Monday, May 19, 2014

Elections in India Lokshahi varta 19.05.2014

न्यूयार्क टाईम्सच्या नजरेतून भारतातील निवडणुका
प्रासंगिक
न्यूयार्क टाईम्स हे अमेरिकेतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त दैनिक आहे. भारतातील निवडणुकीबाबत लिहितांना हे वृत्तपत्न काय लिहिते, हा अर्थातच एक कुतुहलाचा विषय असणार, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. ते म्हणते 'स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बहुतेक काळात भारतात काँग्रेस पक्षच सत्तेवर होता. विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडून निवडणुकीत सपशेल आपटी खाण्याची चिन्हे दिसू लागताच काँग्रेसने पराभव मान्य केला. ही नामुष्की काँग्रेसवर ओढवली याला कारणीभूत ठरली, देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक भ्रष्टाचाराची एकामागून एक उघड होणारी प्रकरणे. खुद्द राहुल गांधी यांचे मताधिक्यही या निवडणुकीत घटले
जवळ जवळ ५५ कोटी लोकांनी या निवडणुकीत मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच पराभवाची चाहूल लागली आणि काँग्रेसने आपला पराभव मान्य केला. भारतातील राजकीय घराण्याचे वारस राहुल गांधी हेच काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. आपल्या मतदारसंघात ते पूर्वीच्या तुलनेत फारच थोड्या मताधिक्याने निवडून आले. २00९ साली हे मताधिक्य जवळ जवळ तीन लक्ष इतके होते. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फलक प्रदर्शित करीत, राहुल गांधीची धाकटी बहीण प्रियंकाला आणा आणि काँग्रेसला वाचवा अशा घोषणा दिल्या. ही राहुल गांधींसाठी अतिशय नामुष्कीची बाब होती. प्रियंका गांधींचा करिश्मा तिच्या भावापेक्षा कितीतरी जास्त आहे, असे यावरून मानले जाते.
पराभवाची चिन्हे दिसू लागताच, आम्ही जनतेचा जनादेश विनम्रपणे स्वीकारतो, असे काँग्रेसने जाहीर केले. पहिल्या काही तासांच्या मतमोजणीनंतरच भारतीय जनता पार्र्टी हा (अमेरिकेत त्याचे वर्णन हिंदू राष्ट्रीय पक्ष असे केले जाते) पक्ष २७२ पेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकणार हे स्पष्ट झाले आणि आघाडीचे राजकारण आता संपणार याबद्दल समाधान व्यक्त होऊ लागले. प्रादेशिक नेतृत्वाच्या सौदेबाजीचा त्नास नवीन सरकारला होणार नाही, हेही स्पष्ट झाले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांना जबरदस्त जनादेश (सहानुभूतीच्या लाटेमुळे) मिळाला होता. त्यानंतर प्रथमच एवढा मोठा जनादेश मोदी यांना मिळाला आहे. मतमोजणी अगोदरच चाहत्यांनी एक लक्ष लाडूंची ऑर्डर देऊन ठेवली होती. हा जनादेश प्रागतिक आणि स्थिर सरकारच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने नोंदविली आहे.
ही निवडणूक अशा काळात झाली आहे की, ज्या काळात भारतीय समाजामध्ये फार मोठे स्थित्यंतर घडून येत आहे. शहरीकरण आणि आर्थिक विकास यांचा परिणाम मतदान प्रक्रियेच्या स्वरूपावर होत आहे. जुन्या निष्ठा आणि तत्वज्ञान यांचा मतदारांवरचा प्रभाव ओसरत चालला असून नवीन आयाम ९त्यांची जागा घेत आहेत. म्हणूनच एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नरेंद्र मोदींसारखा एक नेता आपल्या यापूर्र्वीच्या नेत्यांना आव्हान देऊ शकला.
मोदींची काही अतिशय वेगळी वैशिष्ट्ये आहेत. मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १९४७ नंतर झाला आहे. मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत की, ज्यांची आई हयात आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानांना ते सुख लाभलेले नाही. मोदी हे असे दुसरे प्रादेशिक नेते आहेत की, ज्यानी पंतप्रधानपदावर आपला दावा सांगितला आहे. पहिले नेते देवेगौडा. नोकरशाही आणि राजकीय क्षेत्रावर भरभक्कम पकड सतत तेरा वर्षे असलेले नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. एक कडक आणि शिस्तप्रिय नेता म्हणून असलेली त्याची प्रतिमा मतदारांना अतिशय भावली. हाच नेता भ्रष्टाचाराला आवर घालू शकेल, डबघाईला आलेल्या अथर्कारणाला सावरू शकेल आणि रोजगार निर्मिर्तीला चालना देऊ शकेल, असे मतदारांना वाटले.
आता अनेकांना २00२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाहीना, अशी भीती वाटते आहे. असे झालेच तर मोदी कठोर पावले उचलतील. आजवर दिल्लीच्या शासनाभोवती कथित उदारमतवादी आणि आंतरराष्ट्रीय भूमिकाधारकांचे वेटोळे होते. त्यांना एक प्रभावी आणि केंद्रीभूत सत्ता असलेला नेता कसा मानवणार?
मोदी हा नेता अक्षरश: शून्यातून प्रगटला आहे. यामुळे परंपरागत नेतृत्वाला कसेसेच वाटते आहे. खरे तर सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने ही एक उपकारक गोष्ट म्हटली पाहिजे. सगळे सामाजिक वातावरण आता ढवळून निघणार आहे, असे अनेक मानतात.
गेल्या वर्षी मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, तेव्हा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा मिळतील, असे कोणालाही वाटले नव्हते. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्र्दीत काँग्रेस शासनाने जनकल्याणाच्या अनेक योजना अमलात आणल्या होत्या. भारतातील बहुसंख्य जनता आजही गरीब असून ती खेड्यात राहते. खेडोपाडी प्रचार करण्याचे तंत्र काँग्रेसला चांगलेच अवगत आहे. याउलट भाजप हा शहरी पक्ष मानला जातो. पण मोदींना नव्याने नोंद झालेल्या १0 कोटी मतदारांपैकी तरुण मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. यामुळे मतदानाचे यापूर्र्वीचे सगळे उच्चांक मोडले गेले आणि ६६.४ टक्के मतदानाची नोंद झाली.
या नवीन मतदारांवर गुजरातच्या २00२ च्या दंग्यांचा परिणाम नव्हता. अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्याच्या घटनेचाही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. नेहरू- गांधी घराण्याशी त्यांचे भावनिक बंध नव्हते.याउलट काँग्रेसचा हाच मुख्य आधार होता. तसेच या घराण्यातील दोघांच्या (इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) बलिदानानेही त्यांचे मन हेलावून जात नव्हते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हे मतदार जन्माला आले होते. २00२ च्या दंगलींच्या आठवणी यांना अंधुकशाही आठवत नव्हत्या. त्यांना जाणवत होता पाच वर्षांचा कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाचा अभाव! नोकरीच्या संधी प्रत्येक क्षेत्नात कमी झाल्याचा अनुभव! ज्यांनी ७ टक्क्याचा विकास दर पाहिला होता, त्यांच्यासाठी ४.५ टक्क्याचा विकास दर म्हणजे मंदीचाच प्रकार होता. त्यातून आता काँग्रेस शासन सुकाणू विरहित झाले होते. डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय कीर्र्तीचे अथर्शास्त्नज्ञ होते होते, हे खरे. पण त्यांची बोलती बंद होती. अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हाताखाली पंतप्रधान काम करीत असतात, असे भासत असे. सोनिया गांधी यांचे सर्व लक्ष आपला पुत्न राहुल याला पंतप्रधानपदी बसविण्यावर केंद्रित झाले होते. हा प्रकार नवीन मतदार पाहत होते. दिल्लीचे सामूहिक बलात्कार प्रकरण,भ्रष्टाचार आदी बाबी काँग्रेस शासनाने नीट हाताळल्या नव्हत्या. राहुल गांधींच्या प्रचाराचा परिणाम होतांना दिसत नव्हता. त्यामुळे ऐन वेळी प्रियंका गांधींना प्रचारात उतरवावे लागले. प्रियंका गांधीं यांनी आपले लक्ष अमेठी आणि रायबरेलीपुरते र्मयादित ठेवले. यापेक्षा जास्त प्रचारासाठी त्यांना उतरवणे शक्य नव्हते. तसेच आता खूप उशीरही झाला होता. निवडणुकीतील हा विजय मोदींचा विजय जसा आहे तसाच तो त्यांच्या विरोधकांच्या दुबळेपणाचाही परिणाम आहे. ल्ल
ह्ल्ली मुक्काम पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका ९४२२८0४४३0वसंत गणेश काणे

No comments:

Post a Comment