Saturday, April 30, 2016

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन  आयोगाच्या शिफारसी
१. ५० महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट होऊन ६३ टक्के महागाई भत्ता राहील. अंमल १.१.२०१६ पासून
२. किमान वेतन - २१,०००
३. ग्रेड पे बंद व शेवट नसलेली वेतन श्रेणी ( ओपन एंडेड वेतन श्रेणी)
४. सेवानिवृत्ती ३३ वर्ष सेवा किंवा ६० वर्षे वय यापैकी जे अगोदर असेल ते
५. धरभाडे भत्ता ३० टक्के; सीसीए मध्ये वाढ होणार.
६. पदांचे वर्गीकरण बदलणार
७. अंमलबजावणी १.१.२०१६ पासून
८. मूळ वेतन x २.८६ ही आकडेमोड मान्य
९. वार्षिक वेतनवाढीचे पाच प्रकार
     अ) मूळ वेतन दरवर्षी तेच राहणार असेल(फिक्स्ड) तर २१००
     ब) क्लास १ - १५००
    क) क्लास २ - १२००
    ड) क्लास ३-  i)गट ‘अ’ साठी १००० ii) गट ‘ब’ साठी ८०० iii)गट ‘क’ साठी ६००
    इ) चतुर्थश्रेणीधारकांसाठी ४००
( वेतनवाढीची तारीख १ जुलै ऐवजी १ जानेवारी )
१०. सध्याच्या एमएसीपी ऐवजी १०,१८,२५ व ३० वर्षांच्या सलग सेवेनंतर ४ अप ग्रेडेशन ( The present MACPs scheme should be replaced by giving 4 up gradation after completion of 10,18,25,30 years of continues service.)
११.घरबांधणी अग्रीम नवीन मूळ वेतनाच्या ५० पट
१२. वाहतुक भत्ता
      X गटातील शहरे - नवीन मूळ वेतन + महागाई भत्त्याच्या १० टक्के
      Y  गटातील शहरे - नवीन मूळ वेतन + महागाई भत्त्याच्या ५ टक्के

New pay scale .
Old PB-1,GP-1800 New pay scale are 15000-33600, Old PB-1, GP-1900&2000 New pay scale are 21500-40100, Old PB-1, GP-2400 & 2800 New pay scale are 25000-43600.
Old PB-2, GP-4200 New pay scale are 30000-54800, Old PB-2, GP-4600 & 4800 New pay scale are 40000 - 71000, Old PB-2, GP-5400 New pay scale are 45000-90000,
Old PB-3. GP-6600 New pay scale are 52000 -100000. Old GP-7600 New pay scale are 60000 -110000. Old GP-9000 New pay scale are 75000 -125000.

Wednesday, April 27, 2016

             पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम एकाच शिक्षण मंडळाच्या आधिपत्त्याखाली
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   शिक्षणाचे बाबतीत आपण काहीतरी करीत आहोत, हे दाखवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक अशी की खरोखरच काहीतरी नवीन, रचनात्मक व युगानुकूल असे बदल घडवून आणणे किंवा जुन्याच पद्धतीला नवीन आवरण घालून किंवा नवीन व्याख्या तयार करून, हे बघा आम्ही काहीतरी केले, असा आभास निर्माण करणे. भारतीय शिक्षणकारणात याची दोन उदाहरणे दोन पातळीवर आढळून येतात.
   एनसीईआरटीने शिक्षणाला एक रूप व दिशा देण्याचा प्रयत्न केला
     एक आहे केंद्र पातळी. याचे उदाहरण किंवा प्रतिनिधित्त्व म्हणून एन सी ई आर टी कडे (नॅशनल काऊन्सिल आॅफ एज्युकेशनल रीसर्च ॲंड ट्रेनिंग - राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण संस्थेकडे) बोट दाखविता येईल. या संस्थेत प्रामुख्याने शिक्षणतज्ज्ञ आहेत. साम्यवादी आणि राष्ट्रीय अशा दोन प्रमुख विचारधारा आपल्या देशात असून त्यांचे प्रतिबिंब या संस्थेतही पडावे/असावे, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुतेक काळ या देशावर काॅंग्रेस पक्षाचे शासन असल्याुळे आणि शिक्षणक्षेत्रावर काॅग्रेसमधील व बाहेरीलही साम्यवादी घटकांचा पगडा असल्यामुळे त्या विचारसरणीच्या लोकांचे प्रभुत्त्व या क्षेत्रावर होते व आजही आहे, हेही वास्तवाला तसेच तर्काला धरूनच आहे, हेही मान्य केले पाहिजे. आम्ही सत्तेचे राजकारण करतो, तसे आम्हास तुम्ही करू द्या मोबदल्यात शिक्षणक्षेत्र तुमच्यासाठी सोडतो, अशी व्यावहारिक तडजोड काॅंग्रेस आणि साम्यवाद्यांमध्ये झाली असल्याची जी शंका व्यक्त केली जाते, ती बिनबुडाची नाही. आज राजकीय पातळीवर बदल झाल्यामुळे साम्यवाद्यांच्या मक्तेदारीला तडे जाऊ लागले आहेत. पुणे, दिल्ली व हैद्राबाद येथील शिक्षणक्षेत्रातील खदखदीचे मूळ मुख्यत: या साम्यवाद्यांच्या एकाधिकारशाहीला बसलेल्या हादऱ्यांमध्येही आहे, हे हळूहळू दिसायला व प्रत्ययाला येऊ लागेल.
      हे काहीही असले तरी एनसीईआरटीने शिक्षणाला एक रूप व दिशा देण्याचा प्रयत्न केला, हे मान्य करावयास हवे. दुसरी महत्त्वाची बाब अशी होती व आहे ती ही की, एनसीईआरटीच्या अखत्यारीत पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सूत्रे एकहाती होती. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षणक्रमात सांधेजोड सहज होऊ शकली.
   महाराष्ट्राचा तीन तिघाडा
      महाराष्ट्रात राज्यस्तरावर असे घडले नाही. वास्तवीक राज्य व केंद्रस्तरावर बहुतेक काळ एकाच पक्षाचे - काॅंग्रेसचेच - शासन होते. एनसीईआरटीशी केवळ नाम सादृष्य सादृश्य असलेली एससीईआरटी ही संस्था अस्तित्त्वात आली. पण हिची स्थिती एनसीईआरटी सारखी राहिली नाही. हिच्यावर वरचष्मा मुख्यत: प्रशासनाचा म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच राहिला. एनसीईआरटी प्रमाणे शिक्षणतज्ज्ञांचा( हे तज्ज्ञ बहुसंख्येने डाव्या विचारसरणीचे होते हा मुद्दा वेगळा) राहिला नाही. दुसरे असे की महाराष्ट्राने महाविद्यालयपूर्व शिक्षणाला ( पहिली ते बारावी) जी ‘फोडणी’ घातली ती अशी की, एससीईआरटी ही पहिली ते आठवी पर्यंतचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठीची  एक संस्था एवढेच तिचे स्वरूप राहिले, या अभ्यासक्रमावर पुस्तके तयार करणारी दुसरी संस्था, बालभारती आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ ही नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ठरवणारी व पाठ्यपुस्तके तयार करणारी तिसरी संस्था महाराष्ट्र राज्याने निर्माण केली. या तिन्ही संस्थांमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही, त्यांच्यात कधी छुपे तर कधी उघड वाद झाले, त्यात विभागीय मंडळे, निरनिराळ्या पातळींवर परीक्षा यांचीही एकच गर्दी  भर घालीत होती.
    अनेक पिढ्या मागे पडल्या
   या धोरणाचा एक परिणाम असा झाला की, पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा सलग विचार करणे जसे एनसीईआरटीला शक्य झाले तसे महाराष्ट्रात होईना. महाराष्ट्रापुरताच विचार करण्याची संकुचित भूमिका ठेवल्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राची मुले मागे पडू लागली. विशेषत: सीबीएसईचा बारावीचा अभ्यासक्रम आपल्या मुलांना जड वाटू लागला. एक चतुराई सुद्धा या निमित्ताने उघडकीस आली. एरवी ती उघडकीला आलीही नसती. शालांत परीक्षेचा निकाल चांगला लागावा म्हणून अभ्यासक्रमातील कठीण पाठ आपण नववीच्या अभ्यासक्रमात गुपचुप सरकवले. त्यामुळे या पाठांवर शालांत परीक्षेत प्रश्न विचारले जाण्याची शक्यताच संपुष्टात आली व निकाल चांगला लागण्यास चांगलाच हातभार लागला. ही युक्ती सफल होताच हाच प्रयोग बारावीच्या परीक्षेच्या बाबतील करण्याचे अवसान आपल्याला प्राप्त झाले. कठीण विषयांश आपण अकरावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले व बारावीच्या प्रश्नपत्रिकेत त्यांचा समावेश होणेच थांबवले. दहावीची परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आणि बारावीची परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित असते. त्यामुळे आनंददायी यशाला सीमाच उरल्या नाहीत. नव्वद टक्क्यापेक्षा कमी गुण मिळणारे दु:ख व्यक्त करू लागले. पण हे उसने अवसान स्पर्धा परीक्षेत गळून पडू लागले. मग कुठे आपल्याला जाग आली राज्य मंडळाने आपला अभ्यासक्रम सीबीएसईच्या तोडीचा करण्याचे ठरविले. पण हे सोपे नव्हते. कारण नुसता बारावीचा अभ्यासक्रमच वाढवला असता तर तो एका सत्रात पूर्ण करता आला नसता. म्हणून अकरावीचा अभ्यासक्रम वाढविणे क्रमप्राप्त झाले. असा रेटा उतरंड स्वरुपात दहावी व नववीच्या अभ्यासक्रमावर पडला. नववी ते बारावीचा अभ्यासक्रम एकाच मंडळाच्या अधीन असल्यामुळे ही बाब तुलनेने सोपी होती. पण हाच परिणाम पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमातही होणे कठीण होते. कारण त्या अभ्यासक्रमाचे नियंत्रण करणारी संस्था वेगळी होती. परिस्थितीच्या रेट्यामुळे बरावीच्या अभ्यासक्रमात व त्याला अनुसरून खालच्या वर्गांच्या अभ्यासक्रमात ढकलगाडीच्या वेगाने व केवळ वर नमूद केलेल्या रेट्यामुळे वाढ करणे सुरू झाले. ते अजूनही पूर्णत्त्वाला पोचतेच आहे.
  नवीन शासनाचा स्वागतार्ह निर्णय
   पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम एकाच शिक्षण मंडळाच्या आधिपत्त्याखाली आणण्याचा विद्यमान शासनाचा निर्णय म्हणूनच महत्त्वाचा मानला पाहिजे. दरम्यानच्या काळात स्पर्धा परीक्षेत आपल्या राज्यातील मुले मागे पडत राहिली. हा कटू असला आणि इतिहास असला तरी तो सहजासहजी विस्मृतीत जाणार नाही व तसा तो जाऊही नये. २००५ साली ज्या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोविली गेली ती पूर्णत्त्वाला जाण्यासाठी २०१६ साल उजाडावे लागले व राज्यात सत्ताबदल व्हावा लागला, ही वस्तुस्थिती डोळ्यात अंजन घालणारी ठरावी. अर्थात बदललेल्या यंत्रणेची सूत्रे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे राहू नयेत, प्रशासकीय अधिकार केवळ अंमलबजावणी पुरतेच असावे, ध्येय व धोरणांवर नियंत्रण शिक्षणतज्ज्ञांच्या हाती २००५ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून असावे, हेही तेवढेच आवश्यक आहे. रचनेतील बदल तेव्हाच फलदायी ठरेल. समाधानाची बाब ही की याची जाणीव शिक्षणमंत्र्यांना असून त्यांनी त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात करून योग्य अशा व्यक्तींचा शोध घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Thursday, April 21, 2016

ग्रेट बॅरियर रीफचे भवितव्य धोक्यात?
                वसंत गणेश काणे
    आॅस्ट्रेलिया खंडातील क्विन्सलंडला लागून असलेल्या कोरल समुद्रात २ हजार ३०० किलोमीटर लांब आणि ३ लक्ष ४४ हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळाची एक औरस चौरस व ऐसपैस रीफ आहे. रीफ म्हणजे पाण्यात जेमतेम बुडालेला दगड(बेट). या अफाट रीफ मध्येच ९०० लहानमोठी बेटे सुद्धा आहेत. हा भाग सलग पर्वतासारखा नसून त्यात २३०० घड्या आहेत. आपल्या सातपुड्यात जशा सात रांगा आहेत,तसाच काहीसा प्रकार म्हणायचा. प्रवाळ(कोरल पाॅलिप) नावाच्या सूक्ष्म जंतूंच्या अवशेषांपासून समुद्रात जेमतेम बुडालेल्या या जणू पर्वत रांगाच आहेत. ही अजस्त्र भिंत आॅस्ट्रेलिया खंडासाठी वरदान आहे. खोल समुद्रात वावरणारे शार्क सारखे भयंकर मासे ही भिंत ओलांडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे जलविहारासाठी व मासेमारीसाठी ही सुरक्षित व निसर्गनिर्मित सोय आहे. ही भिंत आणि आॅस्ट्रेलियाचा किनारा यातील ही चिंचोळी पट्टी अवकाशातूनही दिसते. अनेक जीवांचे आश्रयस्थान असलेली व प्रवाळांच्या अवशेषांपासून बनलेली ही नैसर्गिक भिंत (रीफ) १९८१ मध्ये जागतिक वारसास्थळ( वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणून मान्यता पावली. क्विन्सलंड प्रांताने तिला आपल्या राज्याचे मानचिन्ह(आयकाॅन) म्हणून गौरविले आहे. मानवी उपद्रव, अतिरेकी मासेमारी आणि पर्यटकांच्या अवांछनीय क्रिया यावर आॅस्ट्रेलियन सरकारने प्रतिबंध घालून या वारशाचे जतन करत आणले आहे.
    पण आता मात्र एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. वातावरणातील बदलामुळे या रीफच्या सोबतीने राहणाऱ्या जीवसृष्टीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून हा प्रवाळथर समूह( रीफ) आता वेगाने झिजू लागला आहे. तळपत्या उन्हामुळेही हे रंगीबेरंगी प्रवाळ खडक पांढरेफट्ट पडत असून त्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत चालले आहे.
   आणखी एक नैसर्गिक आपत्ती या अजस्त्र संरक्षक भिंतीच्या राशीला लागली आहे. निसर्गात स्टारफिश नावाचा जलचर आहे. या प्राण्याने अमरत्त्वाच्या दिशेने निदान अर्धे अंतर पार केले आहे, असे म्हणता येईल. या प्रण्याला मारण्याकरिता तुम्ही त्याचे शेकडो तुकडे केले तरी अल्पावधीतच प्रत्येक तुकडा आपल्या वाट्याला न आलेला शरीरभाग तयार करतो आणि शेकडो स्टारफिश आपल्या समोर उभे ठाकतात. रामायणात अहिरावण आणि महिरावणांची कथा आहे. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक अहिरावण व महिरावण तयार होत असे. या कथेची या निमित्ताने आठवण होते. प्रवाळ हे स्टारफिशचे आवडते अन्न आहे. स्टारफिशचे हजारो भाईबंद या भिंतीवर/या रीफवर तुटून पडले असून निदान ५०टक्के हिस्सा त्यांनी गिळंकृत केला आहे असे हवाई पाहणीतून दिसले आहे.
    २० व्या शतकाच्या मध्यात असाच हल्ला या स्टारफिशच्या भाईबंदांनी केला होता. आॅस्ट्रेलियाने या काळात या निमित्ताने आणीबाणी सदृश पावले उचलून यांना नष्ट करण्यासाठी लोकांचे गट समुद्र किनारी १५/१५ दिवसांसाठी पाठविले होते. एकेक स्टारफिश चिमट्यात पकडायचा आणि फाॅर्मलीनसारख्या द्रवात बडवून मारायचा, असे या मोहिमेचे स्वरूप होते. कारण स्टारफिशला हाताचा स्पर्श झाल्यास आपल्याला इजा होते. या मोहिमेत शाळकरी मुले सुद्धा सामील झाली होती, अशा आशयाचे माहितीपर लेख प्रसिद्ध झाले होते.
   यावेळी ग्लोबल वाॅर्मिंग सारखे नैसर्गिक (की मानवनिर्मित?) संकटही या अनमोल ठेव्याच्या नाशाला कारणीभूत होताना दिसते आहे. असा एका नैसर्गिक घटकाचा प्रकोप होऊन दुसरा नैसर्गिक घटक नष्ट होण्याचा प्रकार प्रथमच आमच्या पाहण्यात येतो आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Tuesday, April 19, 2016

   अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक -पूर्वरंग
वसंत गणेश काणे,
 बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  अमेरिकेत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य असे की, अध्यक्षाची निवड दर चार वर्षांनी होते. दुसरे असे की, निवडणूक मंगळवारीच होते. हा मंगळवारही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो नोव्हेंबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार’ असावा लागतो. प्रत्येक राष्ट्राला या ना त्या नावाने राष्ट्रप्रमुख असतोच. त्याच्या हाती सत्ताही असतेच. पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्वात जास्त सत्ता एकवटलेलीआहे. म्हणजे तिसरे असे की,  तो जगातील सर्वात बलशाली सेनेचा सरसेनापतीही असतो.
  अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या अटी
   अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या अटी अशा आहेत.
   ती व्यक्ती ‘अमेरिकेची नॅचरल बाॅर्न सिटिझन’असली पाहिजे. म्हणजे नक्की काय?
टेड क्रुझ यांचा पत्ता कट करण्यासाठीचा उपद्व्याप डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनीच केला, असे बोलले जाते. हा प्रश्न रिपब्लिकन पक्षातील अध्यक्षपदाचे दावेदार टेड क्रुझ यांच्या पात्रतेसंबंधीच्या आक्षेपावरील निवाड्याच्या निमित्ताने न्यू जर्सी न्यायालयाने नुकताच निकाली काढला आहे. टेड क्रुझ हे जरी अमेरिकान नागरीक असलेल्या दांपत्त्याचे अपत्य असले तरी त्यांचा जन्म कॅनडात झाला आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आईवडील कॅनडात राहत होते. अमेरिका, कॅनडा किंवा कॅनाल झोन (पनामा कालव्याच्या दोन्ही बाजूला पनामा रिपब्लिक हे स्वतंत्र राष्ट्र असले तरी १९०३ ते १९७९ पर्यंत या कालव्यावर अमेरिकेची सत्ता होती. हा भाग कॅनाल झोन म्हणून ओळखला जातो) म्हणून जो भाग ओळखला जातो त्या भागात जन्मलेले अमेरिकन नागरीक असलेल्या दांपत्याचे अपत्य अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास पात्र आहे असा हा निर्वाळा आहे. रिपब्लिकन पक्षात अध्यक्षपदाचे दावेदार असलेले डोनाल्ड ट्रंप यांना मात देऊ शकतील अशी शक्यता फक्त टेड क्रुझ यांच्या बाबतीतच आहे. तिसरे दावेदार  जाॅन कसिच हे असून ते पक्षांतर्गत शर्यतीत खूपच माघारले आहेत. ते बहुदा टेड क्रुझ यांच्यासाठी माघार घेतील, असे दिसते. ट्रंप यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळू नये, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्यांसाठी ही फार मोठी दिलासा देणारी बातमी आहे, हे जसे खरे आहे तशीच ही ट्रंप यांच्या पाठीराख्यांसाठीची सणसणीत चपराक मानली जाते. कारण टेड क्रुझ अपात्र ठरले असते तर ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षात दावेदारच राहिला नसता. टेड अपात्र ठरले तर काय करायचे? हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की, अमेरिकेत ‘पक्षश्रेष्ठी’ अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवत नाहीत तर पक्षसदस्य व पक्ष समर्थक म्हणून नोंदणी करणारे नागरिक यांच्या मतदानातून पक्षाचा उमेदवार ठरतो. या शर्यतीत बेतालपणा, बेच्छुटपणा व  असमंजसपणा यासाठीच प्रसिद्ध असलेले व प्रतिस्पर्ध्यावर कमरेखाली वार करण्यासही मागेपुढे न पाहणारे धच्चोट डोनाल्ड ट्रंप यांनी दोन्ही पक्ष, अमेरिकन नागरिक आणि समंजस जगातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
  निवडणूक सामान्य व्यक्तीच्या आटोक्यातली नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षाचे वय निदान ३५ वर्षे पूर्ण असले पाहिजे. तसेच त्याचे अमेरिकेत १४ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. या अटी वरवर दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी आजवर एकही सामान्य व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकलेली नाही. पंचतारांकित सेनापती, सिनेट मेम्बर, कोणत्या ना कोणत्या प्रांताचा गव्हर्नर हेच आजवर उमेदवारीसाठी प्रयत्न करतांना आढळून आले आहेत. शेवटी प्रसार माध्यमांचे लक्षही तो आपल्याकडे वेधून घेऊ शकला पाहिजे.
एक अफलातून तरतूद.
एक खास तरतूदही आहे. समजा तुम्ही मतदार आहात आणि मतपत्रिकेवरील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची एकही जोडी तुम्हाला पसंत नसेल तर अमेरिकन राज्यघटना तुम्हाला आपल्या पसंतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची जोडी आपल्या स्वत:च्या हस्ताक्षरात त्या मतपत्रिकेवर नोंदविण्याचा अधिकार देते. अर्थात अशी जोडी अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता मुळीच नसते हा भाग अलाहिदा.
कोणतीही जोडगोळी निवडा.
मतदान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडीला करावे लागते. एका पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार व दुसऱ्या पक्षाचा उपाध्यक्षीय उमेदवार अशी निवड करता येत नाही. यथावकाश डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्ष अध्यक्षपदाचा उमेदवार निवडतील. आपल्यासोबत उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार मात्र या उमेदवाराला असतो. अर्थात प्रत्यक्ष व्यवहारात हे असेच होते असे नाही. अध्यक्ष उत्तरेकडचा असेल तर उपाध्यक्ष दक्षिणेकडचा असलेला बरा. मते मिळविण्याचे दृष्टीने हे सोयीचे असते. एक पुरूष असेल तर दुसरी महिला असावी यासारखे व्यावहारिक फंडे अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या गळी उतरवण्यात पक्षश्रेष्ठी बहुदा यशस्वी होतात. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाची जोडी होती बराक ओबामा व ज्यो बिडन व रिपब्लिकन पक्षाची जोडी होती मीट राॅमनी व पाॅल रायन.
अमेरिकेत पक्ष किती?
  अमेरिकेत डेमोक्रॅट व रिपब्लिकन असे दोनच प्रमुख पक्ष असले तरी इतरही चिल्लर पक्ष आहेत. गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला ५१.१९ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.३२ टक्के मते मिळाल्याची नोंद आहे. ह्या दोन्ही पक्षांनी मिळविलेली एकूण मते ९८.५१ होतात. उरलेली १.४९ टक्के मते लिबर्टेरियन पार्टी (०.९९ टक्के), ग्रीन पार्टी(०.३६ टक्के), काॅनस्टिट्यूशन पार्टी (०.१० टक्के), जस्टिस पार्टी (०.०३ टक्के), सोशॅलिझम व लिबरेशन पार्टी (०.०६ टक्के) याप्रमाणात विखुरली गेली होती. यापैकी काही पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात एकही मत मिळाले नव्हते. पण असे पक्ष दरवेळी रिंगणात असतात. याशिवाय उमेदवार स्वत: आपल्या पसंतीच्या जोडीचे नाव मतपत्रिकेवर नोंदवू शकतो. हा उदार मानसिकतेचा कळस की गमतीचा विषय हे ज्याने त्याने ठरवावे.
प्रचारातील कवित्त्व - आम्ही अमूक एक बाब साध्य केली असे ओबामांनी म्हणताच, ‘ अहो, हे आम्हीच पूर्ण करीत आणले होते. तुम्ही फक्त नारळ फोडला आहे’, असे म्हणून रिपब्लिकन पक्षाने उत्तर द्यावे; ‘ अहो, या अध्यक्षाने जेवढ्या नोकऱ्या दिल्याना, त्यापेक्षा जास्त खड्डे माझ्या कुत्र्यांनी खणले आहेत.(कुत्री सतत जमीन उकरात असतात), असे म्हणत, दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणाऱ्या ओबामांची पहिली कारकीर्द, बेकारी दूर करण्याचे बाबतीत कशी विफल ठरली, हे पटविण्याचा प्रयत्न रिपब्लिकन करीत. राॅम्नी हे आपली जुनी वक्तव्ये विसरून विधाने करू लागले की ओबामा म्हणत रिपब्लिकनांना राॅम्नेशिया( ॲम्नेशियाचे - विस्मृतीचे - राॅम्नींसाठी ओबामांनी केलेले खास रुपांतर) झाला आहे. हे ऐकले की असे म्हणावेसे वाटते की, घरोघरीच नव्हे तर देशोदेशी सुद्धा मातीच्याच चुली.

पसंतीक्रमानुसार  होणारी निवडणूक
वसंत गणेश काणे,     
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
 
पसंतीक्रमानुसार होणारी निवडणूक  
वसंत गणेश काणे
शिक्षक व पदवीधर मतदारसंघात निवडणूक होऊ घातली असून तिचे स्वरूप विधानसभा व लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीपेक्षा कसे वेगळे असते, ते समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे. हे वेगळेपण लक्षात येण्यासाठी (बहुदा) १९५२ साली झालेल्या एक उदाहरण उपयोगी ठरणार आहे. या निवडणुकीत एका मतदारसंघात बरेच उमेदवार उभे होते. त्यातला एक उमेदवार निवडून आला पण त्याची अनामत रकम मात्र जप्त झाली. असे कसे घडले? तो निवडून आला कारण अर्थातच त्याला सर्वात जास्त मते पडली होती आणि तरीही त्याची अनामत रकम जप्त झाली कारण ज्याज्या उमेदवारांना झालेल्या मतदानापैकी १/६ निवडणुकीतील पेक्षा कमी मते मिळतील त्यांची अनामत रकम जप्त होईल, असा नियम होता. याचा अर्थ असा होतो की त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उमेदवाराला सर्वात जास्त मते मिळाली असली तरी एकूण मतदानाच्या १/६ पेक्षाही कमी मते मिळाली होती. मग निवडणूक आयोगाने नियमात दुरुस्ती करून ठरविले की अनामत रकम जप्त होण्याची अट विजयी उमेदवाराला लागू असणार नाही. निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदानापैकी पन्नास टक्यापेक्षा निदान एक मत तरी जास्त असाले पाहिजे ही अपेक्षा लोकशाही मूल्यांचा विचार करता रास्त मानली पाहिजे. पण ही अपेक्षा विधानसभा, लोकसभा, नगरपालिका यांच्या निवडणुकीत पूर्ण होत नाही. पक्षनिहाय व देशपातळीवर विचार केला तर काॅंग्रेस पक्षाने ५० पेक्षा जास्त वर्षे राज्य केले आहे.
  १९८४ साली मतांची देशपातळीवरची टक्केवारी ४९.१० असतांना सुद्धा काॅंग्रेसला लोकसभेत जागा  मात्र  ५४३ पैकी ४०४ मिळाल्या. श्रीमती इंदिरा गांधींच्या खुनानंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ झालेल्या राजीव गांधी यांच्या वाट्याला आलेले हे असे अपूर्व यश त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यांची कर्तृत्त्वशाली कन्या व राजीव गांधी यांची आई इंदिरा गांधी यांच्याही वाट्याला कधीही आले नव्हते. पण मते जेमतेम ५० टक्के व जागा मात्र पन्नास टक्यापेक्षा कितीतरी जास्त (म्हणजे २७२ ऐवजी ४०४)  असा हा प्रकार झाला होता. याउलट २०१४ साली मतांची देशपातळीवर टक्केवारी १९.३० असतांना काॅंग्रेसला लोकसभेत जागा  मात्र  ५४३ पैकी फक्त ४४ मिळाल्या. मते जवळजवळ १९.३० टक्के असून सुद्धा  जागा मात्र टक्यापेक्षा कितीतरी कमी (म्हणजे १०९ ऐवजी ४४) असा हा प्रकार झाला होता. हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनेशी कितपत मिळता जुळता आहे?
  यावर उपाय काय? राज्यघटनेत सुद्धा पसंतीक्रमानुसार निवडणुका व्हाव्यात, असे सुचविले आहे. पण त्यावेळी (१९५२ साली) भारतीय मतदार या दृष्टीने पुरेसे प्रगल्भ नाहीत, म्हणून ते प्रगल्भ होईपर्यंतच्या काळात सध्याची निवडणूक पद्धत चालू रहावी, असे नमूद केले आहे. मतदारांना पुरेसे प्रगल्भ न मानणे अनेकांना मान्य नाही. त्यांच्यामते लोकजीवनातील बहुतेक व्यवहार पसंतीक्रमानुसारच होत असतात. त्यामुळे सर्व निवडणुका पसंतीक्रमावरच आधारित असाव्यात असे त्यांते मत असते.
पसंतीक्रमानुसार निवडणूक
एकल संक्रामक मत (सिंगल ट्रांस्फरेबल व्होट) याचा अर्थ असा की, प्रत्येक मतदाराला एकच मत असते पण तो उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देऊ शकतो. दुसरा विशेष असा की, सर्व पसंतीक्रम नोंदविणाऱ्या मतदाराची मतपत्रिका निवडणूक शेवटाला जाईपर्यंत ( कोणत्या ना कोणत्या उमेदवाराला  पन्नास टक्के + १ इतकी मते मिळेपर्यंत) मतगणनेत कायम राहते. मात्र यासाठी सर्व मतदारांनी सर्व पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. अशी सक्ती मात्र नसते. पहिला पसंतीक्रम मात्र दिलाच पाहिजे. कारण कोरी मतपत्रिका विचारात घेता येत नाही, कारण त्या मतदाराची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे, ते कळायला मार्ग नसतो.
   पसंती हा मनुष्य स्वभाव आहे. आपण बाजारात जातो, दहा दुकाने पालथी घालतो आणि सर्वात जास्त पसंतीची वस्तू विकत घेतो. इतर वस्तू अगदीच टाकावू असतात असे नसते. त्यांना आपला पहिला पसंतीक्रम नसतो इतकेच. हेच तत्त्व या पद्धतीत उपयोगात आणले आहे. *
मतपत्रिकेचे स्वरूप
  मतपत्रिकेत सर्व उमेदवारांची नावे दिलेली असतात. त्यांच्या नावासमोर मतदाराला आपला पसंतीक्रम नोंदवायचा असतो. पसंतीक्रम नोंदविलेली एक मतपत्रिका उदाहरणादाखल घेऊ.
                        
                       मतपत्रिकेचा नमुना
क्र
उमेदवाराचे नाव
पसंतीक्रम
5
2
3
1
4

 या मतदाराने आपला पहिला पसंतीक्रम ‘ड’ ला; दुसरा पसंतीक्रम ‘ब’ ला; तिसरा पसंतीक्रम ‘क’ ला; चौथा पसंतीक्रम ‘इ’ ला व पाचवा पसंतीक्रम ‘अ’ ला देऊन आपले सर्व पसंतीक्रम नोंदविले आहेत. या मतदाराची पहिली पसंती ‘ड’ ला, दुसरी ‘ब’ ला, तिसरी ‘क’ ला, चौथी ‘इ’ला आणि पाचवी ‘अ’ ला आहे, असे लक्षात येईल.
मतगणना कशी होते?
  समजा एका मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या १५०००( पंधरा हजार) आहे आणि त्यापैकी ११०० (अकरा हजार) मतदारांनी मतदान केले आहे. सुरवातीला अवैध मतपत्रिका वेगळ्या काढून त्या बाद केल्या जातात.
मत अवैध कसे ठरते?
१. मतपत्रिका कोरी असेल किंवा दोन उमेदवारांच्या नावासमोर पहिला पसंतीक्रम दिलेला असेल (१ हा अंक लिहिला असेल) तर
२. मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम कोणालाच दिलेला नसेल तर
३. पसंतीक्रम अक्षरात नोंदवला असेल तर
४. नेमून दिलेल्या पेनने पसंतीक्रम नोंदवला नसेल तर
५. मतपत्रिकेवर बरोबरची किंवा चुकीची ( X) खूण केली असेल तर ( शिक्षक/ प्राध्यापकांकडून पेपर तपासण्याच्या सवयीनुसार ‘आदतसे लाचार’ या न्यायाने असा प्रकार अनेकदा घडतो.
६. पसंतीक्रमाभोवती चौकोन किंवा वर्तुळ काढले असेल तर
७. या शिवाय अशी कोणतीही खूण किंवा कृती की ज्यामुळे मतदाराची ओळख पटू शकेल
८. मधलाच पसंतीक्रम वगळला असेल तर - समजा, एखाद्या मतपत्रिकेवर पहिले दोन पसंतीक्रम दिलेले आहेत. तिसरा पसंतीक्रम कुणालाच दिलेला नाही व पुढे चौथा पाचवा असे पसंतीक्रम दिलेले आहेत. अशावेळी पहिले दोन पसंतीक्रम मोजतांना ही मतपत्रिका मतगणनेत राहील व नंतर मात्र बाद होईल. पसंतीक्रम जोपर्यंत क्रमवार दिलेले आहेत तोपर्यंतचा क्रम येईपर्यंत ते मत मतगणनेसाठी विचारात घेतले जाते पुढे मात्र बाद होते/अपात्र ठरते किंवा संपुष्टात येते.
समजा, ११००० मतांपैकी ५०० मते यापैकी दिलल्या कोणत्या नाही कोणत्या कारणाने अवैध ठरली व १०५०० मते वैध ठरली तर तशा अर्थाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात.
कोटा म्हणजे काय? तो कसा ठरवतात?
जर मतदारसंघातून एकच उमेदवार निवडायचा असेल तर दोनने, दोन उमेदवार निवडायचे असतील तर तीनने १०५०० ला भागून येणाऱ्या संख्येत १ मिळवून येणाऱ्या संख्येला कोटा असे म्हणतात. शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातून एकच प्रतिनिधी निवडायचा असतो. त्यामुळे १०५०० ला दोनने भागून त्यात १ मिळविल्यास ( १०५००/२ =५२५०+१ =५२५१) कोटा ५२५१ ( पाच हजार दोनशे एक्कावन) येईल.
वैध मतांची मतगणना
मतमोजणीची पहिली फेरी - प्रत्येक मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम कोणत्या उमेदवाराला आहे ते पाहून मतपत्रिकांची पहिल्या पसंतीक्रमानुसार विभागणी केली जाते. समजा,  १०५०० मते उमेदवारांमध्ये पुढीलप्रमाणे विभागली गेली आहेत.

तक्ता क्र - १
                            सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते दाखवणारा तक्ता
क्र
उमेदवाराचे नाव
पहिल्या पसंतीची मते

3500

4000

1100

1500

400
सर्वात कमी मते म्हणून बाद होणार

एकूण वैध मते
10500


अवैध मते
500


संपुष्ट
-----


मतदान
11000


 
  मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 5251 हा कोटा एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार निवडून आला नाही, म्हणून सर्वात कमी मते असलेल्या ‘इ’ या उमेदवाराला बाद (एलिमिनेट) करीत आहोत व याला(‘इ’ला) पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 400 मतदारांनी दुसरा पसंतीक्रम कोणाला दिला आहे, हे पाहण्यासाठी या 400 मतांपैकी प्रत्येक मत तपासून त्या मतांची उरलेल्या चार उमेदवारात फेरवाटणी करण्यात येत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात.
मतमोजणीची दुसरी फेरी - ‘इ’ ला पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 400 मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम कोणाला दिलेला आहे, हे पाहण्यात आल्यानंतरची स्थिती पुढीलप्रमाणे आहे, असे समजू या.

तक्ता क्र - २
‘इ’ बाद झाल्यानंतर त्याच्या मतांची वाटप
क्र
उमेदवाराचे नाव
पहिल्या पसंतीची मते
E1-‘इ’ 400 च्या  मतांचे वाटप
पहिल्या फेरी अखेरीनंतर उरलेल्या ४ उमेदवारांची मते
3500
200
3700
4000
50
4050
1100
100
1200
1500
15
1515
400 E1
‘इ’ 400 च्या  मतांचे वाटप
बाद

एकूण वैध मते
10500
365
10465

अवैध मते
500
----
----

संपुष्ट
-----
35
35

मतदान
11000

10500


या तक्त्याचा अर्थ असा आहे. ‘इ’ ला ४०० मते देणाऱ्यांचा दुसरा पसंतीक्रम कसा आहे हे वरील तक्त्यावरून कळते ते असे.
१. ३५ मतदारांनी सिंगल व्होटिंग केले व पहिलाच पसंतीक्रम नोंदवला. या मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम नोंदवलाच नाही. त्यामुळे ती संपुष्टात आली/ बाद झाली.
२. १५(पंधरा) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ड’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ड’ कडे संक्रमित झाली/ ‘ड’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘ड’ ची एकूण मते १५००+१५= १५१५ ( पंधराशे पंधरा) झाली.
३.  १००(शंभर) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ड’ नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ड’ कडे संक्रमित झाली/ ‘क’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘क’ ची एकूण मते ११००+१००=१२०० (बाराशे ) झाली.
४.  ५०(पन्नास) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ब’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ब’ कडे संक्रमित झाली/ ‘ब’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘ब’ ची एकूण मते ४०००+५० =४०५० (चार हजार पन्नास ) झाली.
४. २०० (दोनशे ) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘अ’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘अ’ कडे संक्रमित झाली/ ‘अ’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘अ’ ची एकूण मते ३५००+२००= ३७००(सदतीसशे) झाली.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही 5251 हा कोटा एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतरही कोणताही उमेदवार निवडून आला नाही, म्हणून सर्वात कमी मते असलेल्या ‘क’ या उमेदवाराला बाद (एलिमिनेट) करीत आहोत व याला(‘क’ला) पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 1100 मतदारांनी दुसरा पसंतीक्रम कोणाला दिला आहे, हे पाहण्यासाठी या 1100 मतांपैकी प्रत्येक मत तपासून त्या मतांची उरलेल्या चार उमेदवारात फेरवाटणी करण्यात येत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात. तसेच ‘क’ ला दुसरा पसंताक्रम देणाऱ्या मतदारांनी आपला तिसरा पसंतीक्रम कोणाला दिलेला आहे, हे पाहून ही मते तिसऱा पसंतीक्रम लक्षात घेऊन त्यात्या उमेदवारांना संक्रमित करण्यात येतील, अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात.*
मतमोजणीची तिसरी फेरी
5251 हा कोटा (म्हणजे ५० टक्के +१)कोणीही पूर्ण केलेला नाही. म्हणून या फेरीत आता सर्वात कमी मते मिळविणारा उमेदवार ‘क’ आहे. त्याला पहिल्या पसंतीक्रमाची ११०० व ‘इ’पहिला पसंतीक्रम देणाऱ्यांची १०० अशी १२०० मते मिळाली आहेत. ११००मतपत्रिकेवर दुसरा पसंतीक्रम कुणाला आहे तसेच ‘इ’ कडून आलेल्या १०० मतपत्रिकेवर तिसरा पसंतीक्रम कोणाला आहे, ते पाहिले जाते आणि त्यानुसार ती मते त्यात्या उमेदवाराकडे संक्रमित होतात/ त्यात्या उमेदवाराच्या गठ्यात स्वतंत्र ठेवून मोजली जातात. हे दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.
तक्ता क्र - ३
‘क’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप
क्र
उमेदवाराचे नाव
पहिल्यापसंतीची मते
E1-‘इ’ 400 च्यामतांचे वाटप
पहिल्या फेरीनंतर ४उमेदवारांची मते
E2(1) ’क’च्या
1100 मतांचे वाटप
E2(2) ’क’च्या 100 मतांचे वाटप
Total
तिसऱ्या फेरीनंतरचीप्रत्येकाची
मते
3500
200
3700
600
25
4325
4000
50
4050
300
50
4400
1100
100
1200
El2
बाद
--
1500
15
1515
50
15
1580
400 E1
‘इ’ 400 च्या मतांचे वाटप
बाद
---
---
--

एकूण वैध मते
10500
365
10465
950
90
10305

अवैध मते
500
----
----




संपुष्ट
-----
35
35
150
10
195

मतदान
11000
400
10500
1100
100
10500


वरील तक्ता दाखवतो की,
(१) ‘क’ मिळालेल्या पहिल्या पसंतीक्रमाच्या ११०० मतांवरचा दुसरा पसंतीक्रम पाहून ‘अ’ ला ६००, ‘ब’ ला ३०० व ‘ड’ ला ५० मते संक्रमित झाली आहेत.
(२)‘क’ च्या वाट्याला आणखी १०० मते आली आहेत. ही मूळची ‘इ’ची पहिल्या पसंतीक्रमाची मते होती. या मतांवर दुसरा पसंतीक्रम ‘क’ ला होता, म्हणून ती ‘क’ च्या वाट्याला आली होती पण ‘इ’ प्रमाणे ‘क’ सुद्धा बाद झाला. त्यामुळे या १०० मतपत्रिकांवर तिसरा पसंतीक्रम कोणाला आहेते पाहून ‘अ’ ला२५, ‘ब’ ला ५० व ‘ड’ ला १५ मते संक्रमित झाली आहेत, असे हा तक्ता दाखवतो.
(३) अशी कल्पना करू की, शंभर मतपत्रिकांपैकी १५ मतपत्रिकावर तिसरा पसंतीक्रम ‘इ’ ला होता पण ‘इ’ अगोदरच बाद झाला आहे, आता काय करायचे? या मतपत्रिकेवरचा चौथा पसंतीक्रम कोणाला आहे ते पाहिले जाते. समजा सर्वच्या सर्व म्हणजे १५ मतपत्रिकांवर चौथा पसंतीक्रम ‘ड’ ला आहे. त्यामुळे ही मते ‘ड’ कडे संक्रमित होतील. या सगळ्या  १५ मतपत्रिकांवर चौथा क्रमांक फक्त ‘ड’ ला नसता व काही मते ‘अ’ ला व काही मते ‘ब’ला असती तर ती मते त्यांना देण्यात आली असती.  या निमित्ताने मतांच्या फेरवाटणीचे तत्त्व लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. हे तत्त्व असे आहे की, जर एखादा पसंतीक्रम वापरला गेला असेल आणि तो उमेदवार अगोदरच बाद झाला असेल तर त्याच्या पुढचा पसंतीक्रम (या उदाहरणात चौथा) विचारात घ्यावा, तोही बाद झाला असेल तर पाचवा पसंतीक्रम विचारात घ्यावा व ते उमेदवार मैदानात असतील ( रनिंग कॅंडिडेट असतील / बाद झाले नसतील) तर ते मत त्यांच्याकडे संक्रमित करावे.
(४) आता ‘अ’ ‘ब’ व ‘ड’ ची मते अनुक्रमे  ४३२५, ४४०० व १५८० झाली आहेत. एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो हा की ‘अ’ व ‘ब’ मधील मुळात ५०० मतांचा असलेला फरक कमी होतहोत आता फक्त ७५ चा राहिला आहे.
(५) पण अजूनही ५२५१ चा कोटा कोणीही पूर्ण केलेला नाही, त्यामुळे कोणीही निवडून आला नाही अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात आणि या तिघात सर्वात कमी मते असलेल्या ‘ड’ ला बाद करतात.

मतगणनेची चौथी फेरी
सर्व पसंतीक्रम का नोंदवायचे ?
समजा एका मतपत्रिकेवर अ, ब, क, ड, इ या पाच उमेदवारांना अनुक्रमे 5, 2, 3, 4, व 1 असे पसंतीक्रम दिलेले आहेत व ‘इ’ हा उमेदवार बाद झाला आहे. या मतपत्रिकेवर दुसरा पसंतीक्रम ‘ब’ ला आहे, त्यामुळे हे मत ‘ब’कडे संक्रमित झाले पाहिजे पण जर तोही बाद झाला असेल तर तिसरा पसंतीक्रम असलेल्या ‘क’ कडे व तोही बाद झाला असेल तर चौथा पसंतीक्रम असलेल्या  ‘ड’ कडे संक्रमित होईल व तोही बाद झाला असेल तर शेवटी पाचवा पसंतीक्रम असलेल्या ‘अ’ कडे संक्रमित होईल. अशाप्रकारे सर्व पसंतीक्रम नोंदवणाऱ्या मतदाराचे मत शेवटपर्यंत मतगणनेत कायम राहते.
तक्ता क्र ४
‘ड’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप
क्र
उमेदवार
पहिल्या पसंतीची मते
E1इ 400 च्या  मतांचे वाटप
पहिल्या फेरीनंतर उरल्ल्या ४ उमेदवारांची मते
E2(1) ’क’च्या 1100 मतांचे वाटप
E2(2) ’क’च्या 100 मतांचे वाटप
Totalतिसऱ्या फेरीनंतरची प्रत्येकाची मते
‘ड’च्या मूळ 1500 मतांचे वाटप
‘इ’च्या 15 मतांचे वाट
‘क‘च्या
5 0 मतांचे वाटप
15 मतांचे
वाटप
चौथ्या फेरीनंतरची प्रत्येकाची मते
3500
200
3700
600
25
4325
400
4
5
3
4737
4000
50
4050
300
50
4400
300
6
5
2
4713
1100
100
1200
El2
बाद
--
--




1500
15
1515
50
15
1580
El3




400 E1
इची 400
बाद
---
---
--






एकूण वैध मते
10500
365
10465
950
90
10305
700
10
10
5
9450

अवैध मते
500
----
----









संपुष्ट
-----
35
35
150
10
195
800
5
40
10
1050

मतदान
11000
400
10500
1100
100
10500
1500
15
50
15
10500

‘ड’ च्या १५८० मतांच्या वाटपाचा हिशोब असा आहे.
१. ‘ड’ ची मूळ मते १५०० आहेत. या मतपत्रिकावरचा दुसरा पसंतीक्रम कोणाला आहे ते पाहिले जाते. हा उमेदवार अगोदरच बाद झाला असेल तर त्या पुढचा व तोही बाद झाला असेल तर त्याच्या पुढचा रनिंग कॅंडिडेट कोण आहे, ते पाहून हे मत त्याला संक्रमित करतात. याप्रमाणे ‘अ’ ला 400 ‘ब’ ला 300 मते मिळाली व 800 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
२. ‘इ’ बाद झाल्यानंतर त्याला पहिला पसंतीक्रम देणाऱ्या १५ मतदारांनी दुसरा पसंतीक्रम ‘ड’ ला दिला होता म्हणून ती मते ‘ड’ च्या वाट्याला आली होती. या मतपत्रिकांवरील तिसरा व तो संपुष्टात आला असेल (म्हणजे तो उमेदवार अगोदरच बाद झाला असेल) तर चौथा व तोही संपुष्टात आला असेल तर पाचवा पसंतीक्रम पाहून ते मत संक्रमित केले जाते. याप्रमाणे ‘अ’ ला 4 ‘ब’ ला 6 मते मिळाली व 5 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
३. ‘ड’ च्या वाट्याला ’क’ बाद झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पसंतीक्रमाची ५० मते पाहून त्यावरचा तिसरा पसंतीक्रम पाहून किंवा तो संपुष्टात आला असेल तर चौथा या न्यायाने रनिंग कॅंडिडेटचा शोध घेऊन ते मत संक्रमित केले जाते. याप्रमाणे ‘अ’ ला 5 ‘ब’ लाही 5मते मिळाली व 40 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
४. ‘ड’ च्या वाट्याला या शिवाय आणखी १५ मते आलेली आहेत.या मतपत्रिकांवर पहिला पसंतीक्रम ‘इ’ ला होता. म्हणून ही मते इ ला मिळाली होती. या मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम ‘क’ ला होता व तिसरा पसंतीक्रम ‘ड’ ला होता म्हणून ही मते ‘ड’ कडे आली होती. या मतपत्रिकांवरचा चौथा पसंतीक्रम पाहिला जातो. समजा या पाहण्यानुसार ‘ब’ ला २(दोन) मते व ‘अ’ ३(तीन) मते मिळाली. तसेच सगळे पसंतीक्रम नसल्यामुळे १० (दहा) मते संपुष्टात आली.आता अ ची एकूण मते ४७३७ व ‘ब’ ची एकूण मते ४७१३ होतात. पण कोणीही कोटा पूर्ण केला नसल्यामुळे कणीही निवडून आला नाही, अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात.
पाचवी फेरी
  या दोघात ‘ब’ ला कमी मते असल्यामुळे त्याला बाद करतात. पण मग रिंगणात ‘अ’ हा एकच उमेदवार उरतो.त्यामुळे तो निवडून येणार हे नक्की झाले. पण ‘अ’ कोटा पूर्ण करून निवडून येतो की कोटा पूर्ण न करणारा पण जास्तीत जास्त मते मिळविणारा उमेदवार म्हणून निवडून येतो, हे पाहिले जाते.
पसंतीक्रम पद्धतीची विशेषता
१. अगदी सुरवातीला ‘ब’ ला ‘अ’ पेक्षा पाचशे मते जास्त होती.(४०००-३५००= ५००)
२. नंतरच्या फेरीत हा फरक ३५० इतकाच राहिला.(४०५०- ३७००= ३५०)
३. पुढच्या फेरीत हा फरक आणखी कमी होऊन केवळ ७५ इतकाच राहिला. (४४००- ४३२४= ७५)
४.चौथ्या फेरीअखेर तर हा चोवीस मतांनी पुढे गेला.( ४७३७-४७१३ = २४)
५. आतापर्यंत जसा हिशोब केला तसाच हिशोब पाचव्या फेरीत केला जातो.
खालील तक्त्यात ‘अ’ व ‘ब’ ची पहिल्या पसंतीची मते व चौथ्या फेरीनंतरची मतेच जागेअभावी घेतली आहेत. तसेच ‘क’, ‘ड’ व ‘इ’ हे उमेदवारही दाखविलेले नाहीत.
तक्ता क्र - ५
‘ब’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप

उमेदवाराचे नाव
पहिल्या पसंतीची मते
चौथ्या फेरीनंतरची मते
E4(1)
E4
(2)
E4(3)
E4(4)
E4(5)
E4(6)
E4(7)
E4(8)
Total
3500
4737
1000
10
100
5
100
2
3
0
6057
4000
4713
--
--
--
बाद






एकूण वैध मते
10500
9450










अवैध मते
500











संपुष्ट
-----
1050








1220

मतदान
11000
10500












  शेवटी असे चित्र समोर येते की, पहिल्या फेरीत मागे असलेला ‘अ’ पुढच्या प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्याची बढत हळूहळू कमी करत गेला व शेवटी ६०५७ मते मिळवून व कोटा पूर्ण करून निवडून आला. या फेरीत ‘ब’ च्या ४७१३ मतांची वाटणी होऊन ६०५७ मते ‘अ’ ला मिळाली.

(वरील तक्ता काय दाखवतो)
(१. ‘ब’ च्या ४७१३ मतांपैकी ४००० ही त्याची मूळची पहिल्या पसंतीची मते आहेत. यातील १००० पैकी काही मतांवर दुसरा / काही मतांवर तिसरा / काही मतांवर चौथा / तर काही मतांवर पाचवा क्रमांक ‘अ’ ला होता, असे गृहीत धरू.म्हणून ती ‘अ’ च्या पारड्यात टाकली जातील(‘अ’ कडे संक्रमित होतील.) ज्या मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम ‘अ’ ला आहे, ती मते ‘अ’ कडे संक्रमित होतील, हे स्पष्ट आहे. यातील  काही मतांवर खरेतर ‘अ’ ला तिसरा पसंतीक्रम होता. पण दुसरा पसंतीक्रम असलेला ‘क’ अगोदरच बाद झाल्यामुळे तिसरा पसंतीक्रम असलेल्या ‘अ’ कडे ही मते संक्रमित होतात.ह्याच न्यायाने चौथा व पाचवा पसंतीक्रम असलेली मते सुद्धा ‘अ’ लाच मिळतील, हेही स्पष्ट आहे.
२. ‘ब’ कडे ७१३ मते ‘क’, ‘ड’, ‘इ’ बाद झाल्यानंतर आली आहेत.)