांचे खलत्व खालसा?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   पंजाबी भाषेत खालसा या शब्दाचा अर्थ पवित्र असा होतो. म्हणून  खालिस्तान म्हणजे पवित्र भूमी! पंजाबात शीखांचा (शिष्यांचा) स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठीची चळवळ तशी खूप जुनी नाही. पण शीखांच्या या मागणीला 1970 आणि 1980 या दशकात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले.  भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बिअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. 1986 नंतर  पंजाब पोलिसांनी या खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारावाई केली. त्यामुळे या  चळवळीला आणि त्याच्या संबधित दहशतवादाला आळा बसला. सध्या ही चळवळ ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, अॅास्ट्रेलिया  इत्यादी देशात रहाणाऱ्या शीख समुदायातील काहींपुरती प्रामुख्याने मर्यादित असली तरी सद्ध्या तिच्या अतिऊग्र पाठिराख्यांनी भारतात आणि भारताबाहेर उच्छाद मांडला आहे.  

  तसे पाहिले तर गुरुदेव नानकांनी 1500 शे च्या सुमारास स्थापन केलेला शीख घर्म आधुनिक आणि उदारमतवादी आहे. यातले काहीच अतिरेकी होत आहेत. जनगणनेनुसार भारतात सुमारे 2 कोटी शीख राहतात. 

ठोकळमानाने ब्रिटनमध्ये शीख संख्येने 5 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 0.88% आहेत. तर हिंदू संख्येने 10 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 1.77% आहेत.

अमेरिकेमध्ये शीख संख्येने 5 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 0.2% आहेत. तर हिंदू संख्येने 33 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 1 % आहेत.

कॅनडामध्ये मात्र शीख संख्येने 8 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 2.1% आहेत. तर हिंदू संख्येने 8.25 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत शिखांपेक्षा थोडेसेच अधिक म्हणजे 2.3 % आहेत.

अॅास्ट्रेलियामध्ये शीख संख्येने 2 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 0.88 % आहेत. तर हिंदू संख्येने 7 लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत 2.3 % आहेत.

या देशांमधील बहुसंख्य शीख भारतविरोधी नाहीत, ही एक जमेची बाजू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे, दहशतवादी मनोवृत्तीचे आणि फुटिरतावादी काही मोजके शीख सोडले तर बहुसंख्या शीख भारतनिष्ठ आहेत. पण उद्रेकाला थोडेसे लोकही पुरतात. दुसरा मुख्य मुद्दा हाही आहे की खलिस्तानी आंदोलकांच्या थोपवण्यासाठी या 4 देशांमध्ये साधा पोलिस बंदोबस्तही भारतीय दूतावासासमोर वेळेवर केला जात नाही. वास्तवीक आपल्या देशातील इतर देशांच्या दूतावासाचे संरक्षण ही त्या त्या देशांची जबाबदारी असते.

   भारत आणि  पाकिस्तानातील शीखबहुल भाग आणि अन्य काही प्रदेश यांचे मिळून शिखांचे खलिस्तान नावाचे स्वतंत्र राष्ट्र असावे, अशी काही शिखांची मागणी असून तिला पाकिस्तानच्या आयएसआय (इंटर स्टेट इंटेलिजन्स) या गुप्तहेर संघटनेची केवळ फूसच नाही तर साह्यही आहे.  खलिस्तानाबाबत सहानुभूती असणारे लोक मुख्यत: कॅनडा, अमेरिका, अॅास्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तसेच इतर देशातही आढळून आले आहेत. भारतातही काही शिखांचा खलिस्तानला पाठिंबा आहे. ब्रिटनमध्ये भारतीय दूतावासावरचा भारतीय राष्ट्रध्वज काढून त्याच्या जागी खलिस्तान्यांनी खलिस्तानी झेंडा लावला. यावेळी ब्रिटिश पोलिस दल पूर्णपणे उदासीन राहिले. या दूतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती. आजूबाजूला इतके सीसीटीव्ही कॅमेरे होते की, ही बाब पोलिस दलाला दिसली नाही, यावर विश्वास ठेवता येत नाही. ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेल्या खलिस्तानवाद्यांची मतपेढी दुखावली जाऊ नये किंवा अशाच काही कारणास्तव या बेकायदेशीर कृत्याकडे ब्रिटिश सरकारने दुर्लक्ष केले, असे मानण्यास जागा आहे. याबाबत भारत सरकारने भारतातील ब्रिटिश वकिलाला बोलवून खडसावले आहे. पण याचा ब्रिटिश सरकारवर फारसा परिणाम होत नाही, हे पाहून भारतातील ब्रिटिश दूतावासासमोरचे संरक्षक कठडे भारताने काढून टाकले. ही मात्रा मात्र लागू पडली. ऑस्ट्रेलियातही दूतावासाच्या भिंतीवर खलिस्तानी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांचे खलिस्तान्यांबाबतीत असेच बोटचेपे धोरण आहे, असा यापूर्वीचा आपला अनुभव आहे. जी20च्या संमेलनाचे निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे भारतात आले असतांना तसेच संसदेचे अधिवेशन भारतात सुरू असतांना खलिस्तानी अशी अपमानकारक कारवाई करतात आणि  संबंधित देश खंबीरपणे संरक्षक भूमिका घेत नाहीत, याची गंभीर दखल भारताने घेतली आहे, याचा योग्य धडा हे देश घेतील, अशी अपेक्षा बाळगूया. 

   भारतात खलिस्तानची चळवळ केव्हा आणि कशी सुरू झाली? 

1930 मध्ये काही शिखांनी स्वतंत्र शीख राज्याची मागणी केली होती.    खलिस्तानची फुटिरतावादी चळवळ 1980 च्या सुमारास स्वतंत्र भारतात विशेष प्रमाणात दिसू लागली होती. त्यावेळी खलिस्तानमध्ये भारत आणि पाकिस्तानातील  पंजाब हा भूभाग, याशिवाय चंदिगडसकट उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भूभाग समाविष्ट असावा, अशी त्यांची भूमिका होती. या कल्पनेला पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचा केवळ पाठिंबाच नव्हता तर त्यांनी तिला खतपाणीही घातले होते. म्हणूनच पाकिस्तानचा खलिस्तानला पाठिंबा आहे, असा सार्थ दावा खलिस्तान चळवळीचे संस्थापक सदस्य जगजितसिंग चौहान यांनी त्या काळात केला होता. पण पोलिसांची कठोर कारवाई, अंतर्गत कलह आणि मुख्यत: खुद्द शिखांचाच भ्रमनिरास यामुळे 1990 च्या सुमारास ही चळवळ भारतात जवळजवळ संपुष्टात आली. 

  पाकिस्तान आणि खलिस्तान

  फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये 20 लक्ष शीख राहत होते तर आज मात्र केवळ 50 हजारच उरले आहेत. इतर एकतर मारले तरी गेले किंवा परागंदा होऊन भारतात किंवा इतरत्र स्थलांतरित तरी झाले असतील किंवा त्यांचे धर्मांतर तरी करण्यात आले असणार. असे असूनही आजचे खलिस्तानवादी आयएसआयशी जवळीक साधून भारतविरोधी कारवायात सहभागी होतात, याला काय म्हणावे? खरेतर त्यांचा संघर्ष पाकिस्तानशी असायला हवा होता. त्यांच्या खलिस्तानच्या स्वप्नात पाकिस्तानमध्ये गेलेला पंजाबच प्रमुखपणे असायला नको होता का? पण त्याचा विसर खलिस्तान्यांना पडला आहे, याला काय म्हणावे? पण त्याचबरोबर भारतातील आणि बाहेरच्याही बहुसंख्य शिखांना हे मान्य नाही, हे एक सुचिन्हच म्हटले पाहिजे.

  भुट्टो आणि झिया-उल-हक यांची दिवास्वप्ने 

   भारतावर सतत हल्ले करून त्याला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहेत. 1971 पूर्वी पाकिस्तानमध्ये जनरल याह्याखान यांचे लष्करी शासनातले  सहकारी या नात्याने  झुलपिकारअली भुट्टो यांनी प्रथम पूर्वेकडे भारतीय सैन्याचा पराभव करायचा आणि भारताचा संपूर्ण पूर्वभाग व्यापून होताच त्याला पाकिस्तानच्या दुसऱ्या भागाशी जोडण्यासाठी एक रुंद रस्ता (कॅारिडॅार) उरलेल्या भारतातून  कोरून काढण्याची  योजना मांडली होती. तसेच काश्मीर ‘मुक्त’ करायचे आणि शीखबहुल पंजाबाचे रुपांतर खलिस्तानमध्ये करायची योजना मांडली होती. पुढे जनरल झिया-उल हक यांनी मुस्लिम आणि शीख यातील परंपरागत वैरावर मैत्रीचा तोडगा काढायचा असे ठरविले. शिखांच्या श्रद्धास्थानांना पूर्वीची स्थिती प्राप्त करून द्यायची आणि श्रद्धाळूंना यात्रा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले.

  स्वप्न विरले कसे?

 इंग्लंड आणि अमेरिकेतून शीख श्रद्धाळूंनी या श्रद्धास्थानांना भेट देण्यास सुरवात केली. ही मंडळी खलिस्तानची मागणी करण्याचे बाबतीत आघाडीवर होती. त्यांच्या मुक्कामात पाकिस्तानातील शिखांसमोर खलिस्तानचा प्रचार केला जाऊ लागला. जनरल अब्दुल रहमान यांनी आयएसआय मध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला. भारतातील शिखांच्या ‘स्वातंत्र्यलढ्याला’(?) साह्य करणे हा यामागचा मुख्य हेतू होता. अब्दुल रहमान प्रौढीने सांगत असत की, शिखांना पूर्ण प्रांत पेटवता आला आहे. कुणाला ठार करायचे, कुठे बॅाम्ब पेरायचे, कोणती कार्यालये उडवायची हे त्यांना चांगले कळले आहे. धगधगणारा अस्थिर पंजाब ही जणू पाकिस्तानी सैन्याची बिनखर्चाची डिव्हिजनच आहे, अशी दर्पोक्ती जनरल हमीद गुल यांची होती. खुद्द झिया-उल हक मात्र असे काहीही नाही, असे वरवर आणि वारंवार जगभर सांगायचे. भारताने पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमा भरभक्कम कुंपण घालून बंद केल्यानंतर आणि भारतीय शिखांनी फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे  भारतातील खलिस्तानी चळवळ हळूहळू विरली. 

  अमेरिका

   जून 1984 मध्ये न्यूयॅार्क टाईम्समध्ये एक बातमी प्रकाशित झाली. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, अशा आशयाची ती बातमी होती. याच सुमारास भारतीय वृत्तपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते, ते असे की,  सीआयए ही संस्था जर्नेलसिंग भिंद्रावाले यांच्या अनुयायांना शस्त्रास्त्रांची मदत आणि साह्य पाकिस्तानकरवी करणार होती. अशीच माहिती भारताच्या रिसर्च ॲंड ॲनलिसिस विंगलाही (रॅा) मिळाली होती.

कॅनडा

   सुवर्ण मंदिरातील ॲापरेशन ब्ल्यू स्टार नंतर लगेच कॅनडामध्ये अतिरेकी शिखांनी उचल खाल्ली होती. कॅनडाच्या संसदेचे मवाळ सदस्य उज्जल दोसांग यांनी अतिरेक्यांविरुद्ध विचार व्यक्त करताच त्यांना धमक्या देण्यात आल्या.

  कॅनेडियन शीख असलेले तारासिंग हे इंडो - कॅनेडियन टाईम्सचे प्रकाशक होते. एकेकाळी ते खलिस्तानसमर्थक होते. पण त्यांनी एअर इंडियाची फेरी क्रमांक 182 च्या बाबतीतल्या घातपातावर कडक टीका केली होती. हा कट रचला जात असतांनाचा संवाद आपल्या कानावर पडला असून तशी साक्ष आपण देणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. तरसेम सिंग पुरेवाल हे ब्रिटनमधील पंजाबी साप्ताहिक ‘देस परदेसचे’ संपादक होते. यांचीही हत्या करण्यात आली. शीख जहालवादाबाबतची त्यांची शोधपत्रकारिता या हत्येला कारणीभूत असल्याचे मानले गेले. 

   वर्ल्ड सिख ॲार्गनायझेशन ॲाफ कॅनडाने (डब्ल्यूएसओ) शिखांच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश टाकणाऱ्या वृत्तसंस्थेवर मानहानी, खोटेपणा आणि बदनामीचा (डिफेमेशन, स्लॅंडर ॲंड लायबेल) आरोप ठेवत खटला भरला. पण 2015 मध्ये मात्र याबाबत पुढे काहीही न करण्याचा निर्णय घेतला.  ही बाब पुरेशी बोलकी ठरली आहे. कॅनडामधील ज्यांनी ज्यांनी खलिस्तानविरोधी लिखाण केले त्या सर्वाना जिवे मारण्याच्या धमक्या अगोदरपासूनच मिळत आहेत. 2008 मध्ये डॅा मनमोहनसिंग यांनी शीख दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली  होती. 2017 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्रूडो यांच्यावर ते खलिस्तानला सहानुभूती दाखवीत असल्याचा आरोप करीत  त्यांची भेट घेण्यास नकार दिला होता. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी, खलिस्तान हा मुद्दा न कॅनडात आहे न पंजाबात, असे ठणकावून सांगितले होते. तेव्हा जस्टिन ट्रूडो यांनी भूमिका जाहीर केली की, कॅनडा खलिस्तान चळवळीच्या पुनरुज्जीवनाला समर्थन देणार नाही. पण 2020 मध्ये किसान आंदोलनाच्या निमित्ताने कॅनडा, ॲास्ट्रेलियादी देशात उमटलेल्या प्रतिक्रिया याच जातकुळीच्या आहेत.

ब्रिटन 

  2008 मध्ये फेब्रुवारी महिन्यात पंजाब पोलिस प्रमुखांनी आरोप केला होता की, अतिरेक्यांना ब्रिटनमधील शीखांकडून आर्थिक मदत मिळत असते. बबर खालसा आपल्या अनुयायांना पाकिस्तानमधील अल-कायद्याच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवीत असते. या वृत्ताची पुष्टी बीबीसीने केलेली असल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे.

   इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन (आयएसवायएफ) या संघटनेचे सदस्य खून, बॅाम्बहल्ले, आणि अपहरण यासारख्या कृत्यात सहभागी असून हा राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे. पण अमेरिकेत ही संघटना अतिरेकी मानली जात नाही. बब्बर खालसा, बब्बर खालसा इंटर नॅशनल, इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन यांना कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताबाहेरील शिखांचे काही गट आजही पैशाचे प्रलोभन दाखवून शिखांना खलिस्तानी गटात सामील करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. किसान आंदोलनाचे निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा उघडकीस आली होती, याचा विसर पडायला नको. आज जी20 च्या निमित्ताने खलिस्तानवादी, राजकीय संधीसाधू, अपरिपक्व आणि ऱ्हस्वदृष्टीचे नेते निरनिराळी निमित्ते शोधून परदेशी पाहुण्यासमोर भारताची छबी मलीन करण्याचे हेतूने कधी नव्हेत इतके क्रीयाशील झालेले दिसत आहेत.

  अमृतपालसिंगाचा उदय

अमृतपालसिंग संधू हा भारतीय खलिस्तानवादी आणि  स्वयंघोषित शीख धार्मिक नेता पंजाबातील ‘वारिस पंजाब दे’ नावाच्या संघटनेचा नेता आहे.

   तो पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी घनिष्ट संबंध राखून आहे. काही महिने अगोदर याचे नावही कुणाला माहीत नव्हते. आज मात्र तो पंजाबातला ‘मोस्ट वॅांटेड’ गुन्हेगार मानला जातो. भारतीय पोलिस दल त्याचा कसून शोध घेत असून त्याविरुद्धचे पडसाद परदेशातही उमटतांना दिसताहेत. तो सापडत नाही, ही बाब अनेक चिंतायुक्त शक्यतांकडे अंगुलीनिर्देश करते, याची नोंद घ्यायला हवी. 

   पंजाबमधल्या अमृतसर जिल्ह्यातील जाल्लूपूर खेरा येथील कुटुंबातला 30 वर्ष वयाचा हा तरूण कुटुंबीयांसह दुबई येथे 2012 पासून वाहतुक व्यवसाय करीत होता. शेतीविषयक कायद्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर अमृतपाल भारतात येऊन त्यावेळच्या आंदोलनात सहभागी झाला.

  दीप संधू हा पंजाबी अभिनेता पुढे चळवळ्या कार्यकर्ता झाला. त्याला लाल किल्याच्या आवारात 26 जानेवारी 2021ला आंदोलन करतांना अटक झाली होती. त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याने ‘वारिस पंजाब दे’ या नावाची संघटना स्थापन केली. पंजाबच्या अधिकारांसाठी लढा देणे हा संघटनेचा कथित हेतू आहे. दीप संधूचा गेल्यावर्षी अपघाती मृत्यू झाल्यानंतर अमृतपाल सिंगने स्वत:ला ‘वारिस पंजाब दे‘ या संघटनेचा नेता घोषित केले.

  दीप संधूचा भाऊ मनदीप संधू याचा  असा दावा आहे की, अमृतपालची ‘वारिस  पंजाब दे’ ही संघटना याच नावाच्या मूळ संघटनेपासून व्यवहार आणि तात्त्विक भूमिका या बाबतीत अगदी भिन्न आहे. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा कथित धार्मिक नेता आपल्या भावाच्या म्हणजे दीपच्या नावाच्या आडून युवकांना शस्त्र हाती घ्या अशी चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहे. दीप संधूचा मात्र वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर विश्वास होता. त्याला शस्त्राचार साफ नामंजूर होता.

आठ कॅालमी शीर्षकाच्या दिशेने अमृतपाल सिंगची वाटचाल  

  फेब्रुवारी 2023 मध्ये अमृतपाल सिंगने अमृतसरमधल्या बाह्य परिसरातल्या एका पोलिस स्टेशनवर प्रचंड संख्येतील पाठिराख्यांसह हल्ला करून सुरवातील वृत्तसृष्टीत नाव कमावले. तरवारी नाचवीत आणि धर्मग्रंथाची ढाल करीत यांनी पोलिस स्टेशनमध्ये एकच धुडगुस घातला.  पोलिसांकडून आश्वासन घेतले की. अपहरणाच्या गुन्ह्याखाली पकडलेल्या आपल्या साथीदाराची- लव्हप्रीत सिंगची- सुटका करण्यात येईल. तेव्हापासून अमृतपाल सिंग वृत्तपत्रांच्या पहिल्या पृष्ठावरील अनेक कॅालमी शीर्षकांचा धनी झाला.तो पुढे ‘खलिस्तानचे अंतिम उद्दिष्ट’ साध्य करण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शासनाविरुद्ध सशस्त्र उठावासाठी शिखांना चिथवू लागला.

  पंजाब काँग्रेसचे नेते प्रतापसिंग कैराँ आणि इंदिरा गांधी यांचे केंद्रीय नेतृत्व यांतील बेबनावातून भिंद्रावाले यांचा भस्मासुर उभा राहिला. तो  सुवर्ण मंदिरातल्या सैनिकी कारवाईत मारला गेला. शीख समाजाच्या अतिपवित्र पूजास्थानी हे अपकृत्य घडले. अमृतपालसिंग ची बोली आणि देहबोली भिंद्रावालेची आठवण करून देते. भिंद्रावाले प्रमाणे गळ्यात काडतुसांची माळ आणि भोवती सशस्त्र रक्षक असा त्याचा थाट असतो. फरक इतकाच की, भिंद्रावाले अंतर्बाह्य धार्मिक नेता होता. तो एका पुराणमतवादी शीख संघटनेचा - दमदमी टक्सालचा- पूर्णांशाने धार्मिक नेता होता. ‘वारिस पंजाब दे’ चा स्वत:ला अवतारी नेता म्हणून पुढे येण्यापूर्वी अमृतपाल सिंग याला अशी कोणतीही धार्मिक पृष्ठभूमी नव्हती/नाही.

  अमृतपाल सिंगावरील आरोप  

आर्म्स अॅक्टखाली अमृतपाल सिंगवर एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या साथीदारांकडून शस्त्रास्त्रांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आयएसआय या पाकिस्थानी गुप्तहेर संघटनेशी असलेल्या त्याच्या संबंधाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. परकीय दहशतवादी संघटनांच्या संपर्कात तो असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनस्थित खलिस्तानी दहशतवादी नेता अवतार सिंग खांडा याचे प्रोत्साहन अमृतपाल सिंग याच्या उदयास कारणीभूत ठरले असल्याचे मानतात. एक खाजगी सैन्य उभारण्यासाठी व्यसनाधीन तरुणांसाठीच्या उपचार केंद्रातून उपचार घेणाऱ्या तरुणांना या खाजगी सैन्यात ऊग्र आंदोलनांमध्ये सामील होण्यासाठी तयार केले जाते, असा आरोप खलिस्तानी नेत्यांवर आहे. यांच्या हाती असलेली शस्त्रे पाकडून ड्रोनच्या साह्याने पुरविली जात असल्याचे पुरावे मिळाले असल्याचेही वृत्त समोर आले आहे.

   मुखी कोणतीही भाषा असली तरी दहशतवादी तो दहशतवादीच! एकेकाळी भारताचा खड्गहस्त म्हणून कीर्ती संपादन करणारा अख्खा पंजाब आज झोकांड्या खातो आहे. दहशतवाद्यांना किंचितही सहानुभूती दाखविणे म्हणजे विनाशाला आमंत्रण होय. फुटिरतावादी खलिस्तानी दहशतवाद्यांचे पाकिस्तानी आयएसआय या गुप्तहेर संघटनेशी, इस्लामिक स्टेट म्हणून ओळख असलेल्या संघटनेचे लागेबांघे आहेत हे लक्षात येताच त्यांचा पूर्ण बंदोबस्त हेच उद्दिष्ट असले पाहिजे. समाजाची वीण विस्कटण्याच्या हेतूने काम करणाऱ्यांबाबत, भारतीय भूमीत शांततेला बाधा पोचविणाऱ्यांबाबत सहानुभूती बाळगणारे गट फार मोठी चूक करीत आहेत. आपल्या गुप्तहेर खात्याला काहीशा उशिराने, अमृतपाल सिंग याच्या कारस्थानाचा सुगावा लागला. याच्या मुळाशी वृथा सहानुभूती बाळगणाऱ्या काही बोटावर मोजता येतील एवढ्या,  स्थानिक घटकांचा पाठिंबा होता हे स्पष्ट आहे. बहुसंख्य शीख समाज आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगतो आहे, ही आपली भारतीयांची फार मोठी जमेची बाजू आहे. दहशतवादी असलेल्या काही तुरुंगवासियांना जामीन मिळतोच कसा, हा अभ्यासाचा विषय आहे. या विषयीच्या कायद्यातील कच्चे दुवे दूर केले पाहिजेत. पंजाब उच्च न्यायालयाने 80,000 पोलिस अमृतपाल सिंगला का पकडू शकत नाहीत, असा प्रश्न विचारला आहे. तो सर्वांना म्हणजे पोलिसांबरोबर, नागरिक, राजकारणी, आणखीही कुणाकुणाला अंतर्मुख व्हायला लावणार आहे, कुणास ठावूक? पण बहुसंख्य भारतीय समाज, मग तो आज भारतात रहात असो वा भारताबाहेर, देशप्रेम, देशनिष्ठा, देशभक्ती अशा शाश्वत मूल्याधिष्ठित जीवन व्यतित करू इच्छितो. तो असल्या घरभेद्यांना, कच्च्या लिंबांना, कोळिष्टकांना आणि जळमटांना स्थान देणार नाही, काळाच्या ओघात बसलेली काजळी पुसून काढील. हेच भारताचे शक्तिस्थान आहे.

Friday, March 24, 2023

 लहानपणं देगा देवा!

माझा टिप्या 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


 1940 चा सुमार असावा. सकाळी मी नेहमीप्रमाणे अंगणात टिवल्याबावल्या करीत होतो. कुठूनसं आलेलं एक कुत्र्याचं पिलू माझ्या पायात घोटाळू लागले. मी त्याला उचलून लगेच त्याच्या पायांची नखे मोजली. आता नक्की आठवत नाही, पण आमचा असा समज होता की, विशिष्ट संख्येइतकी नखे असतील, तर ते कुत्रं ऊच्च प्रतीचे मानलं जायचं. हे पिल्लू तसेच होते. मी लगेच ते कुत्रे पाळायचे असा निर्णय घेतला. मनू बंडूना हे कळायला वेळ लागला नाही. त्यांनी वसंता कुत्रं पाळणार असल्याचं जाहीर करून टाकलं. आई म्हणाली, ‘याला कुत्रीच सापडायची. ते काही नाही. ताबडतोब त्याला दूर सोडून ये. त्याला सवय झाली की ते आपलं घर सोडणार नाही’, मी म्हटले, अगं ते चांगल्या जातीचं आहे. मी मोजली आहेत, त्याची नखं. मी नाव सुद्धा ठेवलय त्याच. ‘टिप्या’. आई म्हणाली, ‘त्याचं करणार कोण?’. मी म्हटले, ‘मी करीन’. ‘तोंड पहा करणाऱ्याचं! शेवटी सगळं माझ्याच गळ्यात येऊन पडतं’,  आईनं अनुभव सांगितला. मी तिच्या गळ्याकडे पाहिलं. गळ्यात मणी मंगळसूत्रंच तेवढं मला दिसलं. आपल्या पुत्ररत्नाचा मर्यादित शब्दकोश आणि भाषेचं ज्ञान तिला  माहीत होतं. बहुदा म्हणून ती म्हणाली, ‘त्याचं सगळं मलाच करावं लागणार आहे’. वडील म्हणाले कुत्रं घरात नकोच. चावलं बिवलं तर पोटात चौदा इंजक्शन घ्यावी लागतात. शेवटी मी माझं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. ‘आमचं कुणालाच काही आवडत नाही’, म्हणून मी कोपऱ्यात जाऊन बसलो. आई म्हणाली, ‘तो ऐकणार आहे थोडाचं? होऊ दे त्याच्या मनासारखं. चावलं की कळेल त्याचं त्यालाचं’. मी म्हटलं, ‘हे कुत्रं चांगल्या जातीचं आहे. अशी कुत्री चांगल्या लोकांना चावत नसतात’. ‘पण म्हणजे ते तुला नक्कीच चावणार!’, मनूबंडूंनी मला चिडवायची संधी साधली. कुत्रं पाळायला मिळणार याचाच मला आनंद होत असल्यामुळे मी त्यांच्या चिडवण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.

   आपली बाजू घेणारा कोण आहे, ते टिप्याला कळले असावे. त्यामुळे माझी आणि टिप्याची चांगलीच गट्टी झाली. माझे वेटाळातल्या मुलांशी मुळीच पटत नसे. कुणीही माझ्याशी दोस्ती करायला तयार नसायचे. मी एक उपाय योजला. जो माझ्याशी दोस्ती करणार नाही, त्यांच्या अंगावर मी टिप्याला सोडीन, असा मी सगळ्यांना धाक घातला. एव्हाना टिप्या चांगलाच धष्टपुष्ट झाला होता. त्याच्या भुंकण्यानेच सर्व घाबयायचे. टिप्याच्या धाकामुळे सगळ्यांनी माझ्याशी दोस्ती केली. सगळे माझ्याशी गोड बोलत. हे आईच्या लक्षात आले. ती म्हणाली, ‘काय पाहतेय मी! तुझ्याभोवती आजकाल बराच गोतावळा जमा झालेला दिसतोय!’. मी तिला आपली युक्ती सांगितली. यावर ती म्हणाली,’अरे, असा धाक दाखवून का कुठे मैत्री होते? ते तोंडावर तुझी वरवर करतील. मनातून राग करत असतील ते सगळे.’

  एकदा टिप्या एका मुलाला चावला. मी घाबरलो. वडलांनी मला बजावले होते की, ‘ते कुत्रं कुणालाही चावलं तर मी तुला बदडून काढीन’. आईने मला अशा अनेक अडचणींतून बाहेर काढले होते. मी आईला ही गोष्ट सांगितली. ती म्हणाली, ‘जा, त्या मुलाला मी बोलवलय म्हणून सांग’. मी त्या मुलाला बोलवून आणलं. टिप्या ओझरता चावला होता. रक्त आलं नव्हतं. आईनं त्याचा पाय साबण लावून धुवून काढला. त्याला साय आणि दोन चमचे साखर घातलेलं कपभर दूध प्यायला दिलं. धीर दिला. ‘कुत्रं पाळलेलं आहे. पिसाळलेलं नक्कीच नाही. घाबरू नकोस’, अशी त्याची समजूत घातली. ‘मी भेटायला येणार आहे, असं तुझ्या आईला सांग’. त्यानं घरी काहीच सांगितलं नव्हतं. तसा तो फारसा घाबरलाही नव्हताच. शर्करायुक्त आणि साय घातलेल्या दुग्धप्राशनानं त्याला प्रसन्नही वाटू लागले होते, ते वेगळेच.

   ‘धाक दाखवून का कुठे मैत्री होते?’, आईचे हे वाक्य आजही माझ्या चांगलेच लक्षात आहे

  

Monday, March 20, 2023

 युक्रेनप्रकरणी अपेक्षाभंग कुणाचा, कुणाकुणाचा?  (उत्तरार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक: २१/०३/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

    युक्रेनप्रकरणी अपेक्षाभंग कुणाचा, कुणाकुणाचा?  

(उत्तरार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  Email-kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   एक वर्ष लोटले तरी रशिया आणि युक्रेन याच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. ही लढाई अत्यल्पकालीन आणि एकतर्फी सिद्ध होईल, असे निरपवादपणे सर्व पत्रपंडित आणि. युद्धपंडित म्हणत होते. पण तसे झाले नाही. अमेरिका आणि तिचे पाश्चात्य मित्र युक्रेनच्या बाजूने उभे राहिले. युक्रेनने आपण नाटोत सामील होण्याचा निर्धार जाहीर केला होता. तसे कराल तर जबरदस्त अद्दल घडवू अशी तंबी रशियाने दिली होती. नाटोचेच काही सदस्य, जसे की तुर्की, युक्रेनला नाटोची सदस्यता देऊ नये या मताचे होते. त्यामुळे युक्रेनच्या सदस्यतेचा प्रश्न काहीसा रेंगाळला. पण आज ना उद्या हा प्रश्न मार्गी लागेल आणि युक्रेनला नाटोची सदस्यता मिळेल, हे रशिया जाणून होता. असे झाले तर युक्रेन आणि रशिया यांच्यामधली सीमा ही एक नाटोसदस्यराष्ट्र आणि रशिया यातली सीमा होऊन बसेल, ही बाब रशियाला मान्य होण्यासारखी नव्हती. म्हणून 24 फेब्रुवारी 2022 ला रशिया  युक्रेनवर चालून गेला. पण ही लढाई आज वर्ष उलटून गेले तरी तर रेंगाळलेलीच आहे आणि आणखी किती दिवस रेंगाळेल याचा अंदाज पत्रपंडित घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आक्रमणाला युक्रेनकडून कसे आणि किती तीव्रतेचे प्रत्युत्तर मिळेल, याबाबतचा रशियाचा अंदाज चुकला, यात शंका नाही. याअगोदर क्रीमिया हा युक्रेनचा हिस्सा रशियाने अलगद आणि सहज गिळंकृत केला होता. तसेच याही वेळी घडेल आणि युक्रेनचा एक हिस्सा आपण अलगद वेगळा करू. त्याला एका चिुमकल्या राष्ट्राचा दर्जा देऊ आणि रशिया आणि युक्रेन यात एक बफर स्टेट  निर्माण करू, असा रशियाचा विचार असावा किंवा  रशियाला लागून असलेल्या या भागात रशियाधार्जिणे लोक आहेतच, त्यांना अनुकूल करून घेऊन तो भाग रशियातच सामील करून घेऊ असातरी रशियाचा विचार असावा. पण रशियाचा अपेक्षाभंग झाला आणि ही लढाई रशियाला चांगलीच महागात पडली. हे झाले रशियाचे. आणखी कुणाकुणाच्या बाबतीत काय  आणि कायकाय घडले हे पाहणेही बोधप्रद ठरणार आहे.

   नाटोचा सहभाग किती व कसा?

    अमेरिकेने युक्रेनला लष्करी महत्त्वाची रसद  तर पुरवलीच शिवाय अमेरिकेने रशियावर निर्बंधही लादले. रशियाची अमेरिकेतील कोट्यवधी किमतीची मालमत्ता, सोने, परकीय चलन आणि संपत्ती जप्त केली. रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यावर बंदीहुकुम बजावला. यात  बहुतेक नाटो राष्ट्रेही काही प्रमाणात आणि कुरकुरत  सामील झाली. चलन अदलाबदलीच्या स्विफ्ट या नावाच्या यंत्रणेचा लाभ रशियाला मिळणार नाही, अशी व्यवस्था केली गेली. बहुराष्ट्रीय कंपन्या रशियातून बाहेर पडल्या. यांच्यापैकी मॅकडोनल्ड आणि आदिदास ही नावे आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचीही असतील. मुळातच रशियाचे अर्थकारण अमेरिकेच्या तुलनेत खूपच लहान आहे. तेही कोलमडेल आणि रशिया दातीतृण धरून शरण येईल, ही अमेरिकेची अपेक्षा मात्र फोल ठरली.  

   निरनिराळ्या देशांची अर्थकारणे 

   प्रत्यक्षात रशियन अर्थकारण, हळूहळू का होईना, प्रगतीपथावरच   येत चालले आहे, असे खुद्द आंतरराष्ट्रीय नाणे निधीचच  अहवालात  सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. मग प्रगतीची  टक्केवारी कितीही कमी का असेना. टक्केवारीचाच विचार करतो म्हटले तर अमेरिकेचीही प्रगतीची टक्केवारी रोडावलेलीच आहे की.  जपानची तर 0.9 % इतकीच राहिली आहे. रशिया, अमेरिका आणि जपान यांच्या तुलनेत, चीन आणि भारताच्या अर्थकारणाच्या प्रगतीची गती बरी म्हणावी अशी स्थिती आहे. म्हणून भारतात अर्थकारणाच्या प्रगतीची गती मंदावल्याची जी टीका विरोधकांकडून केली जाते त्याला वास्तवाचा आधार नाही, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. अर्थात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादलेले नाहीत, याचीही नोंद घ्यायलाच हवी. तसेच हे दोन्ही देश रशियाकडून खनिज तेलाची आयात करीत आहेत, हेही खरे आहे. या दोन्ही देशातील कंपन्यांचेही रशियाशी आर्थिक देवघेवीचे व्यवहार सुरूच आहेत. शिवाय रशियाचा आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांशीही आर्थिक व्यवहार सुरू आहे, ते वेगळेच. थोडक्यात काय तर की, अमेरिका आणि तिचे युरोपीयन साथीदार यांनी रशियावर लादलेली आर्थिक नाकेबंदी मुळीच यशस्वी झाली नाही असे नाही, पण दातीतृण धरून शरण यावे, इतकी  परिणामकारकही ठरली नाही, ही वस्तुस्थिती आहे. रशियाच्या रुबलच्या जागतिक बाजारपेठेतील स्थानालाही फारसा धक्का लागलेला नाही. रुबल डॅालरच्या तुलनेत कमी स्वीकार्य आहे, या म्हणण्याला अर्थ नाही. कारण हा फरक युक्रेनयुद्ध सुरू होण्यापूर्वीही होताच की. हा फरक आज काहीसा वाढला आहे, याचा अर्थ रुबल पार गडगडला असा होत नाही. युक्रेन युद्धानंतर रशियात महागाईचा निर्देशांक वाढत वाढत 12% पर्यंत पोचला, हे खरे आहे. पण 2023 उजाडले आणि रशियात महागाई काहीशी कमीच झाली आहे. अर्थात हा कल (ट्रेंड) कायम राहतो किंवा कसे ते पहावे लागेल, हे खरे आहे.

   युक्रेनयुद्धामुळे गेले वर्षभर युरोपातील बाजाराबाबत पडणे, गडगडणे कोसळणे हेच शब्दप्रयोग कानावर येत होते आणि ह्या स्थितीत आजही फारसा परक पडलेला नाही. युरोपातील काही देशात तर महागाईचे दर गगनाला भिडले आहेत. युरोपला आवश्यक असलेली 40% उर्जा रशिया पुरवत होता. यात इंधन वायूचे प्रमाण खूप जास्त होते. ते कमी करून अमेरिकेने रशियाची कोंडी केली खरी पण पुढे रशियानेच इंधन वायूचा पुरवठा थांबवला. त्यामुळे युरोपीयन राष्ट्रांना ही उणीव अमेरिकेला जास्त पैसे मोजून भरून काढावी लागली. म्हणजे याही बाबतीत रशियाने कोंडीतून स्वत:ची सुटका करून अमेरिकेवरच बाजी उलटवली, असा निष्कर्ष काढला तर ते चुकेल का?

   युक्रेनयुद्धामुळे युरोपमध्ये विकास जवळजवळ थांबल्यातच जमा झाला आहे, नवीन नोकऱ्या तर तयार होत नाहीतच, उलट नोकरकपातीला तोंड देण्याची वेळ नोकरदारांवर आली आहे, महागाई सतत वाढत चालली आहे. ज्यांना हे भोगावे लागत आहे त्यापैकी अनेकांचा या संघर्षाशी काडीचाही संबंध नाही. काही देशात जसे की हंगेरी आणि पोलंड या देशात महागाईच्या वाढीचा दर 15% पेक्षा जास्त आहे. आज  अमेरिका युरोपला खनिज तेलाचा आणि इंधन वायूचा पुरवठा करते आहे खरी पण ती रशियावर केलेली मात ठरत नाही कारण तेल आणि वायू  महाग दराने घ्यावा लागतो आहे. युरोपातील बहुतेक देशांची अंदाजपत्रके पार कोलमडली आहेत. रशियाचे निदान तसे झाले नाही.

   आजच्या काळात तुटीची अंदाजपत्रके निषिद्ध मानली जात नाहीत, पण अर्थव्यवस्था विकास पावत असेल तरच. पण अख्या युरोपची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. लोकांना कर्ज काढून एकेक दिवस पुढे ढकलावा लागतो आहे. उर्जा आणि अन्नाच्या किमती एकमेकींशी स्पर्धा करीत वाढताहेत. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) कमी होत चालले असतांनाच युरोप वृद्धत्वाच्या दिशेने चालला आहे. उत्पन्न वाढवायचे तर करवाढ करणे आवश्यक आहे. पण उत्पन्न असेल तरच कर देता देणार ना!  

   युक्रेनयुद्धाचे अमेरिकेवर परिणाम 

   युक्रेनयुद्धाचे अमेरिकेलाही चांगलेच चटके  आणि फटके बसले आहेत. महागाई कमी व्हायचे नाव घेत नाही. गेल्या 4 दशकातली अमेरिकेतली यावेळची भाववाढ महत्तम आहे. अमेरिकेला संरक्षणावरच्या खर्चात वाढ करावी लागली आहे. यावेळी अंदाजपत्रकात अमेरिकेची संरक्षणावरील तरतूद 33% पेक्षा जास्त आहे. हा खर्च कमी केला तर युक्रेनला दिली जाणारी येणारी मदत कमी करावी लागेल. असे झाले तर युक्रेन पारच बुडेल. खर्च कमी करू नये तर देशातील महागाई वाढतच राहील. या शृंगापत्तीत (डायलेमा)   अमेरिका सापडली आहे. लढाईत कुणाचाच विजय होत नसतो. दोन्ही पक्षांचा पराभवच होत असतो, हा पंतप्रधान मोदींचा हितोपदेश किती महत्त्वाचा होता याचा पुन्हा एकदा परिचय युक्रेनयुद्धाच्या निमित्ताने आला आहे.

   भाववाढीमुळे युरोप आणि अमेरिकेत कर्मचाऱ्यांना पगार पुरेनासा झाला आहे आणि त्यांच्या वेतनवाढीसाठीच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी संपाच्या धमक्या दिल्या आहेत, संपाअगोदरच्या आंदोलनांना ऊत आला आहे. इकडे युक्रेनयुद्ध जसजसे रेंगाळत गेले तसतसा कर्मचारी जगतातील असंतोष दिवसेदिवस वाढत चालला आहे. त्याचा भडका केव्हा उडेल, ते सांगता येत नाही.

  जगाचे काय?

   भारत आणि चीनने रशियाबरोबरचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले आहेत. भारताने  तर खनिज तेल आणि इंधन वायूची फार मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला सुरवात केली आहे. कच्च्या तेलाबाबत आज रशिया भारताचा फार मोठा पुरवठादार झाला आहे. हे तेल भारतात शुद्ध होते आहे आणि युरोपातही विकले जाते आहे. म्हणजे रशियन तेल युरोपात पोचते आहेच की. म्हणजे हा द्राविडी प्राणायामच झाला म्हणायचा. पाश्चात्य देशांसाठी युक्रेनची लढाई लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही अशा स्वरुपाची आहे. ती तशी असेलही, नाही तशी ती आहेच, असाही अनेकांचा धोशा असतो. ‘पण आजतरी सर्व जग महागाई, तुटवडा, रक्तपात यांच्याशीच कसेबसे कण्हत कुथत लढते आहे आणि तेही युक्रेन आणि रशियासारखेच  होरपळून निघाले आहे. 


Monday, March 13, 2023

    


युक्रेनप्रकरणी अपेक्षाभंग 

कुणाचा, कुणाकुणाचा? 

(पूर्वार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक: १४/०३/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

युक्रेनप्रकरणी अपेक्षाभंग 

कुणाचा, कुणाकुणाचा? 

(पूर्वार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   बखमुत्का नदीच्या काठावर वसलेले बखमुट हे पू्र्व युक्रेनमधील शहर नुसतेच एक शहर नाही तर ते एक महत्त्वाचे प्रशासकीय आणि आज तर एक सामरिक केंद्र झाले आहे. म्हणून रशियाने या शहराला वेढा घातला असून काय वाटेल ते करून हे शहर जिंकायचेच, असा निर्धार केला आहे. या शहरातील जवळजवळ सर्व म्हणजे  71,000 नागरिक बाहेर पडले असून आज या शहरात भग्नावशेषांशिवाय फारसे काही शिल्लक उरलेले नाही. तरीही रशियासारखाच निर्धार करून युक्रेनच्या फौजाही लढत असून, हे शहर रशियाच्या हाती पडू नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या संघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे नक्की सांगता येत नसले तरी काय लागेल, ते स्पष्ट दिसते आहे. आज ना उद्या रशियाच्या हायपरसॅानिक मिसाईल्स च्या माऱ्यापुढे टिकाव धरू न शकल्यामुळे हे शहर रशियाच्या हाती पडेलच. पण कडवी झुंज कशी असते आणि सर्वस्वाचा नाश म्हणजे काय, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या संघर्षाची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल.  जिथे एकेकाळी टोलेजंग इमारती होत्या तिथे आता पक्त दगडाविटांचे ढिगारेच कायते दृष्टीला पडतील.

   पत्रपंडितांचे अंदाज फोल ठरले 

  आता वर्षभरापेक्षा काही अधिक दिवस मागे जाऊया.  24 फेब्रुवारी 2022 ला रशियन तोफगोळ्यांची युक्रेनवर बरसात सुरू झाली होती. युक्रेन जेमतेम एक आठवडा तग धरेल असे पत्रपंडितांना वाटत होते. पण मार्च 2023 मध्येही  युक्रेन इंच इंच लढवीत रशियाचा दमदारपणाने सामना करीतच आहे. या युद्धात युक्रेनचे खूपच नुकसान झाले, पूर्व युक्रेन जवळजवळ बेचिराख झाला, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण युक्रेनच्या तुलनेत रशियाची हानीही काही कमी झाली नाही, याचे मात्र आश्चर्य वाटते. युक्रेनला युरोप आणि अमेरिकेने सर्वप्रकारे मदत केली हे सत्य असले तरी, शस्त्रे लढत नसतात, लढले ते युक्रेनचे सैनिकच, हे विसरून चालणार नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानलाही शस्त्रास्त्रे पुरविली होती, तिथे तर सोबत अमेरिकन सैनिकही थांबले होते. पण अफगाणिस्तानचे सैनिक लढलेच नाहीत. अनेक तर शस्त्रास्त्रांसह सरळ तालिबान्यांनाच जाऊन मिळाले, हा इतिहास तसा ताजाच आहे. युक्रेनची ख्याती अगदी उलट आहे. युक्रेनने आक्रमकांना चोख उत्तर दिले.  सर्व दृष्टींनी चौपट मोठ्या रशियाशी युक्रेनचे नेतृत्व, सैनिक आणि सामान्य नागरिकही ज्या जिद्दीने लढा देत आहेत, त्याला  दाद द्यायलाच हवी.  

    ज्यो बायडेन यांची युक्रेन भेट 

   युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष होत असताना रशियाचे अध्यक्ष  व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेबरोबरच्या अण्वस्त्र निर्मिती नियंत्रण करारातून माघार घेऊन अमेरिकेसह सर्व  जगालाही भावी आण्विक युद्धसंकटाची जाणीव करून दिली आहे. अर्थात लगेचच  जगात आण्विक युद्ध सुरू होईल, असे वाटत नाही. हा दबावतंत्रातील एक नवीन डावही असू शकेल. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पोलंडमधून 10 तास रेल्वेने प्रवास करून  युक्रेनला नुकतीच भेट दिली आहे. या भेटीने त्यांनी दोन उद्देश साध्य केलेले दिसतात. अमेरिकेने रशियाला जाणीव करून दिली आहे की, आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालीत नाही. असे करतांनाच त्यांनी युक्रेनला धीर आणि भरवसा दिला की अमेरिका तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. त्यांनी पुतिन यांचा धिक्कारही केला.  पण युद्धाची झळ सोसणाऱ्या जगाला त्यांनी जाणीव करून दिली की, युक्रेनचे युद्ध सुरूच राहणार असून जगाने हे वास्तव गृहीत धरून आपली भविष्यातली धोरणे आखावीत. अमेरिका आणि रशिया यांनी जगाला शांततेची अपेक्षा ठेवू नका असे जाणवून देऊन अंधारात ठेवले नाही, हे  एकप्रकारे बरेच झाले. 

शॅडो बॅाक्सिंग

 रशिया युक्रेनवर चालून गेला  तेव्हा हे युद्ध लवकर संपेल असा त्याचा आडाखा होता. पण झाले भलतेच. युक्रेनने रशियाला  थोपवण्यासाठी कडवी झुंज दिली. त्यामुळे आता माघार घेतली तर  नामुष्की आणि लढतो म्हटले तर पुरती दमछाक झालेली, अशा पेचात रशिया सापडला आहे. अमेरिकेला अशा प्रकारची  अडचण तूर्तास तरी नाही. उलट अमेरिकन रक्ताचा एकही थेंब सांडू न देता, अमेरिकेने रशियाला फार मोठी किंमत मोजायला भाग पाडले आहे. स्वत: प्रत्यक्ष युद्ध न करता अन्य उपायांनीही प्रतिपक्षाला कसे नामोहरम करता येते, याचा हा एक उत्तम वस्तुपाठ ठरावा. बॅाक्सिंगच्या खेळात शिकाऊ बॅाक्सर समोर प्रतिस्पर्धी उभा आहे अशी कल्पना करून ठोसे मारून आपली ठोसे मारण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो. याला शॅडो बॅाक्सिंग असे म्हणतात. रशिया आणि अमेरिका यांचे असेच चालू आहे की काय अशी शंका काहींनी व्यक्त केली आहे. काही शस्त्रे दोघांजवळही अशी आहेत की, ज्यांची प्रत्यक्ष लढाईतील परिणामकारकता अजून पारखलीच गेली नव्हती. तो हेतू युक्रेन यद्धाच्या निमित्ताने दोघांचाही साध्य झाला आहे. यावेळी टांगता लोड म्हणून युक्रेनचा वापर करण्याची संधी चालून आली आणि या दोन महासत्तांनी तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला. फरक इतकाच आहे की बॅाक्सर समोर टांगलेला लोड निर्जीव असतो तर युक्रेन हे एक सजीव राष्ट्र आहे.

 नाटोसमोरील पेच 

   युरोप आणि अमेरिकेकडून होणाऱ्या शस्त्रांच्या पुरवठ्याच्या भरवशावरच युक्रेन हे युद्ध रशिया सारख्या महाशक्तीबरोबर लढतो आहे, हे स्पष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, युक्रेन युद्धात नाटो अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेच. नाटो ही अल्बामा, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, डेनमार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलंड, इटली, लॅटव्हिया, लिथुॲनिया, लक्झेंबर्ग, मॅांटेनिग्रो, नेदरलंड्स, नॅार्वे, पोलंड, पोर्च्युगाल, रोमॅनिया, स्लोव्हॅकिया, स्लोव्हॅनिया, स्पेन, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स या 30 देशांची लष्करी संघटना आहे.  पण नाटो हात राखूनच मदत  करतो आहे. युक्रेनला आता विमानांची गरज आहे. झेलेन्स्कींची ही मागणी अद्याप कुणीही फेटाळलेली नाही. पण अजून तरी युक्रेनला हवी असलेली  विमाने दिलीही नाहीत.  शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची मदत करणे तुलनेने सोपे आहे.  शस्त्रास्त्रांसह दारूगोळा विमानात चढवला आणि दिला पाठवून, की झाले. वैशिष्ट्यपूर्ण विमानांचे तसे नसते. एकतर त्यांच्या पायलटांना प्रशिक्षण द्यावे लागते, त्याला वेळ लागतो. युक्रेनला  तर मदत तातडीने हवी आहे. बरे चालक आणि पायलटांसह रणगाडे आणि विमाने पाठविणे म्हणजे नाटोने प्रत्यक्ष युद्धात उतरणेच झाले की. असे झाले तर रशियासमोर अण्वस्त्रे  वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. इतपर्यंत रशियाला रेटित न्यायचे किंवा कसे हा निर्णय सोपा नाही. चालक आणि पायलटांसह रणगाडे आणि विमाने पाठविण्याला नाटोच्या सर्वच सदस्य राष्ट्रांचे समर्थन मिळणार नाही, हीही एक ्डचण आहेच. हंगेरी आणि इटली या सारख्या नाटो सदस्य राष्ट्रांचे रशियाशी विशेष सख्य आहे. त्यांचा या निर्णयाला पाठिंबा मिळणार नाही आणि नाटोत फूट पडलेली अमेरिकेला परवडणार नाही. असे असले तरीही युक्रेनचे  दोन पायलट विशेष प्रकारची विमाने उडविण्याचे शिक्षण अमेरिकेत घेत असल्याचे चित्रण नुकतेच समोर आले आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया रशिया किंवा चर्चा आणि मुत्सद्देगिरीने हा प्रश्न सोडवाना असे मानणाऱ्यांकडून  अजूनतरी समोर आलेली नाही.

  चीनचा दुटप्पीपणा

  हे युद्ध थांबावे, असेच सर्व जगाला वाटते. यात रशिया आणि युक्रेन हेही आले. फरक इतकाच की, युद्ध थांबावे पण जिंकलेला भूभाग आपल्याच हाती रहावा, असे रशियाला वाटते तर युद्ध थांबण्यापूर्वी रशियाने बळकावलेली युक्रेनची इंच न इंच जमीन आपल्याल परत मिळालीच पाहिजे, हा युक्रेनचा आग्रह आहे. पुतिन यांच्या अहंकाराला बाधा पोचणार नाही  आणि युक्रेनलाही आपला भूभाग परत मिळेल, अशी तडजोड अशक्यच आहे. अशा परिस्थितीत हा संघर्ष संपवायचा कसा हा प्रश्नच आहे. अनौपचारिक स्तरावर आणि या कानाचे त्या कानाला कळू न देता  सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहेत. जर्मनी आणि इटलीचे प्रमुख भारतात आले ते केवळ जी 20 च्या बैठकीसाठी नाही. जी काय चर्चा व्हायची त्यात भारत सगळ्यांनाच हवा आहे. कारण युक्रेन आणि रशिया यात संघर्ष सुरू झाला त्या दिवसापासून खरी तटस्थता जर कुणी पाळली असेल तर ती भारताने. युद्धबंदी झाली तर तिचे श्रेय भारतालाच मिळेल. हे चीनला सहन होण्यासारखे नाही. चीनने रशियाशी मदत करण्याचा करार केला खरा पण रशियाला हवी असलेली मदत केली नाही, जी मदत केली ती हात राखून केली. कारण रशिया कमजोर झाला तर चीन साम्यवादी गटात पहिल्या क्रमांकावर असेल. या बरोबर युद्धबंदी घडवून आणण्याचे श्रेयही आपल्यालाच मिळावे, यासाठी चीनची धडपड सुरू आहे. चीनची ही भूमिका केवळ दुहेरीच नाही तर दुटप्पीपणाची आहे.

    एक बाब नक्की आहे की, या युद्धानंतर चीन हाच साम्यवाद्यांमधील बलिष्ठ देश म्हणून जगासमोर येईल. युक्रेनला समोर करून अमेरिकेनेच युरोपला हाताशी घेऊन निरनिराळ्याप्रकारे हे युद्ध पुढे चालू ठेवले हे सत्य आहे. दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपले. त्यानंतर जगात अनेक लहानमोठे संघर्ष होत आले आहेत. प्रत्येक वेळी यातून तिसरे महायुद्ध तर सुरू होणार नाहीना, अशी भीती व्यक्त केली जायची. पण युक्रेनचे युद्ध या सर्वावर कडी करणारे ठरणार आहे यात शंका नाही.


Saturday, March 11, 2023

 लहानपणं देगा देवा-

माझी पहिली सहल


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  माझे लहानपण तसे खेड्यातच गेले आहे. त्याला फारतर गाव म्हणता येईल. लहान असो वा मोठे काही गोष्टी सर्वच ठिकाणी सारख्याच असतात.
  आमच्या अंजनगाव- सुर्जीचेही तसेच होते. नित्यनियमाने सहली निघत. शालेय विद्यार्थी पायी चालत जाता येईल, अशा ठिकाणी जात. एखादे देऊळ, किल्ला किंवा आमराई अशी ठिकाणं असत. सोबत झुणका आणि भाकरी/ पोळी अशी शिदोरी घ्यायची. सकाळी उन्हं पडायच्या आत घरून निघायचं. बारा एक वाजता शिदोरीवर ताव मारायचा, खेळणं, हुंदाडणं झालं की संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत घरी परतायचं.
  माझे मोठे भाऊ मनू व बंडू नियमाने सहलीला जायचे. परत आल्यानंतर गमतीजमती सांगायचे. त्या ऐकून मलाही सहलीला जायची इच्छा व्हायची. पण मला कोणीही बरोबर घ्यायला तयार नसायचे. ‘मध्येच याचे पाय दुखतील, घरी परत जाऊ म्हणून हट्ट करील, ऐकणार नाही, सरळ जमिनीवर फतकल मारून बसेल’, असे मनू बंडूचे म्हणणे असायचे.
  एक दिवस मी कहरच केला. सहलीला जायचेच म्हणून हट्ट धरून बसलो. पण माझ्या रडण्याओरडण्याकडे लक्ष न देता ते दोघेही ज्येष्ठ बंधू सहलीला निघून गेले. शेवटी वडील म्हणाले, 'त्यांना जाऊ दे. आपण दोघंच सहलीला जाऊ'. आईने पुन्हा झुणका तयार केला. सोबत दोन पोळ्या देऊन डबा तयार केला. मी आणि वडील सहलीला निघालो. थोडंस अंतर जातो न जातो तोच माझे पाय दुखायला लागले. रस्त्याच्या कडेला एक रिकामे मैदान होते. मैदानात बाभळीची झाडे होती. आम्ही त्यांचा डिंक गोळा करून आणित असू. त्या झाडाखाली आम्ही बसलो. मला लगेच भूक लागली. डबा खायचा का म्हणून वडलांना विचारले.
  ‘तूच खा. मला भूक नाही’, असे वडील म्हणाले. मी झुणका आणि पोळीवर ताव मारला. खाऊन झाल्यावर मला घरी परत जावेसे वाटू लागले. वडीलांना विचारताच ते लगेच हो म्हणाले.
    आम्हाला  इतक्या लवकर घरी आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, ‘हे काय इतक्या लवकर कसे परतलात? आटोपली सहल?’.
  ‘कसली सहल आणि कसलं काय! पुढच्यावेळी त्या दोघांसाठी डबा तयार कराल  तेव्हा याच्यासाठी थोडासा झुणका आणि  दोन पोळ्या वगळून ठेवत जा म्हणजे झालं’!









   ताक्या वैद्य 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    परवा एका ठिकाणी जिरेपूड व मीठ घातलेले ताक पिण्याचा योग आला. ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पितापिता लहानपणची आठवण जागी झाली. 

    लहानपणी आमच्या घरी गाई म्हशी होत्या. दूधदुभत्याची रेलचेल होती. आम्ही चार भावंडे होतो. मनू, बंडू, मी(वसंता) व बहीण उषा. रोज सकाळी आई आम्हा चौघांसाठी पाटावर साखर घातलेल्या दुधाचे चार कप भरून ठेवायची. शेवटी प्रत्येक कपात एकेक चमचा साय घालीत असे. असे करून झाले की, मुलांनो, यारे दूध प्यायला, असे म्हणून हाक मारीत असे. मी सर्वात अगोदर धावत जाऊन प्रत्येक कपातील साय चमच्याने काढून खाऊन टाकीत असे. एक दिवस हे कोणाच्या तरी लक्षात आले. त्याने आईकडे तक्रार केली. आई मला रागवली. यापुढे तुझ्या कपात साय असणार नाही, असा तिने मला दम दिला. मला रडायला आले. तेव्हा ती म्हणाली की, असे पुन्हा करणार नाहीस, असे मला वचन दे. मी वचन देण्याच्या बाबतीत मुळीच हयगय करीत नसे. त्यामुळे मी तिला ताबडतोब पुन्हा कधीही दुसऱ्याच्या कपातील साय चोरून खाणार नाही, असे आश्वासन व वचन तिला दिले. माझ्याकडून तिला असे वचन अनेकदा घ्यावे लागत असे. असो. 

   ही हकीकत मी माझ्या नातवाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला , ‘आबा, मी तुमच्या बरोबर असतो, तर माझ्या कपातली साय तुम्हाला रोज दिली असती. अहो, रोज इतके फॅट खाणे आरोग्याला चांगले नसते’. माझ्यासोबत तो तेव्हा नव्हता, याची मला हळहळ वाटली.

  आमच्या घरी दर मंगळवार व शुक्रवारी ताक होत असे. आई रवीने ताक घुसळायची व चटकन लोणी काढायची. सोबत गरम पाणी तयार ठेवलेले असायचे. योग्य वेळी ते टाकले की लोणी ताकातून लगेच वेगळे व्हायचे. गरम पाणी टाकताच केवळ दोनचारदा घुसळले की, लोणी ताकातून वेगळे व्हायचे. हे दृश्य मला खूप आवडायचे. आईने ताक करायला घेतले की, मी तिथे जाऊन ते दृश्य बघत उभा राही. आई लोण्याचा गोळा हातात घेऊन हळूहळू तो झेलीत असे. असे केल्याने त्यातील ताक निथळून लोण्याचा घट्ट गोळा तयार वहायचा. मग आई मला प्रत्येकाला हाक मारायला सांगायची. ‘अगोदर मला लोणी दे, मग हाक मारीन’, अशी माझी अट असायची. ती पूर्ण होताच मी इतरांना बोलवीत असे. त्यांच्या हातावरही आई लोण्याचा लिंबाएवढा गोळा ठेवायची. यावेळी माझा हात पुन्हा समोर असायचा. मी मागच्या जन्मी बहुदा राक्षस असलो पाहिजे, असे तिला वाटायचे. तसे ती बोलूनही दाखवायची. 

   तिने असे म्हटले की, मी तिथून निसटून आरशासमोर उभे राहून आपला चेहरा न्याहळत असे. चेहऱ्यावरचे सगळे भाग इतरांसारखेच दिसायचे. फक्त समोरचे दोन दात तेवढे अंमळ मोठे होते. ते मी चाकूने तासून लहान करायला सुरवात केली होती. कुणाच्याही न कळत माझा हा दात लहान करण्याचा क्रम बरेच दिवस चालू होता. एकदा आईने माझा हा उपद्व्याप पाहिला व ती चांगलीच रागावली. दाताला पडलेल्या खाचा तिने बोट लावून तपासल्या होत्या व मला भूतो न भविष्यति असा दम भरला. पुन्हा असे केलेस तर वडलांसमोर उभे करीन, अशी ताकीदही दिली. दातांवर ते तासल्याच्या त्यावेळच्या खुणा अजूनही माझ्या दातांवर आहेत. दात घासतांना क्वचित आजही त्या बोटांना जाणवतात. असे झाले की आज माझे मलाच हसू येते.

   आमच्या घरी दर मंगळवारी व शुक्रवारी ताक होते, हे ओळखीच्या सगळ्यांना माहीत झाले होते. ती लोकं ताक न्यायला येत. येणाऱ्याला संकोच वाटत नसे. देणाऱ्याला आपण काही खास मेहेरबानी करीत आहोत, असे वाटत नसे. काही लोकांसाठी तर आई ताक वगळून ठेवायची. एखाद वेळेस ते आले नाहीत, तर मला त्यांना बोलवायला पाठवायची. ‘त्यांना हवं असेल तर ते येतील की, बोलवायचे कशाला?’, माझी कुरकूर असायची. यावर आई म्हणायची, ’अरे, त्यांच्याकडे पथ्य आहे. ती लोकं सगळी औषध ताकासोबतच घेतात ना?’ मी ताक नेऊन देतो म्हटले तर आईला ते नको असे. ताक पुरतेपणी ज्याचे त्याला मिळेल की नाही, याची तिला शंका वाटत असावी. पण तिने तसे कधी बोलून मात्र दाखविले नव्हते.

  आमच्या गावी हा वैद्य होता. त्याला सगळे ‘ताक्या वैद्य’ म्हणायचे. कारण त्याची सगळी औषधे ताकासोबतच घ्यायची असायची. लोक चेष्टा करायचे. पण त्याच्यावर लोकांचा विश्वासही होता. मला याची गंमत वाटायची. मी एकदा याबद्दल वडलांना विचारले. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘ताज्या ताकाची तुलना काही विद्वान मंडळींनी अमृताशी केली आहे, इतके गुण ताज्या ताकात असतात.’

   या आठवणीतून मी जागा झालो आणि जिरपूड व मीठ घातलेले प्लॅस्टिकच्या पिशवीतील ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पिण्यास सुरवात केली.



हाकेच्या अंतरावर राष्ट्रपती!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
१९५० ते १९५४ या काळात मी नागपूरच्या सायन्स कॅालेजमध्ये म्हणजे आताच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकत असतांना माझे ज्येष्ठ बंधू डॉ बापूराव काणे यांची नागपूरच्या मेयो हॅास्पिटलमध्ये पॅथॅालॅाजिस्ट या पदावर नेमणूक झालेली होती. डॅा उद्दनवाडीकर हे त्यावेळी सिव्हिल सर्जन या पदावर नियुक्त होते. त्या वेळच्या मध्यप्रांत व वऱ्हाड या प्रांताचे मुख्यमंत्री मा. रविशंकर शुक्ल यांचे मंत्रिमंडळ आपल्या स्टाफसह उन्हाळ्यात दोन महिने  पचमढी या थंड हवेच्या ठिकाणी मुक्कामी असायचे. या काळात नागपूरचे सिव्हिल सर्जन या नात्याने डॅा. उद्दनवाडीकर यांची व पॅथॅालॅाजिस्ट या नात्याने डॅा. बी जी काणे (बापूराव) यांचीही दोन महिन्यांसाठी पचमढीला बदली व्हायची. यावेळी सगळी काणे मंडळी व त्यांचे बहुतेक जवळची व दूरचीही नातेवाईक पचमढीला आलटून पालटून मुक्कामाला असत.
आम्हा मुलामुलांसाठी पचमढीचा उन्हाळ्यातील दोन महिन्यांचा मुक्काम ही एक पर्वणीच होती. त्या काळात जटाशंकर ही गुहा, छोटा महादेव, मोठा महादेव, ए,  बी व डी फॅाल, हे धबधबे यासह बरीच धार्मिक व निसर्गरम्य स्थळे आम्ही पालथी घातली होती. जटाशंकर ही खोल दरीतील शंकराची निसर्गनिर्मित पिंड आहे. त्यावेळी आम्हाला केमेस्ट्रीच्या अभ्यासक्रमात स्टॅलेक्टाईट्स व स्टॅलेग्माईट्स अभ्यासाला होते. पाणी खाली पडून आटले तर एक प्रकारचे स्फटिकीकरण खाली जमिनीवर होते व पाण्याचे बाष्पीभवन वरून पडता पडताच झाले तर वरून खाली स्फटिक तयार होत जातात. शंकराच्या पिंडीचे व त्याच्या जटांचे हे वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे.
  पचमढीला त्या काळी  देशी आंब्याची असंख्य जंगली झाडे होती. आज तिथे आंब्याची सोडाच पण इतरही झाडे आपण शिल्लक ठेवलेली नाहीत. असो.
ब्रिटिश राजवटीतही ‘मंत्रिमंडळ’ पचमढीलाच उन्हाळ्यातील दोन महिने मुक्कामी असायचे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या सर्व (शेकडो) देशी आंब्यांवर चांगल्या जातीच्या आंब्याचे कलम केले होते. दुसऱ्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पाण्याच्या एका लहानशा ओहोळाला आडवून एक स्वीमिंग पूल तयार केला होता. यात एका बाजून पाणी निसर्गत: वाहत यायचे, मध्ये पूल (टाके) तयार केला होता व दुसऱ्या बाजूने पूल ओव्हर फ्लो होऊन पाणी पलीकडे वाहत जायचे व ओहोळाचा प्रवास पुढे अव्याहत सुरू रहायचा. या अधिकाऱ्याचे नाव या स्वीमिंग पुलाला दिले होते. त्यावरून या पुलाला ‘ट्वायनाम पूल’ असे म्हटले जायचे. आमचा रोजचा या पुलावर पोहण्याचा कार्यक्रम असायचा. आता मात्र पचमढीला यातील फारच कमी बाबी शिल्लक आहेत, असे ऐकतो. सर्व भूभाग ओसाड झाला आहे. ओहोळ, धबधबेही आटले आहेत. असो.
त्या काळी डॅा राजेंद्रप्रसाद भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना श्वासाचा (बहुदा दम्याचा) त्रास असावा/होता. पचमढीचे हवामान या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी चांगले समजले जायचे. त्यावेळच्या मध्यप्रांत व वऱ्हाडच्या शासनाने राष्ट्रपती महोदयांना मोठ्या अगत्याने पचमढीला हवापालटासाठी  निमंत्रित केले होते. एका उन्हाळ्यात ते पचमढीला मुक्कामाला आले असतांना एके दिवशी संध्याकाळी आमचे मुलामुलांचे टोळके रस्त्याने टवाळकी करीत जात होते.  समोरून साक्षात राष्ट्पती पायी चालत येतांना आम्हाला दिसले. त्यांच्या सोबतीला आजच्या सारखा लवाजमा नव्हता. सुरक्षा रक्षक व दोनचार अन्य व्यक्ती असाव्यात. आम्ही सर्व त्यांना समोर हाकेच्या अंतरावर पाहून स्तंभितच झालो. आऽ वासून त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. राष्ट्रपतींना समोर भारताची उगवती पिढी दिसत असावी. पण तिचे स्वरूप कसे आहे याची त्यांना बहुदा कल्पना असावी, म्हणूनच बहुदा त्यांनीच प्रथम आमच्याकडे पाहून हात जोडून नमस्कार केला असावा. मग मात्र आम्हाला जाग आली. आम्हीही आदरपूर्वक नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले. हाकेच्या अंतरावर पाहिलेला हा माझ्या आयुष्यातील पहिला राष्ट्रपुरुष होय. दुसरी विशेषता ही की, मी त्याला वंदन करण्यापूर्वी त्यानेच मला नमस्कार केला होता!






 लहानपण देगा देवा
भाकरी आईच्या हातची.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

  आमच्या लहानपणी वॅाशिंग मशीन्स नव्हत्या. कपड्याने हाताने साबण लावून धुवावे लागत. अगोदर धुण्याचा सोडा टाकून ठेवलेल्या पाण्यात भिजवून ठेवावे लागत. केसांना खूप तेल चोपडण्याची पद्धत तेव्हा होती. कधीकधी तर माझ्या कपाळावर तेलाचे ओघळ ओघळायचे. त्यामुळे कपड्यावर तेलाचे व त्यांवर धूळ बसून काळे झालेले डाग पडायचे.
  कपडे धुण्याचे काम आईचे असायचे. ती कपडे खसाखसा घासून धुवायची. एकदा कपड्यात चुकून राहिलेली सुई का टाचणी तिच्या तळहातात अगदी आरपार गेली. पोटिस लावण्यासकट सगळे प्रकार झाले. हात सुजला, तो दुखायचा, ठणकायचा. ताप यायचा. शेवटी एकदाची जखम पिकली. चमचाभर रक्तमिश्रित पूसोबत टाचणीही बाहेर आली. पण यावेळेस तिच्या हातची करंगळी जी वाकडी झाली होती, ती पुढे कधी सरळ झालीच नाही.
  याचा एक परिणाम झाला. तिने थापलेल्या भाकरीवर करंगळीचा वेगळा ठसा स्पष्ट उमटायचा. आईने थापलेली भाकरी आम्ही त्यामुळे ओळखू लागलो. कारण वाकड्या झालेल्या करंगळीचा ठसा भाकरीवर उमटलेला असायचा. आम्ही तो एकमेकांना दाखवीत असू. ते पाहून आई फक्त हसायची. हसण्यामागचे कारण मात्र तिने आम्हाला कधीच सांगितले नाही.




१)‘आईने विस्तव मागितला आहे’.

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   माझे बालपण खेड्यात/ लहान गावात गेले. माझे वडील शिक्षक होते. गावात शिक्षक, पोलिस अधिकारी, डॅाक्टर/वैद्य, सावकार ही तशी मान्यताप्राप्त मंडळी असत. आमच्या घरी आगपेटी असायची पण आदल्या दिवशी राखेखाली झाकून ठेवलेल्या निखाऱ्यांच्या साह्याने आम्ही दुसऱ्या दिवशीची चूल पेटवत असू. चुली दोन प्रकारच्या होत्या. अंघोळीचे पाणी तापवायची चूल स्वयंपाकघरापासून दूर असायची. आमच्या घरी तर पाणी तापवायची खोलीच होती. त्या खोलीत चूल नव्हे तर भला मोठा चुला असायचा. पाणी तापवण्यासाठी त्या चुल्यावर भले मोठे पातेले असायचे. बाजूलाच सरपण (चुलीत जाळायची लाकडे) रचून ठेवलेले असे. स्वयपाकघरातील चूल रोज शेणाने सारवली जायची. त्यामुळे ती रोज साफ करून त्यातली राख बाजूला काढून ठेवली जात असे. पाणी तापवायच्या चुलीचे काम झाले की, आई अर्धवट जळलेली लाकडे व उरलेले निखारे विझवतांना काही निखारे बाजूल करून चुलीतच राखेत झाकून ठेवीत असे. दुसऱ्या दिवशीची चूल या राखेखाली झाकून ठेवलेल्या निखाऱ्यांच्या साह्यानेच पेटवली जायची. निखाऱ्यांवरची राख फुंकून  बाजूला केली की, निखारे पुन्हा धगधगू लागत. ते झाऱ्यावरून स्वयपाकघरात नेऊन दुसऱ्या दिवशीची स्वयपाकाची चूल पेटवली जायची. निखाऱ्यावरची राख फुंकून दूर करण्याचेही शास्त्र असायचे. मी हा प्रयत्न करून पाहिला होता पण उडालेल्या राखेने तोंड काळे तर झालेच पण गरम राखेने चेहऱ्याला चटकाही बसला. तेव्हापासून हे काम आपले नाही, हे मला पटले.

 सकाळी दात तीन पद्धतीने घासले जात. कुणी चुलीतल्या राखेने, तर कुणी कडूलिंबाच्या काडीने, तर कुणी बाभळीच्या काडीने, दात घासायचे. मी राखीने दात घासीत असे. कारण कडुलिंबाची किंवा बाभळीची काडी अगोदर चावून चावून तिचा ब्रश करावा लागायचा. अगोदर ब्रश तयार करायचा व मग त्याने दात घासासायचे. रोज नवीन काडी व नवीन ब्रश. यात वेळ जायचा. त्यापेक्षा मला राख बरी वाटायची. घरी पाहुण्यारावळ्यांसाठी बिटकोच्या काळ्या टूथ पावडरची बाटली असे. दात बिटको कंपनीच्या पावडरने घासणे चांगले की राखेने की कडुलिंबाच्या काडीने की बाभळीच्या काडीने याबाबत मतमतांतरे होती. बिटको कंपनीच्या पावडरला नावे ठेवली जात. काही पाहुणे सुद्धा दात घासण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुलिंबाच्या काडीचाच वापर करीत. टूथब्रश व टूथपेस्टचे नावही आम्हाला माहीत नव्हते. मी स्वत: नोकरी करायला लागेपर्यंत म्हणजे १९५४ सालपर्यंत दंतमंजनानेच दात घासल्याचे आठवते.

 आमच्या घरी दर उन्हाळ्यात एक बैलगाडीभर बाभळीची लाकडे विकत घेतली जात. वडील व आम्ही तीन भावंडे रोज सकाळी कुऱ्हाडीने  लाकडे फोडून झिलप्या व चुलीत घालता येतील एवढ्या लांबीच्या काड्या तयार करीत असू. मोठी लाकडे वडील फोडीत. झाडाला जिथे फांदी फुटते, तो भाग रुंद झालेला असे. त्याला ‘गाठ’ असे नाव असे. गाठी लवकर फुटत नसत. ते काम आम्ही वडलांसाठी राखून ठेवीत असू. 

  लाकडे फोडण्याचेही एक शास्त्र आहे. लाकडाचे दोन भाग करायचे तर इंग्रजी व्ही च्या अक्षरातील दोन तिरप्या रेषेप्रमाणे लाकडावर आलटून पालटून घाव घालावे लागायचे. उभा घाव घालून लाकडाचे दोन भाग करता येत नाहीत. हे आम्ही अनुभवाने शिकलो होतो. लाकडाची काडी उभी फोडायची झाली तर एका मोठ्या लाकडाच्या बेचकेत ती काडी ठेवून मग घाव घालावा लागे. मी एकदा लाकडाची काडी एका पायाने दाबून घाव घालण्याचा ‘शॅार्टकट’ करून पाहिला होता. पण कुऱ्हाडीचा घाव लाकडाऐवजी पायावरच बसला. जखम झाली, रक्त ओघळले, आग होत होती, टिंक्टर आयोडीन जखमेवर टाकताच दाह आणखीनच वाढला, बऱाच ओरडा व तेवढ्याच थपडा असा प्रसादही मिळाला. पण अनुभवाने येणाऱ्या शहाणपणाचा मी धनी झालो, याचा मला आजही अभिमान वाटतो. ही फोडलेली लाकडे रचून ठेवण्याचेही शास्त्र होते. तशी न रचल्यास एक काडी काढता काढता सगळा डोलाराच कोसळतो.

   आम्ही बाभळीचीच लाकडे वापरीत असू. ती महाग असत. पण ती बराच वेळ जळत राहतात, जास्त उष्णता देतात व पेटवल्यावर खूप कमी धूर देतात, असा आमचा समज होता व तो बरोबरही होता.

   आमच्या घरी दिवसाचे चोवीसही तास निखारे राखेने झाकून तयार असत. बाभळीच्या लाकडाचे निखारे राखेने झाकून ठेवल्यास दुसऱा दिवस उजेडेपर्यंत शिल्लक रहात असत. वरची राख फुंकणीने उडवली की ते लगेच धगधगू लागत. सकाळी सकाळी अनेकदा शेजारपाजारची मुले तवा घेऊन येत, ‘काकू, आईने निखारे मागितले आहेत’,असे म्हणत. आपले निखारे त्यांना देण्यावर माझा आक्षेप असे. पण आई म्हणायची, ‘अरे, आपल्याकडे बाभळीचे निखारे असतात ना, म्हणून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकून राहतात. दिले दोन निखारे तर काय बिघडलं?’ पण राखेने झाकलेले निखारा नेताना, निखारा नेणारी व्यक्ती दोन व्यक्तींमधून निखारा नेत नाहीना, याची ती काळजी घेत असे. असो

   सकाळी जाग लवकर आल्यामुळे हा मजकूर मी लिहीत बसलो आहे. पण आता उजाडले आहे. स्वपाकघरात संगीताने लायटरने गॅस पेटवल्याचे जाणवते आहे. तेव्हा लिहायचे थांबून ब्रशने दात घासलेले बरे. नाही का?




२) विहीर

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   माझे बंधू १९५२ ते ५४ या काळात मुलताईला नोकरी करीत होते. कॅालेजला सुट्या लागल्या आणि मी मुलताईला सुटी ‘घालविण्यासाठी’ गेलो. घरी पोचलो तो तिथे काहीशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. घराच्या अंगणातील विहिरीत एक चिमणी मरून पडली होती. विहीर तशी बरीच मोठी होती. पाणी काण्यासाठी रहाट व खिराडी अशा दोन्ही व्यवस्था होत्या. पण रहाट मोडला होता व त्याची लाकडे पाण्यात पडून सडत होती. पण धुणीभांडी करायला तेच पणी एरवी वापरले जायचे. पण आता चिमणी मरून पडल्यामुळे पाणी बाहेरून आणावे लागत होते. पाण्यात उतरून चिमणी बाहेर काढायला कुणीच तयार नव्हते. याच वेळी मी तिथे पोचलो. मला पोहणे येत असल्यामुळे मी विहिरीत उडी मारली चिमणीचे कलेवर अलगद बाहेर फेकले. पाण्यात तरंगत असलेले रहाटाचे लाकडी अवशेषही एकेक करून बाहेर फेकले आणि दोराला धरून बाहेर आलो. साहेबाचा कॅालेजमध्ये शिकणारा भाऊ नागपूरहून आला आणि लगेच उपयोगी पडला म्हणून माझे इतरांनी कौतुक केले. मी आपला ‘कसंचं, कसंचं’, म्हणत विनयानं वागण्याचा प्रयत्न करीत होतो. मला विहिरीत उडी मारून पोहण्याची सवय होती. महालातल्या नबाबाच्या विहिरीत मी अनेकदा पोहत असे.

   मला आश्चर्य वाटले, ते आईचे. तिने माझे भरभरून कौतुक केले. दृष्ट काढायचीच कायती बाकी ठेवली. 

   मी तिला म्हटले,’एवढं कौतुक कराण्या सारखं मी काय केलयं गं? कुस्ती मारून आलोय, की लढाई जिंकून आलोय?’ यावर ती म्हणाली माझ्या जुन्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या आहेत. तू लहानपणी कसा होतास आणि आता कसा झाला आहेस, ते पाहून मला आनंद झालाय.’ 

    ‘अगं तुझा गैरसमज झालायं. मी तेव्हा होतो तसाच आहे. लहानपणी साय चोरून खात होतो नं, ती माझी सवय अजूनही तशीच आहे, हे तुला लवकरच कळेल’, मी म्हणालो.

 आई म्हणाली, ‘मीच तुला चांगली वाटीभर साय साखर घालून देईन. चोरून कशाला, चांगला उजागरीनं खा. या प्रसंगामुळे माझ्या जुन्या आणखीही काही आठवणी जाग्या झाल्या आहेत. तेव्हा मी नुकतीच लग्न होऊन काण्यांची सून झाले होते. माझ्या सासूबाई म्हणजे तुझी आजी अतिशय साधी, सज्जन व सोज्वळ बाई होती. त्यांनी मला लेकीसारखेच वागवले. मला सासुरवास माहितीच नाही. त्याकाळी सासुरवास न होणे हीच नवलाईची बाब होती. बहुतेक सासवा सुनांचा छळ करीत. कुणी म्हटले, टोकले तर म्हणत, मी नाही का सासुरवास सहन केला? माझी लेक नाहीका सासुरवास सहन करते आहे? मग मी सुनेला शिस्तीत वागवले तर चुकले कुठे?’

 ‘मामंजी, म्हणजे तुझे आजोबा मात्र कडक शिस्तीचे व रागीट होते. ते घरात आले की, सगळे कसे चिडीचूप असायचे. एक दिवस मी विहिरीतून पाणी काढत होते. कशी कुणास ठावूक पण माझी सोन्याची पाटली विहिरीत पडली. मी घाबरून गेले, मला काही कळेना. विहिरीवर पाणी भरायला आलेल्या सगळ्या जणींना वाटले की, हिची आता काही खैर नाही. कदाचित मार सुद्धा पडेल. मी रडत रडत घरी आले सासुबाईंना सगळी हकीकत सांगितली. त्याही घाबरल्या. हे भलतेच काय करून बसलीस, असे म्हणाल्या. मामंजी बाहेरून आले.  सासुबाईंनी घाबरतच त्यांना माझी पाटली विहिरीत पडल्याचे सांगितले. आता काय होणार, या भीतीने सर्व श्वास रोखून अंग चोरून उभे होते. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, ‘तिला कोणी काही बोलले का? तिला पाटली नको का होती? तिने काय मुद्दाम पाटली विहिरीत टाकली? तिला कुणी काहीही म्हणायचे नाही’.

  विहिरीत उतरून पाटली काढण्यासाठी कुणी तयार होईना. कारण विहिरीला ढोल पडली होती. ती आतून खचत चालली होती. शेवटी मामंजींनी दोन रुपये द्यायचे कबूल केल्यावर एकाने विहिरीत उतरून पाटली शोधशोध शोधत शोधून काढली. 

  आजही विहिरीत उतरायला कुणी तयार नव्हते. या विहिरीच्या बाबतीत निरनिराळ्या कथा आहेत. तू सरळ उडी मारलीस आणि काम केलेस. माझ्या मुलानं गावाहून आल्याआल्या अडचण दूर केली.

  मला त्या विहिरीबाबतच्या कथा माहीत असत्या तर मी विहिरीत उडी मारली असती का, या प्रश्नाचे उत्तर मी आजही देऊ शकत नाही.





३) लहानपण दे गा देवा - मी म्हशीची धार काढायला शिकतो.

वसंत गणेश काणे 

लहानपणच्या आठवणी सलग स्वरुपात आठवत नाहीत. आज सकाळी सकाळी का कुणास ठावूक एकाएकी घरच्या गाईम्हशींची आठवण झाली. त्यावेळी आमच्या घरी दोन गाई व एक म्हैस होती.

म्हैस विकत घ्यायला मी वडलांसबत बाजारात गेलो होतो. तीन चार म्हशी आम्ही पाहिल्या. एक म्हैस मला आवडली(?) होती. पण वडलांचे मत काही वेगळेच होते. मी हट्ट करून पाहिला. पण वडील मला रागवले, ‘तुला यातलं काही कळतं का? यापुढे मी तुला बरोबर आणणारच नाही’, असं म्हणून त्यांनी मला गप्प केले.

म्हैस विकणारा म्हशीची किंमत १४० रु सांगत होता, ही १९४४ च्या सुमारासची गोष्ट आहे. घासाघीस होऊन ११० रुपयाला ती म्हैस आम्ही घरी घेऊन आलो. ती अगोदरच व्यायलेली होती. त्यामुळे रेडकू (म्हशीचे पिल्लू) सोबत घेऊन आलो होतो. धार काढायला गुराखी होता. ती त्याला धार काढू देईना. प्रत्येक म्हशीच्या काही खोड्या (सवयी) असतात. 

काहींचे मागचे पाय बांधून मगच त्यांची धार काढतात. म्हणून तिचे पाय बांधण्याचा प्रयत्न केला. पण ती पाय बांधू देईना. बहुदा ही सवय तिला नसावी. पण खटपट/झटापट करून तिचे पाय बांधले. तिला ते मुळीच आवडले नसावे. ती थयथय नाचू लागली. पायांना काच बसत होता. पायातून रक्त येऊ लागले. 

काही म्हशींची धार काढतांना धार काढतांना शीळ ऐकायची सवय असते, असे कुणीसे म्हणाले. वसंता कुठे आहे?, वडलांनी चौकशी केली. मी हजर झालो. ‘नेहमी शीळ घालीत उनाडक्या करीत असतोस. बघू बरं कशी शीळ घालतोस ते?’, मी शीळ घालू लागलो, पण म्हशीवर परिणाम होत नव्हता. जरा मोठ्यानं शीळ घाल की. नाहीतर एरवी आम्हाला ऐकून ऐकून बेजार व्हावे लागते. पण माझी शीळ काही म्हशीच्या पसंतीस उतरली नसावी. ‘चल, हो बाजूला’, वडिलांनी बखोट धरून मला बाजूला केले. आपली शीळ म्हशीला सुद्धा आवडत नाही, हे कळून मी खट्टू झालो. त्यानंतर उभ्या आयुष्यात मी कुणालाही शीळ म्हणून घातल्याचे आठवत नाही. 

काही म्हशींची धार काढतांना शेतकऱ्याची बायको समोर उभी राहते. धार काढणारा सगळी धार काढतो की नाही, हे पहायला ती उभी असते. या म्हशीला ही सवय तर नाही ना ? लगेच आई पदर खोचून म्हशीसमोर उभी राहिली. म्हैस खाली मान घालून घमेल्यातले वैरण खात होती. तिने मान वर करून पाहिले सुद्धा नाही. वैरणात पाणी घातलेले काहींना आवडत नाही, काहींना सरकीच हवी असते, ती सुद्धा अगोदर भिजत घातलेली. एक ना दोन. सगळे प्रयोग झाले म्हैस काही दूध काढू देईना. तिची कास भरलेली असायची. सड फुगून तट्ट झाले होते. शेवटी ती म्हैस आम्ही तीस रुपयांना विकून टाकली. ज्याने ती विकत घेतली होती, त्याच्याकडे ती व्यवस्थित धार काढू देत होती. पण तो मात्र आपण फसलो, तीस रुपये वाया गेले, म्हणून आमच्या समोर हळहळत असायचा.

तरी मी म्हटले होते की, ती दुसरी म्हैस विकत घ्या म्हणून? पण आमचं कोण ऐकतो? मागे वडील उभे होते, हे माहीत नसल्याने मी बोलून गेलो. पुढचा प्रसंग ऐकण्यात वाचकांना रुचि नसावी, म्हणून सांगत नाही.

मग आमचे ठरले की, पहिल्या वितीचीच म्हैस विकत घ्यायची. म्हणजे तिला खोडी नसतील. आपण लावू त्या सवयी धार काढतांना तिला लागतील.

मला गाईची धार काढता येत असे. म्हशीची धार काढायची म्हणजे अंगठा आणि पहिल्या बोटात चांगलाच जोर असावा लागतो. धार काढणाऱ्यांच्या बोटांना सुद्धा घट्टे पडतात. गाईची धार काढतांना अंगठा मिटण्याची गरज नसते. मी म्हशीची धार काढू का, असे विचारताच, आरशात तोंड पहा एकदा? भावाबहिणींनी खिजवले. शेवटी मी धार काढणाऱ्याशीच गट्टी जमविली. पण त्याने स्वतंत्र भांडे आणायला सांगितले. ते कसे आणणार? माझे बिंग फुटले असते. शेवटी मी एक युक्ती केली. टिप्याला(आमच्या घरच्या कुत्र्याला) आम्ही एका भांड्यात दूध देत असू. ते भांडे मी घेऊन आलो.त्यातच दूध काढू लागलो. पण त्या दुधाचं करायचं काय? मग ते टिप्यालाच प्यायला घालू लागलो. तो खुशीने शेपटी हलवीत ते दूध प्यायचा. पण एक दिवस आईने हे पाहिले. ती रागावली. ‘एवढे दूध तू कुत्र्याला पाजतोस? काय म्हणू तुला? त्या धार काढणाऱ्याला बरेच झाले आहे. तो मुद्दामच दिवसेदिवस अधिकाधिक दूध काढायचे बाकी ठेवत असणार.  ते काही नाही. उद्या पासून घरातले चांगले भांडे घेत जा. किती दूध काढतोस ते मला दाखवीत जा. नंतर नंतर कंटाळा करशील. दूध पुरते काढले नाही तर दुसऱ्या दिवशी म्हैस तेवढे दूध कमी देते म्हणतात’. आईने धार काढणाऱ्याचीही चांगलीच सटक काढली. पण एक मात्र झाले. मी म्हशीची धार काढायला शिकलो.



६. माझ्या वडिलांना झालेला क्षयरोग

 लहानपण देगा देवा! 

वसंत गणेश काणे 

कारण सांगता येणार नाही. पण अचानक एखादी आठवण जागी होते. आजवर अशा काही आठवणी लिहून मी फेस बुकवर टाकल्या आहेत. ही सहावी आठवण. खूप कालांतराने जागी झालेली. 

  त्या काळी (१९३०साली) माझे वडील पदवीधर होते. पण खरे तर मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर कुटुंबाचा भार वाहण्यासाठी त्यांनी एका कापडाच्या गिरणीत नोकरी करायला सुरवात केली होती. ती नोकरी टिकली असती, तर खूप मोठ्या पदावर ते पोचले असते. कारण अगदी लहान वयात त्यांनी नोकरीला सुरवात केली होती व मिल (गिरणी) मधील नोकरीत पदोन्नतीला भरपूर वाव होता.

  पण असे झाले नाही. त्यांना यंत्रांची धडधड सहन होईना. डाॅक्टरांनी सांगितले तुमचे हृदय कमजोर आहे. तुम्ही ही नोकरी सोडा व एखादी शिक्षका सारखी कमी शारीरिक श्रमाची नोकरी बघा. त्यप्रमणे ते शिक्षक झाले व खाजगीरीत्या त्यांनी पदवी संपादन केली. पण कदाचित या निमित्ताची शिक्षकाची नोकरी व अभ्यास ही धडपड/ धावपळही त्यांना सहन झाली नसावी. रोज ताप येऊ लागला. डाॅक्टरांनी क्षयाची बाधा झाल्याचे निदान केले व माझ्या काकांना सांगितले की, तुमच्या भावाचे आयुष्य फारतर आणखी सहा महिने किंवा फारतर एक वर्ष इतकेच आहे.

  त्यावेळी क्षयावर उपायच नव्हता. काकांनी डाॅक्टरांना विचारले की, क्षयावर काहीच उपाय नाही का? यावर डाॅक्टर म्हणाले क्षयावर औषध नाही. पण ताजी हवा, फळफळावळ, दूध व नियमित आहाराने आयुष्य दोन/तीन वर्षे वाढते, असे आम्ही वैद्यकक्षेत्रातले लोकही मानतो. प्रयत्न करून बघायला हरकत नाही. या दोघा भावांनी गावाबाहेर १०० फूट गुणिले शंभर फूट क्षेत्रफळाचा प्लाॅट घेतला. स्वत: श्रम करून झोपडी बांधली. घरच्याघरी भाजीपाला घ्यायला सुरवात केली व फळझाडेही लावली. गाईम्हशी घेतल्या. घरच्या घरी दूधदुभते मिळविले. दुपारी एका वेळला जेवण व संध्याकाळी फळे व दूध असा आहार घ्यायला सुरवात केली. मोकळ्या हवेत नियमितपणे फिरायला जायची सवय लावून घेतली. क्षयाची बाधा हळूहळू कमी झाली माझे वडील वयाच्या ८२ व्या वर्षी निजधामाला गेले . डाॅक्टरांच्या अंदाजाप्रमाणे वयाच्या २५ व्या वर्षीच जायला हवे.

  पुढे हा मुद्दा विस्मृतीत गेला. म्हातारपणी एकदा एक्स रे काढण्याचा प्रसंग आला. तोपर्यंत असा प्रसंगच आला नव्हता. एक्स रेत दिसले की, त्यांच्या डाव्या फुप्पुसात एक क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराची गाठ होती. ही कसची ते कळेना. त्या वयात आॅपरेशन करण्याचा प्रश्नच नव्हता. 

डाॅक्टरांनी जुने एखादे दुखणे होते का म्हणून विचारले. तेव्हा क्षयाची आठवण झाली. गत इतिहास नव्याने समोर आला  डाॅक्टर म्हणाले, त्या गाठीत काय आहे हे माहिती नाही. आज ते पाहता यायचे नाही. पाहूनही उपयोग नाही. पण जर तरूणपणी क्षयाचे निदान झाले असेल तर एक प्रकार संभवतो. शरीर त्या क्षयाच्या जंतूंचा नाश करू शकले नसावे पण त्यांच्या भोवती पेशींचे कवच घालून शरीराने त्या जंतूंना कायमचे बंदिस्त करून ठेवले असावे. आता ते त्यांच्या बरोबरच जातील. हे निदान(?) झाल्यानंतरही वडील ५/६ वर्षे वावरत होते व वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळामळे (क्षयामुळे नव्हे) जगाचा निरोप घेतला.


५. घर पाहिले बांधून-३

लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे

घराची मूळ चौकट उभी झाली. लाकडी काम सुताराने वेगाने पार पाडले. आता घराच्या चारी बाजूला पडव्या काढायचे ठरले. प्रत्येक पडवी ७ फूट रुंदीची असावी असे ठरले. पाया फार खोल घ्यायचा नव्हताच. तो २/३ फूट खणून दगड, गिट्टी, टाकून भरला वर विटांची आठ फूट उंचीची भिंत बांधायचे ठरले. दोन टोकांना ओळंबा वापरून गवंडी विटा लावून द्यायचा. कारण भिंत जमिनीला काटकोन करून उभी असणे आवश्यक होते मग माती व गवत वापरून केलेला गारा मसाला म्हणून वापरून विटांची जुडाई आम्ही करीत असू. मध्येच भिंतीचे पोक निघत असे. ते गवंडी ठीकठाक करीत असे. छोटे मालक काय भिंत बांधणार, असे म्हणून तो आमच्या कारागिरीकडे गमतीने व काहीसा उपहासानेच पाहत होता. पण काही दिवसांनी आमची गट्टी जमली. आमच्या डोक्याइतकी भिंतीची उंची येण्यापूर्वीच वरची जुडाई त्याने आपल्याकडे घेतली. तोपर्यंत खालची जुडाई वाळली होती. भिंतीचे बाहेरून दर्जे भरायचे होते. म्हणजे दोन विटांमधली जुडाईची माती थोडीशी काढायची व ती फट चुना व रेतीचा मसाला भरायचा असे ते काम होते. फट तयार करण्याचे काम आम्ही केले दर्जे भरून प्लास्टर करण्याचे काम गवंड्याने केले. चारी बाजूंना पुरतील, एवढी मंगलोरी कौले नव्हती. ज्या पडवीत झोपण्याचे पलंग असणार होते तिथे पत्रे टाकायचे ठरले. एका पडवीत कोपऱ्यात मोरी, पुढे पिण्याच्या व स्वयपाकाच्या पाण्याचे गुंड नंतर स्वयपाकाच्या चुली, पुढे देव व नंतर जेवणाची खोली अशी योजना केली होती. एक खोली डार्क रूम व एक कोठीघर केले. मधला हाॅल खूपच मोठा वाटत होता त्यात मध्ये भिंत घालून त्याचे दोन भाग केले. त्यामुळे माळा करता आला बांबू उभा अर्धा कापून माळ्याचा सरफेस तयार केला. 

  माळा तव्यासारखा आंतरगोल झाला. तो तसा राहणे धोक्याचे होते. त्याला मधोमध आधार देणारी बल्ली बसवून आधार देण्याची आवश्यकता होती. बल्ली आणली पण ती ठोकणार कोण? व कशी? त्याच सुमारास बापूराव लढाईहून परत आले होते. मेयोत परत जाॅइन होण्याअगोदर अंजनगावला आले होते. त्यांनी बल्ली ठोकून माळ्याला मधोमध आधार देण्याचे काम हाती घेतले. बल्ली भिंतीला टेकेपर्यंत सहज आत गेली नंतर ती भिंतीत ठोकून बसवायची होती. बापूराव स्टुलावर चढले हातोडीने बल्ली ठोकू लागले. आम्ही सर्व कौतुकाने पण श्वास रोखून उभे होतो. भिंतीला छिद्र पडून बल्ली आत गेली तर ठीक. पण धक्के बसून भिंतच कोसळली तर काय करता? बापूराव हातोडीने बल्ली ठोकत होते. आम्ही बांधलेल्या भिंतीची जडण इतकी पक्की होती की तिला लगेच छिद्र पडले व बल्ली ठीकठाक बसली. आता माळ्याला मधून आधार मिळाला होता. मी सर्वात अगोदर माळ्यावर चढून नाचू लागलो. आईने मला थांबवले. एवढ्यातच त्या माळ्याची परीक्षा नको, असे तिचे मत होते. अशा प्रकारे माळा सज्ज झाला. पुढे दोन तीन दिवस बापूरावांना अधूनमधून, आपणच आपल्या दंडांना मालीश करतांना मी पाहत होतो. दादांना(वडलांना) बापूरावांचे खूपच कौतुक वाटले. ते म्हणाले, बघा आपला बापूराव चार दिवसांसाठीच आला होता पण त्याने केवढे काम केले ते बघा. आईच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू होते.

  एका पडवीची आम्ही डार्क रूम केली. तिचा आम्ही दोन कामांसाठी उपयोग करीत असू. दिवसा दूर मैदानात आरसा ठेवून आम्ही प्रकाश किरणे वापरून  फिल्मच्या तुकड्यातील नटनटींची चित्रे पाहत असू. तो आमचा घरगुती सिनेमा होता. अनेकदा येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायाचा धक्का आरशाला लागायचा. तसे झाले की, आमचा सिनेमा बंद पडायचा व मग आम्ही दार उघडून मैदानात धाव घेत असू व आरसा ठीक करीत असू. 

   डार्क रूमचा उपयोग दिवसा काढलेले फोटो डेव्हलप करण्यासाठी होत असे. रात्री अंधार झाला की, कंदिलाभोवती पारदर्शक लाल कागद लावून जो लाल प्रकाश यायचा त्यात आम्ही फोटो डेव्हलप करीत असू. वडील काळी घोंगडी घेऊन कॅमेऱ्यामधला निगेटिव्ह असलेला कागद काढून तो डेव्हलपर द्रावणात बुडवीत. थोड्यावेळाने तो बाहेर काढून लाल प्रकासशात फोटो किती गडद झाला ते आम्ही बघत असू. पुरेसा उमटला की नंतर डेव्हलपर द्रावणातून काढून हायपोमध्ये टाकीत असू. हायपोचे काम फोटो फिक्स करण्याचे असायचे. दिवसभर काढलेल्या फोटोचे निगेटिव्ह पंधरा तरी असायचे. ते फिक्स झाले की डार्क रूममधून आम्ही घामाघूम अवस्थेत बाहेर येत असू. कंदिलाला लावलेला लाल कागद काढून आमच्या फोटोग्राफीची करामत आम्ही कौतुकाने पहात असू. मला सर्वात अगोदर झोप यायची. बाकीची मंडळी आवराआवर करून अर्ध्या तासाने झोपी जायची.

  एका पडवीचा उपयोग झोपण्यासाठी करीत असू. ओळीने सात पलंग होते. पलंगांच्या फळ्या पलंगावर बसताच वरखाली व्हायच्या व बसणाऱ्याच्या बुडाला चिमटा बसायचा. म्हणून प्रत्येक पलंगावर सतरंजी कायम टाकलेली असायची. प्रत्येकाची वेगळी गादी, उशी, पांघरूण व मच्छरदाणी होती. एकदा गावात चोर शिरल्याची माहिती कळली. ते घरफोडी करायचे, घरच्यांना मारहाण करायचे व चीजवस्तू लुटून न्यायचे. आमचे घर त्या भागात एकटे होते. आजूबाजूला घरे नव्हती. चोर आले तर काय करायचे. सगळ्यांनी एकदम ओरडायचे, असे ठरले. पण आवाज ऐकू येईल का? मी म्हटले मी ओरडतो. तुम्ही दूरवर जाऊन आवाज ऐकू येतो का, ते पहा. त्यापेक्षा आपण ओसरीला असलेले पत्रे वाजवले तर? मी पत्रे वाजवायला तयार झालो. पण आईने मला थांबवले. ती म्हणाली चोर आले की, मग वाजवा. आताच गाव गोळा करायला नको. 

  पण चोरांची वार्ता कळवण्याचे काम गोठ्यातली गुरे करायची. एके रात्री ती अस्वस्थ झाली. इतकी की आम्ही जागे झालो. वडील एका हातात कंदील व दुसऱ्या हातात सोटा घेऊन पहायला निघाले. चोर खरेच आले होते. पण ते कडबाचोर होते. आम्ही कडब्याच्या पेंड्या गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवल्या होत्या. त्या चोरायला ते आले होते. आम्हाला जाग आलेली पाहताच ते पळून गेले. सकाळी आम्ही त्यांनी पळवण्यासाठी काढून ठेवलेल्या पेंड्या परत आणून ठेवल्या. यापेक्षा वेगळा चोरीचा अनुभव आमच्या वाट्याला आला नाही. चोरी कुणाकडे करायची याची अक्कल चोरांना नक्कीच असणार, असे आई म्हणायची. त्यामागचे कारण तेव्हा मला कळत नव्हते.




४. घर पाहिले बांधून-२
लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे

घर बांधायचे ठरले. वडील सेवानिवृत्त झाले होते. फंडाची रक्कम हाताशी होती. त्यामुळे आता नीट व चांगल्याप्रकारे घर बांधायचे असे ठरले. पहिले घर पाडायचे आणि त्याच जागी नवीन घर बांधायचे झाले तर मधल्या काळात रहायचे कुठे असा प्रश्न उभा राहिला. वडील म्हणाले त्यात काय गोठ्यात राहू काही दिवस. तीन महिन्यांचाच कायतो प्रश्न आहे. पण गोठा गुरांना बांधण्यासारखाही राहिलेला नाही, असे आम्हीच अगोदर पासूनच म्हणत असू. समजा आपण गोठ्यात राहिलो जरी, तरी मग गुरे कुठे बांधायची. बांधू काही दिवस मोकळ्यावरच, एक विचार समोर आला. पण तो सोडून द्यावा लागला कारण कुणीतरी सांगितले गुरांना गोठ्याची सवय झाली आहे. ती मोकळ्यावर राहणार नाहीत. दावे तोडून आत गोठ्यात येतील. यापेक्षा अगोदर गुरांसाठी नवीन गोठा बांधू. त्यात आपण काही दिवस राहू. घर बांधून झाले की, आपण घरात जाऊ. गुरे नवीन गोठ्यात बांधू व जुना गोठा तोडून टाकू. हा विचार पक्का झाला. त्याप्रमाणे गोठा बांधायला घेतला. अगोदर जमीन धुम्मस करून पक्की केली. सागवानाचे खांब डांबर लावून जमिनीत पुरले. वरती पत्रे घातले. बाजूलाही पत्रेच लावले. गोठा चांगलाच बंदिस्त झाला होता. मला वाटले आपण गोठ्यातच राहिलो तर काय हरकत आहे. मी आईशी बोललो. माझी आई चांगली शिकलेली होती. म्हणजे चौथा वर्ग पास होती. तिने मला मूर्ख म्हटले नाही. ती म्हणाली, आपण नाहीतरी काही दिवस तिथेच राहणार आहोत. घर बांधून झाले की ठरवू, कुठे रहायचे ते. तेव्हा तूच ठरव. मला तिचे म्हणणे पटले.
  पुढे नंतर गोठा म्हणून वापरायचे शेड तयार झाले. आम्ही सामान तिकडे हलवले. वडील परतवाड्याला जाऊन ट्रकभर फळ्या घेऊन आले. चौकोनी तुळया कापल्यानंतर उरलेल्या त्या सागवानी फळ्या होत्या. या लाकडातून दारे, खिडक्या, पलंग, रॅक्स, कपाटे अशा अनेक वस्तू त्या काळच्या पद्धतीनुसार व आमच्या ऐपतीनुसार आम्ही तयार करून घेतल्या होत्या. त्यातले एक कपाट आजही माझ्या घरी आहे. ते पाहिले म्हणजे तुळया कापून उरलेली फळकुटेही कशी व किती उपयोगाची ठरली असावीत, याची कल्पना येईल. कमी रुंदीच्या पण काही पाव इंच, काही अर्धा इंच तर काही एक इंच जाडीच्या फळ्या त्यातूनच निघाल्या. ठावे, चौकटीसाठीची लाकडेही त्यातून निघाली. उरलेला कचरा घर बांधून झाल्यावर आम्ही पाणी तापवायच्या चुलीत इंधन म्हणून बरेच दिवस वापरीत होतो. या सर्व लाकडासाठी ३५ रुपये मोजावे लागले होते. हा खर्च केला तर खरा पण वडील काळजीत पडलेले दिसले.
  ही १९३९/४० सालची गोष्ट आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. इंग्रजांच्या फौजांची पिछेहाट होत होती. महागाईचा भडका उडायला सुरवात झाली होती. एरवी जे लाकूड २५ रुपयाला मिळाले असते, त्यासाठी तब्बल ३५ रुपये मोजावे लागले होते. महागाई उत्तरोत्तर वाढतच जाणार हे स्पष्ट झाले. घरबांधणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडून पडणार अशी चिन्हे दिसू लागली. वस्तूंच्या भावांसोबत मजुरीचे भावही वाढायला सुरवात झाली होती.
  दादांनी (वडलांनी) सुतार म्हणून ज्याची निवड केली होती, त्याची दादांवर भक्ती होती. त्याची मुले दादांनी ‘शहाणी करून सोडली’ होती. त्याने धीर दिला. गुरुजी, काळजी करू नका. आपण चार महिन्याऐवजी घर एक महिन्यातच बांधून काढू. मी भराभर चौकटी (दारे व खिडक्यांच्या) तयार करतो. पल्ले रंधा न मारताच तयार करू. कौले टाकायच्या कैच्या  व उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मारायच्या रिफांना रंधा नकोच असतो. जमतील तेवढी जुनी कौलंच वापरू.
अशाप्रकारे सुतारकामाची सोय झाली. गवंडीकामाचे काय? जुन्या घराला होत्या तशा कुडाच्याच भिती बांधायचे ठरले चारी बाजूनी पडव्या निघणारच होत्या. त्यांच्या भिंतीपुरत्याच विटा वापरायचे ठरले. चुना न वापरता गाऱ्यातच विटांची जुडाई करायची. बाहेरच्या बाजूचे दर्जेच तेवढे चुन्याने भरायचे. दर्जे भरणे म्हणजे काय ते मला काही दिवसांनीच कळले. विटांची जुडाई मातीने करायची. बाहेरच्या बाजूने विटांना जोडणारी माती खरवडून खाचा करायच्या व त्यातच तेवढा चुना भरायचा. व हेही बाहेरच्या भिंतींनाच करायचे. रेती व चुन्याची गरज आता एक चतुर्थांश इतकीच उरली.
  जुने घर बांधले त्यावेळचा अनुभव असलेले दोघेच उपलब्ध होते दादा (माझे वडील) व माझी आई. तिने त्या वेळी रेज्याचे काम केले होतेच. शिवाय आता हाताशी तीन किशोर होते. मनू (मनोहर केळकर माझा मावसभाऊ), बंडू (नारायण काणे माझा मोठा भाऊ) व वसंता ( मी वसंत काणे). मनू बंडू किशोर शोभले असते पण मी बालवयातच होतो. पण ती उणीव मी बडबड करून भरून काढीत होतो. माझी मावशी गोदुताई 

(यशोदा केळकर) व धाकटी मावस बहीण उषा केळकर. मावशी शिक्षिकेची नोकरी करून घरी आल्यावर मदतीला असे. उषा आम्हा तिघांच्या शर्टाचे टोक आळीपाळीने धरून आमच्या सोबत वावरत असे.
  माझे मोठे बंधू बापूराव ( डाॅ भगवान काणे) व बहीण सुमाताई ( सुमती काणे) नागपूरला राॅबर्टसन मेडीकल स्कूल मध्ये शिकत होते. खरे सांगायचे तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. वर्षभर बापूराव दोन शर्ट्स व दोन पॅंट्स व सुमाताई दोन साड्या एवढीच कपड्यांची चैन करू शकत होते, हे सांगितले म्हणजे आमची स्थिती किती ओढग्रस्तीची होती, हे वेगळे सांगायला नको.
लाकडांची चौकट तयार करायची, हे काम सुताराचे. बांबू कापून त्याच्यातून योग्य मापाच्या कमड्या तो सुरवातीलाच करून देत असे. चौकटीतील तीन उभ्या दांड्यांना कमड्या धनुष्याप्रमाणे वाकवून आम्ही लाकडी दांडे व कमड्या यांचा वापर करून भिंतीचा लाकडी सांगाडा तयार करू लागलो. तो तयार होताच गारा थापून कुडाची भिंत तयार करू लागलो. क्वचित काही अडले तर मदतीला एक मजूर व एक रेजा होती. ते आपले इतर काम सोडून तेवढ्या पुरते येत. अडचण दूर झाली की आपल्या कामाला परत लागत. अशाप्रकारे अतिशय कमी वेळात आम्ही घराचा मधील चौकोनी भाग तयार केला.
  आता कैच्या चढवण्याचे काम मेहनतीचे व जोखमीचे होते. याकाळात सुताराने बारा/चौदा कैच्या तयार केल्या होत्या. त्या चढवून फिट करण्यासाठी दोन मजूर आणखी लावावे लागले. यथावकाश छताची लाकडी चौकट तयार झाली. त्यावर लाकडी फळ्या ठोकल्या व कौले बसवायला सुरवात झाली. आता उरल्या होत्या पडव्यांच्या भिंती. त्या विटांच्या करण्याचे ठरले होते. पाया घेऊन या भिंती बांधायच्या, हेही ठरले होते.



३. घर पाहिले बांधून-१

लहानपण देगा देवा

वसंत गणेश काणे 

  आम्ही दोनदा धर बांधले. पहिले घर बांधले तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे त्या घराची ऐकीव माहितीच गाठीशी आहे. पण सुरवात पहिल्या घरापासूनच करायला हवी. कारण तो अनुभव लक्षात घेऊनच आम्ही दुसरे घर बांधले होते.

  माझे वडील मिलमध्ये नोकरी करीत होते. पण मिलमधील यंत्रांची धडधड सहन न झाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. नंतर क्षयरोगाचे निदान झाले. डाॅक्टरांनी सहा महिन्यांचे आयुष्य यापुढे शिल्लक आहे, असेही माझ्या काकांना सांगितले. त्यावेळी क्षयावर उपचार असे नव्हतेच. डाॅक्टरांनी मोकळी ताजी हवा, खाण्यात फळफळावळ व दूघ आणि दुधाचे पदार्थ, जेवणात भाजीपाला व चालण्याचा व्यायाम असे उपचार करून पहा, अशी सूचना केली. त्यानुसार वडलांनी गावाबाहेर रेल्वे स्टेशनपासून दोन फर्लांग अंतरावर एक १०० बाय १०० फुटाचा प्लाॅट ६० रुपयांना विकत घेतला. हा काॅर्नर प्लाॅट होता. रस्त्याकडच्या दोन बाजूंना मेंदीचे ( हाताला लावतात ती मेंदी) कंपाऊंड घातले. मजूर बोलवून विहीर खणून घेतली. तिला ३० फुटावरच अतिशय गोड पाणी लागले. यानंतर वडील काका (त्यांना तात्या म्हणत) आई, काकू आणि लहान मुले यांच्यासह प्लाॅटवर रहायला गेले. पथ्याचे कडक पालन सुरू केले व घर बांधायचेही ठरविले. सुरवातीला जमिनीत चार कोपऱ्यात चार सागवानी बल्यांचे खांब बसवले. त्यांच्या भोवती तट्टे लावून घर बांधायला सुरवात केली. या चार खांबांममध्ये थोडे कमी प्रतीचे खांब रोवून घराचा मुख्य चौकोनी आकार तयार करून घेतला लाकडी चौकटी बसवून सांगाडा तयार केला. एखादा मजूर मदतीला असे. बाकी कामे हे भाऊ व आई व काकू मिळून करायचे. तीन उभी लाकडे चौकटीत बसवायची. बांबूच्या कमड्या तयार करून त्या आलटून पालटून धनुष्याप्रमाणे बसवून भिंतीची सांगाडा तयार करायचा. त्यावर गारा थापायचा. गारा तयार करायला मजूर असे. माती व गवत (कसले ते आठवत नाही) मिसळून व पाणी टाकून त्यात पायी जागच्या जागी चालून हा गारा तयार होत असे. कुंभार अशाच पद्धतीने माती ‘तयार’ करतात, हे सांगितले म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होईल. हा गारा थापण्याचे काम आम्हीच करीत असू, असे आई सांगायची हा दोन्ही बाजूंनी थापावा लागायचा. अशा सर्व भिंती तयार झाल्या. योग्य ठिकाणी दारे खिडक्यांसाठी जागा सोडलेली होती. दारे व खिडक्या सुतार व अाम्ही मिळून तयार केल्या होत्या. या भिंती पावसात टिकल्या नसत्या. म्हणून चारी बाजूला पडव्या काढल्या. त्यांची रुंदी सात फुटांची ठेवली होती. यांच्या भिंती पावसाने ओल्या होऊ नयेत, म्हणून व पायव्यात (खरे तर तो नव्हताच) पाणी शिरू नये म्हणून वळचणीचे पाणी दूर पडेल असे छत बेतले. एक पडवी झोपण्यासाठी होती. ती बांबू मधोमध उभे कापून व त्यांची चौकट करून बंद केली. एका पडवीत स्वयपाकघर, पाण्याचे गुंड ठेवण्याची खोली, एका कोपऱ्यात न्हाणीघर  होते. बाकी पडव्यात खोल्या करून घेतल्या होत्या. असे ऐसपैस घर बांधले होते. मधला चौकोन पडव्यांपेक्षा उंच घेतला होता. त्याच्यावर लाकडाच्या कैच्या बसवणे त्यावर लाकडी रिफा घालणे व त्यावर मंगलोरी कौले बसवणे ही कामे सुतार व मजुरांकडून करून घेतली. पडव्या पत्र्यांनी झाकल्या होत्या. हे घर दहा वीस वर्षांपेक्षा जास्त दिवस टिकणे शक्यच नव्हते. तसेच झाले. भिंती वरून खचू लागल्या, त्यातून आकाश दिसू लागले.  

या सर्व कालखंडात सर्व पथ्यपाण्याचे कसोशीने पालन करीत वडलांनी क्षयरोगावर ताबा मिळवला होता. म्हणजे नक्की काय झाले होते, ते त्यांच्या वृद्धापकाळीच कळले. फुप्पुसात ज्या भागात क्षयाची बाधा झाली होती त्याच्याभोवती शरीराच्या निरोगी कोशांनी आवरण घातले होते व त्याच जागी कायमचे स्थानबद्ध करून ठेवले होते. असे काहीसे या प्रकाराचे वर्णन करता येईल.

  दूधदुभत्यासाठी गायी म्हशी घेतल्या. गोठाही बांधला. दूध, तूप यांची रेलचेल होती. आम्ही दूध विकत नसू, ते आम्हाला घरातच लागत असे. ताक मात्र पुष्कळसे वाटून टाकीत असू. एक दिवसाआड विरजण घुसळून ताक केले जायचे. आईचे ताक चटकन घुसळले जायचे लोण्याचा मोठा गोळा तयार होत असे. तो हातातल्या हातात थोडासा वर फेकून ती झेलायची. यामुळे ताक निथळून जात असे. आईची लोण्याचा गोळा झेलतांनाची मूर्ती आजही माझ्या दृष्टीसमोर उभी राहते. अशाप्रकारे सर्व ताक केव्हा एकदाचे निथळते याची वाट पहात आम्ही बालगोपाल बाजूला आशाळभूतपणे बसलेलो असायचो. प्रत्येकाच्या हातावर लिंबाएवढा लोण्याचा गोळा पडायचा. घुसळणाचा माठ ताकाने जवळजवळ अर्धा भरलेला असायचा. शेजारपाजारचे लोक ताकासाठी भांडी घेऊन यायचे. प्रत्येकाला हवे तेवढे ताक मिळत असे. कुणाला जास्त हवे असले तर तो तसे मागून घ्यायचा.




लहानपण देगा देवा

२. बाभूळ 

वसंत गणेश काणे
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी हे माझे जन्मगाव. लहानपणी मित्रमंडळींसह बाभळीच्या झाडावर चढायचे आणि डिंग गोळा करायचा, परत येता येता जमेल तेवढा खायचा आणि उरलेला आईच्या हवाली करायचा, हा रोजचा संध्याकाळचा क्रम होता. कधीकधी काही डिंक खिशातच रहायचा. सदरा तसाच धुवायला गेला की तो खिशाला चिकटायचाआणि सदरा धुताधुता बराच वेळ जायचा व त्रासही व्हायचा. मग आईची बोलणी खावी लागत.
  बाभळीच्या झाडाला मोठाले काटे असतात. आमच्या लहानपणी दुसरे महायुद्ध सुरू होते. तोफादी शस्त्रे तयार करण्यासाठी लोखंडाची गरज भासे. त्याकाळी भारतात टाचण्या तयार होत नसत. किंवा एखादा कारखाना असलाच तर असेल. त्यामुळे टाचण्यांची सुद्धा इंग्लंडमधून आयात होत असे. ती युद्धामुळे बंद झाली. ते लोखंडही शस्त्रासाठी वापरले जाऊ लागले. पण मग कागद टाचायचे कसे? एका सुपीक डोक्यातून उपाय बाहेर आला. टाचणीऐवजी बाभळीचे काटे वापरावेत. झाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे काटे गोळा करण्याचे काम असे. यासाठी फारसे कष्ट पडत नसत. कारण कार्यालयाच्या आवाराच्या कुंपणात बाभळीची झाडे असत.
  घरी स्वयंपाक चुलीवर असे. अंघोळीचे पाणीही चुलीवरच तापवले जायचे. बाभळीच्या लाकडांची गाडी आम्ही दरवर्षी खरेदी करीत असू. ती लाकडे फोडून त्याच्या झिलप्या तयार करायच्या. मोठी लाकडे वडील फोडीत असत. खोडावर ज्या ठिकणी फांदी उगवलेली असे, तो भाग फोडण्यास खूप कठीण जाई. हे काम वडील करीत. बाकीची लाकडे आम्ही फोडत असू. त्याला गाठ म्हणत. गाठ फोडणे ताकदीचे व कौशल्याचे काम मानले जायचे.  या गाठी वडील फोडत. लाकूड तोडण्याचे/फोडण्याचे एक तंत्र असे. उभा घाव घालायचा नाही. तिरपे घाव घालायचे. लाकडावर इंग्रजी व्ही अक्षरासारखी खाच तयार झाली पाहिजे. म्हणजे लाकडाच्या फांदीचे दोन तुकडे सहज करता येतात. घरातील चूल पेटवतांना एक/दोन मोठी लाकडे व बाकी झिलप्या अशा रचायच्या की हवा खेळू शकली पाहिजे. आगपेटीची एकच काडी ओढायची. दुसरी लागायला नको. अनेकदा रात्री थोडासा तरी प्रकाश मिळावा म्हणून चिमणी पेटती ठेवलेली असे. तिच्या ज्योतीत धरून एक लहान काडी पेटवायची व तिचा उपयोग करून चूल पेटवायची. काही लोकांना हेही परवडत नसे. ते सकाळी विस्तव मागायला येत. रात्री चूल विझवतांना आई काही निखारे चुलीतच राखेखाली झाकून ठेवायची. सकाळी फुंकणीने राख उडवताच निखारे पुन्हा धगधगायचे. बाभळीची लाकडे जळतांना इतर लाकडांच्या तुलनेत फारसा धूर देत नसत. ती हळूहळू जळत. त्यांचे निखारेही बराच काळ जळत/टिकत. म्हणून स्वयंपाकासाठी बाभळीची लाकडेच वापरली जात.
बाभळीचा डिंक डिंकाचे लाडू करायला वापरला जायचा. डिंक तुपात तळला की त्याची लाही व्हायची. ही वापरून बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू तयार करीत. बाभळीवर चढतांना काटे टोचायचे. आम्ही दररोज खोडावरचे काटे काढून ते साफ करीत असू. अशा 'तयार' झाडावर चढतांना काटे टोचत नसत. झाडाला इजा झाली त्या जागी आतून जो द्रव पदार्थ स्रवतो, तो वाळला की डिंकाचा खडा तयार व्हायचा. तो काढला की पुन्हा त्याच ठिकणी दोनतीन दिवसात नव्याने स्रवलेला डिंक वाळून नवीन खडा तयार होत असे. म्हणून आम्ही चाकूने झाडाची साल काढून आतील भागी खाच तयार करीत असू. दोन दिवसांनी तिथे डिंकाचा खडा तयार झालेला असायचा. तो अलगद काढून खिशात टाकायचा. कधी कधी ही जागा हेरून कुणीतरी डिंक अगोदरच काढून नेलेला असे. यावर झाडावर खास जागेत आम्ही खाच करीत असू. ती जागा दुसऱ्याकुणाला दिसत व कळत नसे. पण कधीतरी या जागेचा पत्ता लागायचा व दुसराच कुणीतरी डिंक काढून न्यायचा. पण इतरांच्या खास जागा आम्ही शोधून काढीत असू. अशा प्रकारे फिटंफाट व्हायची.
  बाभळीच्या वाळलेल्या शेंगांची भिंगरी तयार कर णे हा आमचा एक आवडता उद्योग असायचा. भिंगरी तयार करायला निदान तीन पेरांची शेंग लागे. कुणाची भिंगरी किती मोठी अशा शर्यती होत. मी पंधरा पेरांच्या शेंगेची भिंगरी करून शर्यत जिंकली होती. यात दोन अडचणी असत. एक म्हणजे एवढी मोठी शेंग मिळायला हवी आणि दुसरे असे की ती सरळ असायला हवी.
  बाभळीच्या शेंगातील दाणे जनावरांनाही पचत नसत. हे दाणे त्यांच्या शेणात सापडायचे. अशा दाण्यातूनच बाभळीचे नवीन झाड उगवते अशी आमची समजूत होती. वस्तुस्थिती काय आहे, हे अजूनही माहीत नाही. त्यावेळची एक गोष्ट ऐकलेली आठवते. एकदा खूप दुष्काळ पडला होता. अन्नधान्य मिळेनासे झाले. गरीब लोक हे शेणातले दाणे गोळा करायचे. यांना दामोटे असे म्हणत. हे दाणे वाळवायचे. नंतर भाजायचे. भाजले की वरचे टरफल सोलून काढता येते. आतील बीला दोन डाळिंब्या असतात. ही डाळ दळून त्या पिठाच्या भाकरी करून लोक खात व दुष्काळ संपेपर्यंत दिवस काढीत असत, असे ऐकले होते.
बाभळीच्या काडीने आम्ही दात घासीत असू. कडुलिंबाची काडीही वापरीत असू. काडीचा समोरचा भाग चावून चावून त्याचा ‘टूथब्रश’ करीत असू. हे शक्य न झाल्यास राखुंडीने (चुलीतल्या राखेने) दात घासीत असू. तेव्हा ‘बिटको कंपनीची काळी टूथ पावडर’ बाजारात आली होती. तसेच खडूची(?) पांढरी टूथ पावडरही बाजारात आली होती. कापूर, थंडाई व अस्मानतारा एकत्र केले एक द्रव तयार होतो व तो कोळशाच्या भुकटीत मिसळून बिटको कंपनी टूथ पावडर तयार करते, अशी आमची समजूत होती. पावडर खरखरीत व्हावी यासाठी धानाची तुसे भाजून तयार केलेली कोळशाची भुकटी बिटको कंपनी वापरते, अशीही आमची समजूत होती. हे काहीही साधले नाही तर आम्ही मीठ वापरीत असू.
त्याकाळी बाभळीची झाडे रस्त्याच्या कडेला  लावलेली असत. ही प्रथा इंग्रज येण्या अगोदरपासून अस्तित्वात होती, असे ऐकले आहे. अशी ही बाभूळ आमच्या त्या काळच्या जीवनाशी निगडीत झाली होती. 


लहानपण देगा देवा 

  • वसंत गणेश काणे 

१. सारसा परीला

लहानपणची एक आठवण का कुणास ठाऊक एकदम जागी झाली. त्यावेळी मासिकात/ वर्तमानपत्रात ‘सारसा परीला’ या औषधाची जाहिरात येत असे. वाचतांना अनेक जण (विशेषत: मुले) ती जाहिरात चुकीची वाचीत. ‘सारसा परीला’ असे न वाचता ‘सासरा पळाला’ असे वाचीत. ती जाहिरात वामन गोपाळ यांची होती. संपूर्ण जाहिरात “ डाॅ वामन गोपाळ यांचा सारसा परीला”, अशी होती. ती “वामन गोपाळ यांचा सासरा पळाला”, अशी अनेक मुले वाचायची. खरं सांगायचं तर मुलंच कशाला मोठी माणसं सुद्धा ही चूक करायचे. 

  कुणीही नवीन असला की आम्ही त्याला ही जाहिरात वाचायला सांगायचो. त्याने ती ‘सासरा पळाला’, अशी वाचली की आम्ही खो खो करीत हसायचो. काही जण ती बरोबर वाचीत. असे झाले की आमचीच विकेट पडत असे.


      आम्ही कोण? 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

  आम्ही मूळचे तसे कोकणातले. पण कोकणातले आमचे गाव कोणते होते, ते आम्हाला माहीत नाही. कुणी सांगत, तुम्हीना ताम्हनमळ्याचे. कुणी म्हणत तळे घोसाळ्याचे. एक दिवस केसपुरीचे दत्तात्रय काशीनाथ काणे शोध घेत माझ्या घरी आले. त्यांनी सांगितले की, तुम्ही केसपुरीचे. तिथे लक्ष्मीकेशवाचे मंदीर आहे. त्याचे जोसपण काण्यांकडे आहे. पेशव्यांनी दिलेल्या सनदा आहेत. मंदीर आता जुने झाले आहे. मिठीत मावणार नाहीत एवढा घेर असलेले खांब आता आतून पार पोखरले गेले आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार समोर ठेवून ते भेटीला आले होते.

   त्यांनी आम्हा काण्यांचा सांगितला तो मूळ इतिहास काहीसा असा आहे. आम्ही मूळचे जोशी. जोशी म्हणजे पुजारी. आमच्याकडे जोसपण परंपरागत होते. पण मग जोशांचे काणे कसेकाय झालो? त्याबाबतचा त्यांनी सांगितलेला इतिहास काहीसा असा आहे. जोशांपैकी काहीनी शेती केली. म्हणून ते खोत म्हणून ओळखले जाऊ लागले. काहींनी कुळकर्णीपण (हिशोबनीस) स्वीकारले. ते कुळकर्णी झाले. एक जोशी काणा होता. त्याला लोक काणा जोशी म्हणू लागले. पुढे काण्या जोशातले जोशी गळून काणे शिल्लक राहिले. असे आहोत आम्ही काणे. काही जोशी मात्र जोशीच राहिले. एकूण काय जोशांमधले काही खोत झाले, काही कुळकर्णी झाले, काही काणे झाले तर काही जोशांचे जोशीच राहिले. हे सगळे शांडिल्यगोत्री आहेत. मला सांगितलेला व लक्षात राहिलेला इतिहास काहीसा असा आहे.

   संघटनेच्या कामाच्या निमित्ताने कोकणात प्रवास करण्याचा योग आला. मातला देवीचे प्रस्थ आमच्या घराण्यात बरेच होते. (प्रस्थ हा शब्दप्रयोग चूक की बरोबर ते सांगता येत नाही.) तिचे मंदीर कोकणात कुठेतरी आहे, असे ऐकून होतो. कुणीतरी कल्याण जवळ असे मंदीर आहे, असे म्हणाले. पण ते ‘ते’ नाही, असेही कळले. मंदिराचा शोध लागला नाही. 

  कुणीतरी सांगितले की ही देवी नव्हतीच म्हणून. आमच्या मूळ पुरुषाचा जन्म झाला आणि त्याची आई तो जन्मताच वारली. या अनाथ बाळाला आपले स्तन्य पाजून एका देवीसमान कुणबिणीने वाढवले. तिचे नाव होते, मातला. या बाळाने मोठा झाल्यानंतर आपल्या या दुसऱ्या मातेला देवीचा दर्जा दिला. ही देवीसारखीच म्हटली पाहिजे. पण तशी ती लौकिकदृष्ट्या देवी नव्हती. म्हणून तिचे मंदीर असण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही शोध घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला ते कधीच सापडणार नाही. ही कथा खरी की खोटी ते माहीत नाही. खरीखोटी कशी का असेना या ‘देवीच्या’ कृपाप्रसादाने ‘त्या’ मूळ पुरुषाची वंशवेल पुढे फुलली, बहरली. तिच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहुदा या पुरुषाच्या वंशजांच्या घरी या समाजाची सवाष्ण असते. असे म्हणतात. तिचा मान फार मोठा असतो. लहानमोठे तिला वाकून नमस्कार करतात. तिने भोजन केल्याशिवाय घरातले कुणीही अन्न ग्रहण करीत नाही.

  रूट्स (Roots) हा ग्रंथवजा वृतांत वाचला. त्यातील नायकाने आपला मूळ पुरुष अचूक शोधून काढला. पण तशा प्रकारच्या नोंदी ठेवण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती म्हणून म्हणा किंवा ठेवलेल्या नोंदी समजत नाहीत, म्हणून म्हणा, आपल्याकडे या बाबतीत अनंत अडचणी आहेत. पण आपण का व कुणामुळे आहोत, हे जरी कळले तरी खूप झाले की. पण तेही खरे की खोटे? पण त्या भानगडीत पडाच कशाला? आम्ही कोण? एका मानवाचेच वंशज हे तर नक्कीच आहेना. तेवढे पुरेसे नाही का? 


लहानपण देगा देवा - सार्वजनिक झोका

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (९४२२८०४४३०    

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   माझा जन्म अंजनगावचा. जन्माची वेळ रात्री साडे आठची. हे कशावरून. तर सी पी रेल्वेची नॅरो गेज पॅसिंजर गाडी (नंतर लोक  तिला शकुंतला गाडी म्हणू लागले), रात्री साडे आठला स्टेशनवर यायची. स्टेशनवर जायचा रस्ता आमच्या घरावरून जायचा. त्या रस्त्यावर उतारूंची ये जा सुरू झाली होती. म्हणजे रात्रीचे साडे आठ झाले असले पाहिजेत. आस्मादिकांची गाडीही मातेच्या उदरातून त्याचवेळी भूतलावर अवतरली होती. गाडी स्टेशनवर आल्याची शिट्टी झाली आणि त्याचवेळी आस्मादिकांनीही भूतलावर अवतरल्याची ग्वाही पहिला टाहो फोडून दिली. म्हणून आस्मादिकांचा जन्म रात्री साडे आठचा.

  आमच्या प्लॅाटचे क्षेत्रफळ 100x100 फूट असे चांगले ऐसपैस होते. (अजूच्या घराचा प्लॅाट याहूनही मोठा आहे, बरंका!) त्याला काटेरी तारेचे कंपाऊंड होते. दोन खांबामधली जागा मेंदीची झाडे लावून झाकली होती. अंगणात कडुलिंबाची एकूण पाच भली मोठी झाडे होती. एक झाड तर एवढे मोठे होते की त्यामुळे उरलेली चार झाडे उंच वाढू शकत नव्हती. ती आडवी पसरली होती. त्यापैकी एका झाडाची एक फांदी आडवी वाढली होती. जमिनीला अगदी समांतर! तिने कंपाउंड ओलांडून बाहेर आपला विस्तार नेला होता. ही फांदी जमिनीपासून 20 फूट उंचीवर आडवी व जमिनीला समांतर अशी गेली होती.

   माझे वडील तसे कल्पक होते. मुले घरात सारखा दंगा करतात, अशी आईची तक्रार असायचा. त्यातले मनू व बंडू हे अतिशय सज्जन होते. दंगा करू नका, म्हटले की, गप्प बसायचे. पण मी तसा नव्हतो. गप्प बैस, म्हटले की, याला आणखीनच चेव येतो, अशी आईची रास्त तक्रार होती. मुलांना काहीतरी ‘उद्योग’दिला पाहिजे, असा विचार करून वडलांनी बाजारातून काथ्याचा दोरखंड आणवला. आडव्या गेलेल्या फांदीला तो दोर बांधून त्यांनी झोका तयार करवून घेतला. पाय ठेवायला लाकडाची पट्टी लावली आणि जो कोणी दंगा करील त्याने झोक्यावर 25 उठाबशा काढायच्या, अशी शिक्षा फर्मावली. पण झाले भलतेच. आमच्यासाठी ते खेळणेच होऊन बसले. येताजाता आम्ही त्यावर झोके घेऊ लागलो. अगोदर नंबर कुणाचा, यावरून आमच्यात भांडणे होऊ लागली. मी सगळ्यात लहान म्हणून माझा नंबर पहिला, हे मी मनू व बंडू कडून कबूल करवून घेतले. पण उषाने मध्येच फांदी मारली. कारण ती सर्वात लहान होती. पण तिला झोका घेता येत नसे. तिला फळीवर बसवून आम्ही झोके द्यायचे, अशी तडजोड झाली. मनू व बंडू मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी झोके देण्याची जबाबदारी घ्यावी. माझे काही चुकले आणि ती झोक्यावरून खाली पडली तर तिला लागायची भीती होतीना. माझा हा प्रस्ताव मान्य झाला. 

   तेव्हापासून अनेक वर्षे आम्ही त्या झोक्यावर मनमुराद झोके घेत असू. कोणाचा झोका उंच जातो, अगदी जमिनीला समांतर जातो, अशा आमच्या शर्यती लागायच्या. झाडाची फांदी व झोक्याची दोरी कंपाऊंडच्या बाहेर गेली होती. ती वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला लागू नये म्हणून झोक्याची फळी झोके घेऊन झाल्यावर कंपाऊंडच्या खांबाला आम्ही अडकवून ठेवीत असू.

   हळूहळू आमचा हा झोका गावभर आवडता झाला. जोतो येताजाता मनसोक्त झोके घ्यायचा व नंतर तो कंपाऊंडच्या खांबला अडकवून ठेवायचा. यात रेल्वे स्टेशनवर जाणारे येणारे उतारू, हमाल हेही झोके घेण्याचा आनंद लुटायचे. 

  दिवसातला पहिला झोका घेण्याचा मान गावातल्या  एका पखालजीचा असायचा. एका काठीच्या दोन्ही टोकांना रॅाकलचे रिकामे झालेले चौकानी पिपे भरून तो पाण्याची नेआण करीत असे. त्याचा मार्ग घरावरून जायचा. भल्या पहाटे तो घरापाशी यायचा. पाण्याने भरलेले डबे खाली ठेवायचा आणि मनसोक्त झोके घ्यायचा. झोके घेतांना दोराचा कऽरकऽर असा आवाज यायचा. तो आईला बरोबर ऐकू यायचा. तिच्यासाठी तो ’अलार्म’च होऊन बसला होता. झोक्याच्या आवाजाने ती जागी व्हायची. पखालजी आला, म्हणजे आता उठले पाहिजे, असे म्हणत ती कामाला लागायची. झोके घेऊन झाले की, पखालजी झोका खांबाला नीट अडकवायचा आणि आपले ओझे पुन्हा खांद्यावर घेऊन मार्गस्थ व्हायचा.



  लहानपणं देगा देवा

घासाघीस

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   माझ्या लहानपणी, डोक्यावर टोपलं घेऊन एक महिला येत असे. ‘कपबशा, बरणी, भांऽऽऽडी’, अशी हाळी देत ती घरात शिरायची. ‘घे वं माऽऽय’, असं म्हणून ती डोक्यावरचं टोपलं खाली ठेवायची. माझी आई बाहेर यायची आणि म्हणायची, ’आलीसंच का तू पुन्हा! मागच्या वेळेलाच तुला येऊ नकोस, म्हणून सांगितलं होतं ना. फसवलंस तू मला त्यावेळेला. कपडे घेतलेस भाराभर आणि दिलस काय, तर फक्त दोन पातेली! तेव्हाच सांगितलं होतं तुला की पुन्हा येऊ नकोस म्हणून’.

माझ्यासाठी हा संवाद नवीन नसे. शब्दात थोडाफार फरक असायचा आणि मग त्या दोघीत जी घासाघीस सुरू व्हायची, ती मला खूप आवडत असे. मी कोपऱ्यात बसून ती घासाघीस ऐकत असे. 

आईनं एक कपडा पुढे ठेवला की, ती एक छोटीशी पातेली पुढे ठेवायची.

आई म्हणायची, ‘एवढी छोटी पातेली नको मला. मोठी असेल तर दाखव’. 

‘दाखवते माऽऽय, पन जरा जरीचं लुगडं लावशील की नाय?’, असं म्हणत ती मोठी पातेली समोर ठेवायची. आई जरीचं जुनं जुनेर समोर करायची आणि म्हणायची, ‘पण मग मला वरती झाकायला झाकणी आणि ढवळायला डाव पाहिजे’.

ती डाव समोर करायची अन म्हणायची ‘सायबाचा जुना कोट लाव, म्हंजे ताटली बी लावतो’. 

आई कोट पुढे ठेवायची अन म्हणायची, ‘पण मग सोबत झारा सुद्धा दिला पायजे’.

ती कशालाही नाही म्हणायची नाही. झारा समोर ठेवायची अन माझ्याकडे पहात म्हणायची,’लेकराचा कुडता दे की जोडीला’.

असा तो संवाद चालायचा अन मग ती उठतांना म्हणायची, ‘माऽऽय, साफ बुडली म्या आज. मुदलबी सुटायचं नाय!’

आई म्हणायची, ‘मीच फसले. तू असं कर बरं. पुन्हा येऊच नकोस मुळी. दरवेळी लुटतेस मला’.

लांब जाताना तिच्याकडे पहात मी आईला म्हणत असे, ‘आई, ती पुढच्या वेळी आलीच नाही तर गं?’

अरे, तिला कोण आहे, माझ्याशिवाय?, बघशीलच तू.’

‘आणि तुला गं?’ माझा प्रश्न.

पातेली, ताटली, डाव, झारा असं सर्व साहित्य गोळा करत आई घरात जायची. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचं. मला वाटायचं. धावत जावं, त्या भांडेवालीच्या चेहऱ्यावरही असंच हास्य आहे का ते पहायला. पण ती खूपच दूर गेलेली असायची.



लहानपण देगा देवा

आमच्या घरची तलवार आणि जंबिया

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

  एखाद दिवशी मध्येच केव्हातरी रात्री झोप उघडल्यावर का कुणास ठावूक लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. असे का होत असावे, ते कळत नाही. आज अचानक आमच्या घरच्या खऱ्याखुऱ्या तलवारीची आठवण झाली. ही तलवार आमच्या घरी कशी आली ते माहीत नाही. आम्हा मुलांना तिच्याबद्दल कुतुहल असे. पण आईने तलवारीबद्दल कुठेही बोलायचे नाही, असे बजावून सांगितले होते. याचा आमच्यावर इतका परिणाम झाला होता की, आम्ही भावंडे आपापसात सुद्धा तिच्याबद्दल कुजबुजच बोलत असू. आमचे अंजनगाव -सुर्जी हे गाव तसे शांत असायचे. पण एक दिवस अफवा पसरली की, गावात कुणी क्रांतिकारक आला आहे. त्याच्याजवळ शस्त्रे आहेत आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस घरोघर जाऊन झडती घेणार आहेत. आता आपल्या घरच्या तलवारीचे काय करायचे? दादा (माझे वडील) म्हणाले, आपण ती घराच्या (तुळईवर) एखाद्या आडव्या खांबावर ठेवून देऊ. तिथे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण नंतर कोणी तरी म्हणाले की, पोलिस अशाच तर जागी शोध घेत असतात. आई म्हणाली, माझ्या मनात एक विचार आला आहे. आता ती तलवार कुणाला हवी आहे का? ती अर्थातच कुणालाच नको होती. ती अगोदरच्या पिढ्यांपैकी कोणीतरी आणून ठेवली होती, एवढेच आम्हाला  माहीत होते. पण त्या तलवारीशी आमचे भावनिक नातेही जुळले होते. त्यामुळे ती टाकायची तरी कशी ? तसेच कशी टाकायची? असा विचार होता. आई म्हणाली तलवार घरीच राहील पण वेगळ्या रूपात. तुम्हाला चालेल का? नाही म्हणणे शक्यच नव्हते. आईने लोहाराला निरोप पाठवला. त्याला त्या तलवाराची विळी तयार करून देतोस का? म्हणून विचारले. तो म्हणाला की, विळी करता येईल पण ती खूपच मोठी होईल. शेवटी तिच्या चार विळ्या करायचे ठरले. पण लोहीरालाही भीती वाटत होती. तो म्हणाला, ‘मला भीती वाटते. पोलिसांनी मला पकडले तर काय करू?’ शेवटी रात्री भट्टी लावायची आणि विळ्या तयार करायच्या, असे ठरले. पण लोहार घाबरतच होता. शेवटी आईने त्याला दोन आणे (आजचे बारा पैसे) मजुरी जास्त देईन म्हणून कसेबसे तयार केले. अशाप्रकारे विळ्या तयार झाल्या. ‘पण तुमच्या घरी चार विळ्या कशा? असे झडती घ्यायला आलेल्या पोलिसाने विचारले तर काय करायचे?’, मी शंका विचारली. आई म्हणाली, ‘काळजी करू नका. दोन माझ्यासाठी आणि एकेक माझ्या दोन जावांसाठी. अशा एकदम चार घेतल्यामुळे स्वस्तात मिळाल्या असे सांगेन मी’.  पुढे झडतीची अफवाच होती, हे कळले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. आईने एक विळी स्वत:साठी ठेवून तीन विळ्या आपल्या मैत्रिणींना दिल्या. पुढे आम्ही नागपूरला आलो. आमच्या मेयो हॅास्पिटलच्या बंगल्यात गावातले सामान हलवले तेव्हा ती विळी बरोबर आली होती. पण ती आता मधोमध झिजली होती. तिच्यावर ऊस तोडतांना ती एक दिवस काडकन तुटली आणि शेवटी भंगारात गेली. 

    आमच्या घरी जंबियाही होता. तो मात्र दादांनी संरक्षणासाठी घेतला होता. त्याचे काम कधीच पडले नाही. जंबियाला पाते झाकण्यासाठी कसलेतरी म्यान होते. कधीमधी तो बाहेर काढला जायचा. मी तो हातात घेऊन पहात बसायचो. पुढे माझी मोठी बहीण सुमाताई डॅाक्टर झाली. बापूराव (माझे मोठे बंधू)  आणि सुमाताई दोघेही नागपूरच्या रॅाबर्टसन मेडिकल स्कूलमध्ये शिकून डॅाक्टर झाले होते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमाताईला मुर्तिजापूरला लक्ष्मी हॅास्पिटलमध्ये पोस्टिंग मिळाले. एकटे रहायचे म्हणून काळजी होती. सुमाताईला रहायला क्वार्टर होता. तिची बाल मैत्रीण सुशी तिच्या बरोबर सोबतीला म्हणून मुर्तिजापूरला जाणार होती. सुमाताई मुर्तिजापूरला जायला निघाली तेव्हा दादांनी तिला जातांना तो जंबिया दिला होता. व्हिझिटवर एकटीला रात्री बेरात्री जावे लागू शकते, अशावेळी हा जंबिया बरोबर ठेवीत जा, असे बजावून सांगितले होते. तिचा निरोप घेतानाचा तो प्रसंग मला आजही आठवतो. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलेले मी पाहिले होते. पुढे दोन वर्षांनी सुमाताईचे शेगावला पोस्टिंग झाले.  तिचे शेगावलाच टायफॅाईडने निधन झाले. एक दिवस ती अडलेल्या बाईची सुटका करून घरी आली. घरी आल्याआल्या लगेचच तिला ताप भरला. तो टॅायफॅाईड निघाला. त्यातच ती गेली.  तिचे सामान घरी आणले, पण त्यात तो जंबिया नव्हता.


लहानपणं देगा देवा.२०. ०१. २०२२ 

 आमची वस्त्रप्रावरणे आणि अभ्यंगस्नाने 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   आमच्या लहानपणी मी आणि बंडू हे दोघे सख्खे भाऊ आणि मनू आणि उषा (मनोहर आणि उषा केळकर) मावस भाऊ बहीण असे एकत्र वाढलो. माझ्या आणि बंडूच्या नावाची खरंतर अदलाबदल व्हायला हवी होती. कारण बंडू सरळ स्वभावाचा, सज्जन, शांत, अभ्यासू, कामसू, आज्ञाधारक असा होता. तर मी याच्या अगदी उलट होतो. पण मी वसंताच राहिलो  आणि तो मात्र नारायणाचा बंडू झाला. हे कोडे मला कधीही उलगडले नाही. पण आमच्या आईबापांना आमचे पाय पाळण्यात नेमके कसे आहेत हे न दिसल्यामुळे ही नावांची अदलाबदल झाली असेल तर त्यांना तरी दोष कसा देता येईल? . गोरेपणात माझी अन्य भावंडे उजळ होती. माझ्यात गोरेपणाचा किंचित (?) अभाव होता. पण तरीही ह्याला सोनूताईने (माझ्या आईने) कुणातरी बाईला पायलीभर ज्वारी देऊन घेतलेला दिसतो, असे म्हणून, समजून आणि मानून मला लहानपणी गोंड्या म्हणत असत. 

  दसऱ्याच्या अगोदर आम्हाला नवीन कपडे शिवले जायचे. प्रत्येकी दोन हाफ शर्ट आणि दोन हाफ पॅंट (चड्ड्या) शिवले जायचे. केव्हातरी आम्हा तिघांना वडील कापडाच्या दुकानात घेऊन जात. कुणाला कोणत्या रंगाचे कापड ‘शोभून’  दिसेल, याचा निर्णय बहुदा तो कापड दुकानदारच करायचा. वडलांचा आग्रह एकच असे. कापड स्वदेशी हवे. जपानी कापड चांगले दोन आणे स्वस्त असे. पण आम्ही ते कधीही घेतले नाही. आमच्यासारखी विक्षिप्त मंडळी दुकानदाराला माहीत झाली होती. त्यामुळे त्यानेही कधी विदेशी कापड घेण्याचा आग्रह धरला नाही. कापड घेऊन झाले की  तिथून आम्ही तडक शिंप्याकडे जात असू. तो मापे घ्यायचा. आठ दिवसांनी या म्हणायचा. इतके दिवस कशाला लागतात म्हणून विचारले तर म्हणायचा, हे कापड तुम्ही धुवून आणलेलं नाही. ते मला अगोदर धुवावे लागेल. धुतल्यानंतर ते आटेल. मग कापून शिवीन. तसेच कापड न धुता शिवले तर  कपडे लांडे होतील. सॅनफोराईज्ड कापड हा प्रकार आम्ही नागपूरला आल्यानंतरच मला कळला. सुरवातीला कापड सॅनफोराज्ड आहे किंवा कसे ते विचारून किती घ्यायचे ते विचारून किती घ्यायचे ते ठरवीत असू. सॅन फोराइज्ड कापड धुतल्यानंतर आटत नसे. आता सगळीच कापडं सॅनफोराइज्ड असतात. त्यामुळे शिंप्यांचा किंवा घरच्या मंडळींचा कोरे कापड अगोदर पाण्यातून काढून वाळवण्याचा खटाटोप वाचला आहे.

  त्याकाळी सुताच्या गुंड्या लावल्या जायच्या. सुरवातीला त्या काज्यात बसत नसत. पुढे वारंवार धुतल्या गेल्यामुळे आक्रसून किंवा झिजून काज्यात टिकत नसत. गुंड्या पुन्हापुन्हा लावायची वेळ सारखी यायची. कारण थोड्याच वेळात त्या काज्यातून पुन्हा बाहेर यायच्या. चड्डीच्या बाबतीत लक्ष राहिलं नाही की फजितीची वेळ यायची. पण पुढे लगेच नवीन वर्षाचा दसरा यायचा. एक वर्ष पूर्ण झालेलं असायचं. एक चक्र पूर्ण होते ना होते तोच आम्ही पुन्हा कापडाच्या दुकानाच्या पायऱ्या चढायचो. ही अशाप्रकारे नवीन चक्राची सुरवात व्हायची. यावेळी आत्ताच्या गुंड्या नुकत्या कुठे व्यवहारात यायला लागल्या होत्या. ‘तू त्या का लावीत नाहीस?’, असे आम्ही काहीसे रागावून शिंप्याला विचारले. यावर तो म्हणाला की, जुना स्टॅाक संपायचा आहे आणि आमच्या घरीच सुताच्या गुंड्या तयार होतात, त्यांचे काय करायचे?’. पुढे काय झाले ते सांगत नाही. पण त्यानंतर निदान आमच्या कपड्यांना आजच्या गुंड्या लावल्या जाऊ लागल्या. पण त्या तुटायच्या.

   कपडे धुणे हा एक कार्यक्रम असायचा. शाईचे डाग कपड्यावर पडले की ते निघता निघत नसत. कपाळावरून ओघळलेल्या तेलामुळे चेहरा तेलकट दिसत असे. आणि मानेवरून ओघळलेल्या तेलामुळे सदऱ्याची कॅालर आणि पाठ तेलकट होऊन धूळ बसून काळे डाग पडत. ते साबणानेही लवकर निघत नसत. त्यासाठी वॅाशिंग सोडा वापरला जायचा. स्वदेशी आणि विदेशी असे साबणांचे दोन प्रकार असायचे. अंगाला लावायचा हमाम आणि कपड्यांसाठी वापरायचा तो 501 साबण हे स्वदेशी होते. तर (बहुदा) लक्स हा विदेशी साबण अंगाला लावण्यासाठी आणि सनलाईट हा विदेशी साबण साबण कपड्यांसाठी वापरला जायचा. महाग असून सुद्धा आमच्या घरी स्वदेशी साबण वापरला जाई. वारंवार  घासल्यामुळे कापड झिजायचे, विरायचे शेवटी फाटायचे सुद्धा, पण अनेकदा डाग मात्र निघायचे नाहीत. 

  त्या काळी आमच्यासाठी सणासुदीला घालण्यासाठी जरीच्या टोप्या घेतल्या जायच्या. तिची जर काढण्याचा मला छंद होता. ‘पुढच्या वेळेला तुला जरीची टोपी घेतेका बघ ’, असे आईचे धपाटा घालतांना म्हटलेले वाक्य दरवेळी ऐकल्यामुळे लक्षात राहिले आहे. धपाटा घालतांना आईच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायचा. तो मला सवयीने आवडू लागला होता. रोजच्या वापरासाठी पुठ्ठा घातलेल्या काळ्या टोप्या असत. त्यातल्या  पुठ्ठ्याचा ताठरपणा आम्ही खपवून घेत नसू. त्यामुळे तो पुठ्ठा शरणागती पत्करून  लवकरच लुळा पडायचा. डोक्यवरचा घाम आणि पचापचा लावलेले तेल यामुळे टोपीचा डोक्याला स्पर्श करणाऱ्या वर्तुळाकृती भागावर एक तेलकट आणि धूळ खाल्लेली काळपट पट्टी तयार व्हायची. टोपी न घालता बाहेर गेल्यास, ‘कारे, तुमच्या घरचं कोणी गेलं वाटतं?’, असे हटकले जायचे. त्याकाळी चपला घेतल्या जायच्या पण चपला घातल्यानंतरच्या कोणत्याही संस्मरणीय  आठवणी नाहीत. चपलेनी किंवा बुटांनी चावल्याच्या आठवणीही नाहीत. त्या पुढे अंजनगावहून नागपूरला आल्यानंतरच्या आहेत.

  दिवाळीत मात्र उटणं लावून आंघोळी व्हायच्या. पण आमच्या वेळी आमच्यापैकी कोणतेही बालरत्न, ‘उठा, उठा; दिवाळी आली, कार्तिक स्नानाची वेळ झाली’, असे सभ्य, सुसंस्कृत आणि सुमधुर आवाज ऐकून उठल्याचे स्मरत नाही. ज्या आठवणी आहेत, त्या सांगण्यासारख्या नाहीत.