Friday, May 16, 2014

My Trip to America 14.05.2014

माझी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
दिनांक १३ मी २०१४ ला युनायटेड एअर लाइन्सच्या विमानाने अमेरिकेतील पेन्सिव्हनिया प्रांतातल्या यॉर्क (न्यूयॉर्क नव्हे) या गावी जाण्याचे निश्चित झाले होते. हा निर्णय तसा एक वेगळाच निर्णय होता. ही फ्लाईट कुठेही न थांबता सतत १५ तास उड्डाण करीत नेवार्कला पोचणार होती. ब्रेक जर्नीचा पर्याय होता. पण भाषेची अडचण नको, तसेच काही तास मध्येच कुठेतरी खोळंबून राहण्यापेक्षा सलग १५ तास प्रवासाचा पर्याय निवडला. नागपूर ते पुणे बसने सलग प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी होता, तसेच २००९ मध्ये असा प्रवास केलेलाही होता. एअर इंडियाने नागपूर ते मुंबई असा प्रवास करून दुपारी ११ चे सुमारास मुंबईच्या डोमेस्टिक एअर पोर्टवर पोचल्यावर पवई येथील श्री विनायक लेले यांच्या गेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टवर क्सीने  दाखल झालो. इथपर्यंत शैलेश आणि संगीता साथ व सोबत म्हणून सोडायला आले होते.
कडक तपासणी
पासपोर्ट व तिकीटाच्या तपासणीचा सोपस्कार आटोपला आणि समान ढकलत आमची स्वारी बोर्डिंग पास मिळविण्यासाठी रांगेत उभी राहिली. सामानावर लावावयाच्या पट्ट्या हाती मिळाल्यावर तपशील भरण्यास सुरवात करतो न करतो तोच एक तरूण अधिकारी समोर येऊन उभा राहिला. कोण कुठले, कोणाकडे ,कशासाठी जाणार यांची चौकशी झाली. सामानात काय काय आहे, हेही विचारले. तुम्हाला आता इथे कुणी भेटले का, असे कुणी भेटल्यास त्याने तुम्हाला काही वस्तू दिल्या का असे विचारून झाल्यानंतर असे झाल्यास कुणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नका, असे त्या अधिकारऱ्याने बजावले. अतिरेक्यांचा उपद्रव सुरु झाल्यापासून विमानतळावर अशाप्रकारची तपासणी सुरु झाली आहे. मला या गोष्टीचे अतिशय समाधान वाटले. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. ही सर्व तपशीलवार चौकशी झाल्यानंतर बोर्डिग पास मिळाला. ७६ क्रमांकाच्या गेट मधून विमानात असायला जायचे होते. वेळ होता म्हणून इकडे तिकडे भटकायला सुरवात केली.
अनाहूत पाहुणा
एवढ्यात विमानतळावरच्या एका अधिकाऱ्याने एका माणसाला हटकले. त्याच्याजवळ कुठलासा पासपोर्ट होता पण तो तिथे कशासाठी आणि कसा काय आला होता, ते त्याला सांगता येत नव्हते. माणूस ओशाळल्या सारखा वाटत होता. आपण सहजच तिथे आल्याचे तो सांगत होता. अनाहूतपणे कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेली भरभक्कम तटबंदी मोडीत काढून ही व्यक्ती तिथपर्यंत पोचलीच कशी यामुळे सगळे हादरले होते. त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्याला तिथून नेण्यात आले. मी आपल्या जागी येऊन बसलो. पण पाहिलेल्या प्रसंगामुळे मनात उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते. माझी तीनदा चौकशी व तपासणी झाली होती. ही सर्व प्रकारची व्यवस्था मोडीत काढून ही व्यक्ती आगदी आतपर्यंत पोचावी याचे आश्चर्य वाटत होते. शेवटी एक गोष्ट खरी आहे की, सावापेक्षा चोराची बुद्धी श्रेष्ठ प्रतीची असते. पुढे काय झाले ते कळले नाही. कितीही काळजी घेतली तरी असे प्रकार होणारच हे जाणवले. ‘सदा सावधानतेला’ पर्याय नाही, हे जाणवले. तसेच सुरक्षा व्यवस्थेची नित्य तपासणी करणे आवश्यक असते आणि सुधारणेला वाव असतोच असतो, हेही लक्षात आले.
विमानात बसताबसता पुन्हा एकदा तपासणी झाली पादत्राणेही तपासली गेली. या निमित्ताने त्रास नक्कीच होतो, पण खबरदारीची  आवश्यकताही पटते. मात्र त्या अनाहूत पाहुण्याचा विचार काही मनातून जात नव्हता. विशेष काही नसेलही पण त्याचे तिथे येणे व असणे, ही बाब कडेकोट व्यवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणेसाठी एक आव्हानच असणार यात शंका नाही.
सगळे तपशील नोंदवले होते
प्रत्येक प्रवाशाच्या खुर्ची समोरच्या खुर्चीच्या पाठीवर  मॉनिटर स्क्रीन होता. त्यावर खेळ खेळता येतात, सर्व प्रकारचे चित्रपट पाहता येतात आणखी खूप काही करता येतं. मला आकर्षण वेगळ्याच गोष्टीचं होतं. विमान  प्रवासाचे सगळे तपशील पाहण्याची सोय होती.
मुंबई ते नेवार्क हे अंतर ८००० मैलान्पेक्षा (किलोमीटर नाही) जास्त आहे. म्हणजे १२,००० किलोमीटरपेक्षा जास्त होतं. विमानाने सर्व सोपस्कार आटोपल्यावर आकाशात झेप घेतली. काही वेळातच ३५,००० फुट उंची गाठली. विमानाबाहेरचे उष्णतामान (नव्हे थंडीचे मान) – (उणे) ५० डिग्री  फॅरेनहाईट होते. म्हणजे – (उणे) १० डिग्री सेंटिग्रेड होते.विमानाचा वेग तशी ५०० मैल होता. किती अंतर कापले किती अंतर राहिले, याचा हिशोब मांडला जात होता.  आम्ही अह्म्दाबाद्व्रून पुढे गेलो. आता पाकिस्तान लागले. मग अफगाणिस्तान, नंतर रशिया दिसू लागला. त्यानंतर नॉर्वे वरून आम्ही उडत चाललो होतो. काळी कुठेतरी डंकर्क असावे. दुसऱ्या महायुद्धात याच ठिकाणी हिटलरच्या फौजांनी इंग्लंडच्या आणि त्यांच्या मित्र  राष्ट्रांच्या फौजांची कोंडी केली होती. सर्व युद्धसामग्री तशीच टाकून सैनिकांना इंग्लंडला परत आणण्यात आले होते. चर्चिलने या माघारीला ‘यशस्वी माघार’ (सक्सेसफुल रिट्रीट) म्हणून संबोधले होते. शास्त्रे काय पुन्हा तयार करता येतील पण एकेक सैनिक लाखमोलाचा होता. सैन्य वाचले होते. पुन्हा शस्त्रे नव्याने तयार करून काही वर्षांच्या तयारीनंतर जनरल आयसेनहोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडी बीचवर उतरल्या आणि युद्धाचे पारडे फिरले. माझी नजर नॉर्मंडी बिच्च शोध गेट होती पण आम्ही त्यापासून खूप दुरून उडत चाललो होतो. एवढ्यात हेलसिंकीची नोंद दिसली. आम्ही निम्मे अंतर पार केले होते. आता बाहेरचे  उष्णतामान (थंडीचे मान) – (उणे) एकोणसाठ डिग्री फॅरेनहाईट इतके होते. म्हणजे –उणे १०डिग्री सेंटिग्रेड होते. आम्ही रात्री अकरा वाजता मुंबईहून निघालो होतो. घड्याळात भारतातले सकाळचे सात वाजले होते. म्हणजे अमेरिकेतले रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. वेळेचा हिशोब सोपा आहे. आपल्या वेळेत अडीच तास मिळवायचे आणि दिवसाची रात्र करायची किंवा रात्रीचा दिवस करायचा. म्हणजे यॉर्कमधली वेळ समजते. आता विमान ३६०० फुटावरून उडत चालले होते. आठ तास उडत होतो, आता आणखी सात तास बाकी होते आणि ४,००० मैल उड्डाण बाकी होते. कुठल्याही कामाचा निम्मा टप्पा पार पडला की उरलेला टप्पा लवकर पार पडतो आहे, असे वाटू लागते. आमचेही तसेच झाले होते. यावरून एक गोष्ट जाणवली. सर्व जगाने सी जी एस(सेंटीमीटर ,ग्रम, सेकंद)  सिस्टी म स्वीकारली अमेरिका मात्र अजून एफ पी एस(फूट,पाउंड, सेकंद) सिस्टीमचाच आग्रह धरून आहे.
काय हवे ते सांगा
प्रवासात खाण्यापिण्याची चंगळ होती. याचे पैसे विमान भाड्याबरोबरच घेतलेले होते. बहुतेक प्रवासी शाकाहारी होते. जेवणात बासमती तांदुळाचा भात फुलकोबीची रस्सा भाजी पालकाची पातळ भाजी, दही, सलाद, बन पाव, असा बेत होता. फ्रुट जूस, चहा , फी पेये अधूनमधून विचारली जात होती. मी लिहिण्य्साठी कागद मागितला. तो मात्र नव्हता. मी शेवटी टिशू पेपरवर मुद्दे नोंदविण्यास सुरवात केली. हवाई सुंदऱ्यांना मी बहुदा दुर्वास ऋषी वाटलो असेन. कारण जवळजवळ प्रत्येकाची फरमाईश त्या पूर्ण करीत होत्या. पण मला मात्र त्यांना ‘व्हेरी सॉरी’ म्हणावे लागले. पण चेहऱ्यावर अपराधी भाव  होता. परत वेळेला जाताना त्यांच्या जवळ नक्की एखादी वही किंवा कोरे कागद असतील, याची खात्री वाटते.
पुढची पिढी कशी असेल
   मुंबईलाच एका वृद्ध महिलेशी थोडेसे बोलणे झाले होते. तिचा मुलगा व सून अमेरिकेत एका गावी राहत होते. पण नातवाला सात तासाच्या अंतरावर (विमान सात तासात तशी ५००मैल वेगाने जाईल तेवढ्या अंतरावर) नोकरी करीत होता. तो आठवड्याचे पाच दिवस नोकरीच्या गावी रहायचा आणि शनिवार रविवारी ‘घरी’ यायचा. नातसून सासुसासऱ्यासोबतच राहत होती.मी म्हटले पुढच्या पिढीत आईबाप पृथ्वीवर, एक मुलगा अमेरिकेत, दुसरा मंगळावर आणि तिसरा चंद्रावर अशी स्थिती असणार बहुतेक!  यावर आम्ही दोघेही हसलो. महिलेच्या चेहऱ्यावर विषादाची छटा उमटलेली दिसली. तिला स्म्ज्वण्याच्या दृष्टीने मी म्हटले, ‘आपण आलटून पालटून एकेकाकडे रहावे’, म्हणजे झाले. यावर ती हसली, मीही हसलो. प्रवासात ही गोष्ट अधून मधून आठवत होती. तिने आपल्या सोबत दोन भल्यामोठ्या पेट्या घेतल्या होत्या. नेवार्कला उतरल्यावर त्या दिसल्या. ‘एवढे काय घेऊन चाललात?’, मी विचारले. ‘अहो, न्यावे तेवढे हवेच असते, तरी काही जिन्नस वगळून ठेवले आहेत. ते पुढच्या वेळेस नेणार आहे’, ती हसत म्हणाली. मीही हसलो. ती पुढे म्हणाली ‘आपल्याला थोडेच वाहून न्यायचे असते?’. बाईला उरक खूप होता. तिच्यासाठी ‘व्हील चेअरची’ आणि ‘सामानासाठी पोर्टरची’ अशी व्यवस्था करून ठेवलेली होती.
आपल्या सवयी
या प्रवासात एक विचित्र अनुभव आला. विमानातल्या स्वच्छ्तागृहांमध्ये पाण्याऐवजी कागदाचा उपयोग करायचा असतो. स्वच्छ्तागृहात गेलो तर सर्वत्र कागदाचे तुकडे पडलेले दिसले. वापर केल्यानंतर ते कुणीतरी ते तिथेच टाकले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. मी तसाच बाहेर आलो. काय करावे ते कळेना. रागाची जागा उद्विग्नतेने घेतली. मग विचार करीत बसलो. शेवटी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचे स्मरण करून पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो. टिशू पेपरचा एक लांबलचक तुकडा फाडला आणि सर्व तुकडे काळजीपूर्वक उचलले आणि त्यांची विल्हेवाट लावली. विमानातून उतरायची वेळ झाली तेव्हा पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो तो पुन्हा तोच प्रकार दिसला. कुणाला तरी वापर करण्याचे ज्ञान नव्हते हे लक्षात आले. पुन्हा स्वच्छता केली आणि बाहेर आलो. मग विचार मनात आला की, अस्वच्छता कुणालाच आवडत नसते. हे अज्ञानापोटी होत असले पाहिजे. तसेच स्वच्छतेच्या कल्पना वगवेगळ्या असतात. १९७० सालची गोष्ट आहे. एका कुटुंबात सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी त्रिकाल स्नानाची प्रथा होती. पण घरातल्या लहानग्याला ते दारापुढे बसवत असत. तसलाच काहीसा हा प्रकार असला पाहिजे. असो.
कस्टमवाले खरे पारखी

जसजशी अमेरिका जवळ येऊ लागली तसतसा विमानाचा वेग ताशी ५०० मैलापेक्षा जास्त होऊन तो आता ताशी ६०० मैल इतका झाला होता. याचा परिणाम असा झाला की आमची फ्लाईट ‘बिफोर टाईम’ नेवार्कला पोचली. सामानाची किंचितही तपासणी न होता कस्टम क्लिअर्न्स मिळाले. त्या लोकांना निर्ढावलेले आणि बावळट यांच्यातला फरक कळत असावा, असे कुणीतरी म्हणतांना मी ऐकले. ते न ऐकलेसे करून आम्ही घराकडे कारमधून कूच केले.     

No comments:

Post a Comment